Headlines

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन म्हशी एक वासरुचे जागीच मृत्यू…

पोलीस घटनास्थळी दाखल:आंबोली नांगरतास येथील घटना आंबोली, ता.३१: येथील नांगरतास येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने विठ्ठल जंगले यांच्या 2 म्हैशी आणि १ वासरु जागीच मृत्यू झाला.यात त्यांचे मोठे नुकसान झाले.आंबोली पोलिसाना कळवण्यात आले.पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.अज्ञात वाहनाबाबत पोलीस तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.ही घटना संध्याकाळी साडे सहा च्या दरम्यान घडली

Read More

कसाल येथील अपघातात बेळगाव मधील तरुणाचा मृत्यू

⚡ओरोस ता.३१-: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कसाल डोकलमवाडी येथे उलट्या दिशेने दुचाकी घेवून जाणाऱ्या युवकाने तेथील कठड्याला धडक दिली. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर लहू कुंभारकर वय १९ (रा. हडकरवाडी, ता. अचनी, जिल्हा बेळगाव) असे अपघाती मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत…

Read More

बाहेरून येऊन कपड्यांचा सेल लावणाऱ्यांना परवानगी नको

कुडाळमधील स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी:नगरपंचायत व पोलीस ठाण्याचे निवेदन द्वारे वेधले लक्ष.. ⚡कुडाळ ता.३१-: सणासुदीच्या आणि इतर दिवशी बाहेरून सेल लावण्यासाठी येणाऱ्या कापड विक्रेत्यांना तसेच बुधवारच्या आठवडा बाजार दिवशी तालुक्याबाहेरील कापड व्यावसायिकांना परवानगी देऊ नये अशी मागणी कुडाळमधील स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे. या मागणीला कुडाळ तालुका व्यापारी संघटनेने पाठिंबा दिला आहे. या व्यापाऱ्यांनी आपले निवेदन कुडाळ…

Read More

नेरूर चव्हाठा मित्रमंडळाची स्थापन, अध्यक्षपदी सतीश सावंत

⚡कुडाळ ता.३१-: नेरूर चव्हाठा हनुमान मंदिरमध्ये नेरूर चव्हाठा मित्रमंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या अध्यक्ष पदी सतीश सावंत यांची सर्वांमते निवड करण्यात आली. यावेळी सतीश सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी इब्राहिम शहा, रुपेश पावसकर, सुधीर नेरुरकर, प्रकाश साऊळ, बाबी साऊळ, राजू नेरुरकर, रमेश घाडी, रंजन सडवेलकर व देऊलकर उपस्थित होते.त्यावेळी नेरूर…

Read More

पर्यटन महासंघातर्फे आयोजित संस्कृती रॅली ठरली लक्षवेधी

⚡मालवण ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्त मालवण शहरातून भव्य अशी संस्कृती रॅली काढण्यात आली. यात साकारण्यात आलेली श्रीफळाची प्रतिकृती व सहभागी सजविलेल्या रिक्षा लक्षवेधी ठरल्या. मालवण भरड ते बंदर जेटी अशी ही संस्कृती रॅली काढण्यात आली. यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी रिक्षांची रॅली काढण्यात आली. मालवण एसटी स्टॅन्ड ते भरड…

Read More

श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी मंदिरात १, ते ३ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय खुली भजन स्पर्धेचे आयोजन…

दोडामार्ग दि.३१ ऑगस्ट (प्रतिनिधी)कोनाळ येथील श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी मंदिर येथे दि.१,२ व ३ सप्टेंबर रोजी निमंत्रित जिल्हास्तरीय खुली भजन स्पर्धेचे आयोजन खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार दि.१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते भजन स्पर्धा उद्घाटन करण्यात येणार आहे. या निमंत्रिताच्या खुल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत सहभागी…

Read More

दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर भाजपात दाखल

कणकवलीत ठाकरे सेनेला हादरा;आम. नितेश राणे यांनी केले स्वागत ⚡कणकवली ता.३१-: विकासकामे व गावचा विकास हा आम. नितेश राणे आणि भाजपा पक्ष यांच्याच माध्यमातून होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दिगवळेचे ठाकरे सेनेचे सरपंच संतोष रामचंद्र घाडीगावकर यांनी आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भाजपा…

Read More

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या उपोषण इशाऱ्याची दखल

अनेक वीज प्रश्न मार्गी ;उर्वरित प्रश्न ८ दिवसात सोडविण्याचे आश्वासन.. ⚡कणकवली ता.३१-: कलमठ गावातील वीज समस्या प्रश्नी सरपंच संदीप मेस्त्री यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महावितरण कडुन या उपोषणाची तात्काळ दखल घेत कलमठ ग्रामपंचायत मध्ये महावितरणचे अधिकारी दाखल होत दोन बैठका घेऊन यातील अनेक प्रश्न मार्गी लावले. व उर्वरित प्रश्न येथे आठ दिवसात सोडवण्याचे आश्वासन महावितरणच्या…

Read More

नवीन कुर्ली ग्रा. पं. कार्यालय हे पक्षीय की शासकीय ?

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांची टीका ⚡कणकवली ता.३१-: नवीन कुर्ली ग्रामपंचायत कार्यालय पक्षीय आहे की शासकीय ? असा सवाल करत शासकीय ग्रामपंचायत कार्यलयाचे उदघाटन प्रोटोकॉल न पाळता शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्याकडून करण्यात आल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घेतला. जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मधील खोलीत हे उदघाटन पक्षीय कार्यक्रम असल्याप्रमाणे…

Read More

जिल्हा परिषदेच्या ३३४ जागांसाठी १६ हजार २८७ अर्ज…

जिल्हा परिषद भरती प्रक्रिया:सर्वाधिक ग्रामसेवक पदांसाठी अर्ज.. ⚡ओरोस ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील 17 संवर्गाच्या 334 अधिकारी कर्मचारी भरती करता 16,287 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील 5520 उमेदवारानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देतील, तर उर्वरित सर्व उमेदवारांनी राज्यातील एकूण 45 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार असल्याची माहिती गुरुवारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे…

Read More
You cannot copy content of this page