पिंगुळीत ठाकर ग्रामस्थ मंडळा तर्फे साहित्यिक संवाद कार्यक्रम…
⚡कुडाळ ता.२३-: तालुक्यात पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ पिंगुळी आयोजित साहित्यिक संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिकांनी साहित्याबाबत…
⚡कुडाळ ता.२३-: तालुक्यात पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ पिंगुळी आयोजित साहित्यिक संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिकांनी साहित्याबाबत मार्गदर्शन करत तसेच विविध कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. प्रत्येकाने साहित्य जोपासा. वाचन संस्कृती आत्मसात करा. वाचनामुळेच आपण अधिक बुद्धिवान होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मोहन रणसिंग यांनी केले. आपल्या समाजातील काही ज्येष्ठ साहित्यिकांनी विविध साहित्यिक व्यासपीठावर आपल्या प्रतिभेने…
.⚡वेंगुर्ला ता.२३-: तालुक्यातीलपरुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिरची विद्यार्थिनी कु. अवंतिका अमेय देसाई हिने इयत्ता १० वीच्या (फेब्रुवारी २०२६) उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनात (फेरतपासणी) उत्तुंग यश मिळवले आहे. फेरतपासणीनंतर तिच्या गुणांमध्ये वाढ झाली असून, ती आता वेंगुर्ला तालुक्यात प्रथम आली आहे.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अवंतिकाला पुनर्मूल्यांकनापूर्वी ९७.८० टक्के गुण मिळाले होते. मात्र, गुणांवर पूर्ण विश्वास असल्याने तिने फेरतपासणीसाठी…
⚡मालवण ता.२३-:लांबणीवर पडलेला पाऊस अखेर पुन्हा बरसण्यास सुरुवात झाली असून काल रात्रीपासून मालवणात पावसाने हजेरी लावली आहे. तर आज मंगळवारी देखील दिवसभर पावसाने मुसळधार सुरूच ठेवल्याने गेले अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेल्या मालवणवासियांना दिलासा मिळाला आहे. तर पावसाच्या आश्वासक हजेरीमुळे शेतकऱ्यांनीही शेतीच्या कामात वेग पकडला आहे. तर सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बरसलेल्या पावसात तालुक्यात काही ठिकाणी…
⚡मालवण ता.२३-:उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मालवण देऊळवाडा उपशहरप्रमुखपदी किरण मारुती चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी ठाकरे युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख दीपा शिंदे, पूजा करलकर, रूपा…
मसुरेत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशेंचे प्रतिपादन:विविध योजनांचे दाखले व लाभार्थ्यांना सेवा वाटप.. ⚡मालवण ता.२३-: महाराजस्व अभियानाचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी, दाखल्यांसाठी किंवा त्यांच्या हक्काच्या योजनासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत हा आहे. आपण सर्वांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तुमच्या काही अडीअडचणी असतील, काही तांत्रिक समस्या असतील, तर त्या आमच्या अधिकाऱ्यांसमोर मांडायला…
⚡मालवण ता.२३-:अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्या वतीने मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या तबला परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मधील ‘अनंत संगीत शाला’ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये टोपीवाला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या एकूण ९ विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवरील परीक्षांमध्ये उत्तम श्रेणी…
⚡मालवण ता.२३-:केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता वैश्विक ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच हे युडीआयडी कार्ड आधार कार्डसोबत लिंक करणेही अनिवार्य आहे. ज्या लाभार्थ्यांकडे अद्याप हे कार्ड नाही, त्यांना स्वावलंबन पोर्टलवर अर्ज करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मालवणचे तहसीलदार…
⚡मालवण ता.२३-:मालवण शहरातील धुरीवाडा येथील सायबा हॉटेल नजिक विजेचा पोल अनेक दिवस धोकादायक स्थितीत असल्याकडे ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी महावितरणचे लक्ष वेधल्यानंतर तात्काळ हा विजेचा पोल बदलण्यात आला आहे. याबद्दल श्री. जोगी यांनी महावितरण अधिकारी, कर्मचारी तसेच या कामी मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. शहरातील अन्य भागात असणारे धोकादायक पोल व वीज वाहिन्या…
कुडाळ न.प. ने मागविले सदस्य नियुक्ती मागणी अर्ज.. ⚡कुडाळ ता.२३-: पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४ तसेच महाराष्ट्र पथविक्रेता नियम, २०१६ अन्वये कुडाळ नगरपंचायतीकरिता पथविक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीवर सदस्य म्हणून नियुक्तीसाठी पात्र व इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.समितीमध्ये अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायाधीश किंवा…
गुरुदास गवंडे:संबंधित विभागाने तातडीने खड्डा बुजवून परिसर सुरक्षित करावा.. ⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात असलेला मोठा खड्डा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात ये-जा करतात. मात्र, कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे अस मत सामाजिक कार्यकर्ते गुरूदास गवंडे यांनी व्यक्त केले आहे. संबंधित खड्ड्यात…