मन की बात’मधून मोदींचा नशामुक्त भारताचा संदेश…
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाहिले थेट प्रक्षेपण.. ⚡सावंतवाडी ता.३०-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाहिले थेट प्रक्षेपण.. ⚡सावंतवाडी ता.३०-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या १३७ व्या भागाचे थेट प्रक्षेपण भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आपल्या केसरी येथील केएसआर ग्लोबल एक्वेरियम येथे पाहिले.या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प, युवकांसाठी नशामुक्त भारताचा…
ज्येष्ठ नागरिक गंगाराम उर्फ भाऊ बिरोडकर यांचे ७७व्या वर्षी निधन; मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरात होते सर्वांचे लाडके ⚡सावंतवाडी,ता.३०-: न्यू सबनिसवाडा-बिरोडकर टेंब येथील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक तथा बिरोडकर टेंब कला-क्रीडा मंडळाचे सल्लागार गंगाराम उर्फ भाऊ सखाराम बिरोडकर यांचे आज दुपारी १ वाजता वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन वर्षांपासून ते आजारी होते. अर्धांगवायूच्या आजाराशी झुंज देत…
बाबी जोगी यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महावितरणची तत्काळ कार्यवाही.. ⚡मालवण,ता.३०-:स्वच्छ, सुंदर आणि चंदेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील चिवला बीचवर गेल्या १० दिवसांपासून धोकादायक स्थितीत पडलेला विजेचा पोल आणि चालू विद्युत केबल अखेर महावितरण विभागाने तातडीने हटवून त्या ठिकाणी नवीन पोल उभारला आहे. शिवसेना शहर प्रमुख बाबी जोगी यांनी महावितरण अधिकाऱ्यांना भेटून आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा…
आमदार निलेश राणे यांची सरोजताईना श्रद्धांजली मालवण दि प्रतिनिधी १९९० पासून राणे साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या ज्येष्ठ सहकारी तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ सरोज शिवाजी परब यांच्या आकस्मिक निधनाने मन हेलावून गेले, अशा शब्दांत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सरोजताईंना श्रद्धांजली अर्पण केली. सरोज परब यांनी प्रदीर्घ काळ सामाजिक…
पालकमंत्री नितेश राणे:देवगड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून तरुणांना क्रीडा क्षेत्रात मोठे व्यासपीठ उपलब्ध करून द्या.. ⚡देवगड ता.३०-: तालुक्यातील मिठमुंब्री बीचवर देवगड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फिशिंग टूर्नामेंटमुळे देवगडचे नाव राज्याच्या पर्यटन नकाशावर पोहोचण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. पारंपरिक कार्यक्रमांच्या…
⚡मालवण ता.३०-:सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा, माजी शिक्षिका, ज्येष्ठ राजकीय-सामाजिक कार्यकर्त्या आणि खासदार नारायण राणे यांच्या निकटवर्तीय सौ. सरोज शिवाजी परब (मसुरे-मर्डेवाडी) (वय 66)यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या चार वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मसुरे दशक्रोशीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. सौ. सरोज परब…
कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांची माहिती :कोमसापचा ऐतिहासिक उपक्रम.. ⚡कुडाळ ता.३०-: महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येथील भाषा आणि संस्कृतीची ओळख असणे आवश्यक आहे. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकविण्याच्या उपक्रमात एक लाख ५६ हजार चालकांनी मराठीचे धडे घेतले, अशी माहिती कोकण मराठी साहित्य…
आंबोली,ता.30 येथील आंबोली आजरा फाट्याच्या पुढच्या वळणावर ओमनी गाडी आणि दुचाकी यांच्यात जोरदार अपघात झाला.अपघातात ओमनी गाडी समोरच्या दिशादर्शक फलकावर जोरदार आदळली. यात गाडी चालकाचा पाय अडकून गंभीर जखमी झाला.तर दुचाकी स्वार ही जखमी झाला.जखमी ना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.प्रदीप पोतदार यांनी उपचार करण्यात केले.यानंतर आंबोली पोलीस घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेले आहेत.
गणेशोत्सवापूर्वी आवश्यक उपाययोजनांची मागणी.. ⚡कणकवली ता.३०-: तालुक्यातील तळेरे बसस्थानक परिसरातील ठिकठिकाणी पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, तळेरेचे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, वारगावचे उपसरपंच नाना शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष वामन ताम्हणकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग…
गोपुरीतील वाचन संस्कृती उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात वाचनप्रेमींचे मत.. कणकवली : पुस्तके वाचणे ही जीवनातील एक इनवेस्टमेंट आहे. पुस्तके वाचल्याने माणसांच्या विचारांना गती प्राप्त होते. वाचनामुळे खरे व खोटे काय याची समज माणसाला येते. आधुनिक काळात लोप पावत चाललेली वाचन संस्कृतीला पुन्हा उर्जिताव्यस्था प्राप्त करून देण्यासाठी वाचनप्रेमींनी तरुण पिढीला पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम…