वेंगुर्ला येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न
वेंगुर्लाडॉ.अजित साटेलकर मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्यामार्फत कै. महेश परब स्मृती चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा – २०२६…
वेंगुर्लाडॉ.अजित साटेलकर मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्यामार्फत कै. महेश परब स्मृती चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा – २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे संपन्न झाली. या स्पर्धेला श्री चेस अकॅडमी व नवजीवन चेस अकॅडेमी यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत १६ वर्षांखालील, १३ वर्षांखालील आणि १० वर्षांखालील अशा विविध वयोगटांतील 122 बुद्धिबळपटूंनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या बुद्धिमत्ता,…
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले:पालकमंत्री नितेश राणे,आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले.. सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न श्री देव पाटेकर, श्री देव उपलकर यांच्या आशीर्वादाने मार्गी लागला आहे.सावंतवाडीसाठी एक ऐतिहासिक निर्णय आज घेतला गेला आहे. राजघराण्यानं नेहमीच लोकांसाठी काम केलं असून यापुढेही ते करत राहू अशी भावना सावंतवाडीच्या नगराध्यक्षा तथा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केली आहे….
मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभागीय कार्यालय मालवण येथे विद्युत वितरण, ग्राहक पंचायत शाखा मालवण आणि वीज ग्राहक यांची संयुक्त ‘ऊर्जा मित्र बैठक’ पार पडली. या बैठकीत ग्राहकांनी मालवण शहरातील रखडलेल्या भूमिगत वीज वाहिनीचे कामाबाबत प्रश्न उपस्थित केले असता या कामासाठी होणाऱ्या रस्ता खोदाईनंतर खोदाई दुरुस्तीपोटी खर्च करावयाची रक्कम कोणी द्यावी या…
मालवण दि प्रतिनिधी आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रा.बि.सह.पतसंस्था मर्या.आचरा या संस्थेतर्फे देण्यात येणारा कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार २०२६ सावंतवाडीच्या श्रीमती वंदना करंबेळकर यांना जाहिर झाला असल्याची माहिती चेअरमन मंदार सांबारी यांनी दिली. गेली ३ वर्षे श्रीकांत सांबारी यांच्या स्मृतीप्रित्यंर्थ हा पुरस्कार देण्यात येत आहे.यावर्षीचा हा ४था पुरस्कार सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती…
मालवण (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आणि बंड्या सरमळकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ऑगस्टला महिलांसाठी खुल्या ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मालवण बंदर जेटी येथे सायंकाळी ४ वाजता पार पडणार आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडी मालवण शहर संघटक सौ. राधिका मोंडकर यांनी दिली. मालवण येथील…
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड.. ⚡मालवण,ता.२०-:मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या ५९ वा युवा महोत्सवात कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टाच्या विध्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले या महाविद्यालयाची प्राची संभाजी परब हिने कथाकथन (मराठी) या कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या उल्लेखनीय…
शिवशंभो विचार मंच कोकण प्रांतचे सहसंयोजक भूषण साटम यांचे प्रतिपादन… ⚡मालवण ता.२०-:ब्रिटिशांच्या जुलमी शृंखलात जखडलेल्या भारतमातेला मुक्त करण्यासाठी ज्या क्रांतीकारकांनीआपल्या प्राणाची आहुती देत आपल्यासमोर संघटन, कठोर राष्ट्रप्रेम, एकात्मता, शिस्तपालन, वज्रनिश्चय, गुरुजनाचा आणि आपल्या संस्कृतीचा, धर्माचा अभिमान या सर्व गोष्टी ठेवल्या त्याच गोष्टी दुर्दैवाने लुप्त होतं आहेत.आज भारत देश पुन्हा एकदा सुजलाम, सुफलाम बनवायचा असेल क्रांतिकारकांनी…
संजू परब: दीपक भाईंमुळे मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी, बाबू कुडतरकर; मल्टीस्पेशलिस्टचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शिवसैनिकांनी फटाके वाजून आनंद उत्सव केला साजरा.. ⚡सावंतवाडी, ता. २०-: लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला सावंतवाडीच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न अखेर मार्गी लागला असून, न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार दीपक केसरकर यांनी या प्रश्नाचा सातत्याने…
वैभववाडी प्रतिनिधीएडगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अभिजित उर्फ राजू पवार यांची पुन्हा एकदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमताने ही निवड केली.वर्षभर राजू पवार यांनी या पदावर चांगले काम केले आहे. दहा तंटे त्यांनी अत्यंत संयमाने, सामंजस्यपणे आणि सामोपचाराने मिटवले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे.राजू पवार हे तालुक्याच्या आत्मा समितीत…
कुडाळ : बॅ. नाथ पै बी.एड. महाविद्यालय, कुडाळ येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक संलग्नित ‘पालकत्व शिक्षणक्रम’ तसेच ‘मार्गदर्शन व समुपदेशन पदविका’ या शिक्षणक्रमांना विद्यापीठाची नुकतीच मान्यता मिळाली आहे.आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पालकांमध्ये ताण-तणावाचे प्रमाण वाढत आहे. मुलांच्या संगोपनासाठी शास्त्रशुद्ध पालकत्वाची आवश्यकता असून, पालकांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरू करण्यात…