Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचेविकास संस्था अधिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय : श्री. मनीष दळवी…

⚡वेंगुर्ला ता.१४-: विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्था हा सहकार व्यवस्थेचा पाया असून, या संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विकास संस्थांनी केवळ कर्जवाटप व वसुलीपुरते मर्यादित न राहता विविध व्यवसाय सुरू करून सभासद शेतकऱ्यांना अधिकाधिक सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष…

Read More

फाळणीच्या वेदनादायी स्मृतींना उजाळा..

लाखो निरपराधांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन; इतिहासातून शिकून राष्ट्र अधिक भक्कम करण्याचे विशाल परब यांचे आवाहन.. ⚡बांदा ता.१४-: भारताच्या इतिहासातील १४ ऑगस्ट हा दिवस ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ म्हणून फाळणीच्या काळातील वेदनादायी स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मरणात ठेवला जातो. या पार्श्वभूमीवर भाजपा राज्य युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या असंख्य निरपराध नागरिकांना विनम्र अभिवादन…

Read More

डेगवेतील पडलेले पिंपळाचे झाड तात्काळ हटविले…

बांदा-दोडामार्ग मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत.. ⚡बांदा ता.१४-:बांदा दोडामार्ग मार्गावरील डेगवे बाजारवाडी येथे पिपळाचे झाड पडल्याने वाहतूक बंद होती. याबाबत भाजपा बांदा मंडळचे अध्यक्ष मधुकर देसाई यांनी आमसभेत प्रश्न मांडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी तात्काळ बांधकाम विभागाला सूचना दिल्या. त्यानंतर तात्काळ ते झाड हटविण्यात आले. मात्र या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली…

Read More

तपस्वी मयेकर यांनी मालवण शहराची नाहक बदनामी करू नये…

नगराध्यक्षा ममता वराडकर:वैभव नाईक हे दहा वर्षे आमदार असताना ही कामे का नाही पूर्ण करू शकले..? ⚡मालवण ता.१४-:उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर हे मालवण शहरातील प्रलंबित कामांवरून व्हिडीओ बनवून आम्हा सत्ताधाऱ्यांवर टीका करत उपोषणास बसण्याचा इशारा देत आहेत. मात्र आम्हाला नगरपालिकेत सत्तेत येऊन आठ महिनेच झाले असून नळपाणी योजना, भुयारी गटार, भाजी मार्केट ही कामे…

Read More

मालवणात ‘अखंड भारत, समर्थ भारत’चा जयघोष; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जागर..

मालवण दि प्रतिनिधी : भारताच्या अखंडतेचा, राष्ट्रप्रेमाचा आणि देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीने ‘अखंड भारत, समर्थ भारत’ या संकल्पनेवर आधारित भव्य टु-व्हीलर तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली. हातात अभिमानाने तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, नगरपरिषद या सर्वांच्या सहभागामुळे मालवण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे…

Read More

गणेशोत्सव काळात वीज पुरवठा सुरळीत न ठेवल्यास तीव्र आंदोलन छेडू

मालवण पं. स. सभेत वीज विभागाला इशारा मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात सुरु असलेल्या भूमिगत वीज वाहिनीच्या कामात खोदाईचा भाग बुजविण्यासाठी वाळू ऐवजी खडीची म्हणजे क्रशरची पावडर टाकली जात आहे, यामुळे हे काम चुकीच्या पद्धतीने होत असून या कामावर वीज वितरण विभागाचे कोणतेही लक्ष नाही असा आरोप पंचायत समिती सदस्य बंडू चव्हाण यांनी मालवण पंचायत समितीच्या…

Read More

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे हास्य

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते गणवेश वाटप कणकवली : शहरातील कणकवली शाळा क्रमांक ५ येथे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. नव्या गणवेशामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, जाई मुरकर, बाळू पारकर,…

Read More

पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची विल्हेवाट

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांची तत्परता कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गालगत पणदूर येथे सकाळी अंड्यांचा मोठ्या प्रमाणावर खच पडल्याचे सर्वांच्या निदर्शनास आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या साहाय्याने योग्य ती विल्हेवाट लावली.मुंबई गोवा महामार्गावरील पणदूरतिठा येथील ब्रीज नजिक महामार्गालगत मोठ्या…

Read More

कुडाळला उद्यापासून मान्सून महोत्सव ; १४ वे वर्ष..

१५ रोजी वीरभक्त तरणीसेन, तर १६ रोजी रावण मंदोदरी विवाह:लाजरी क्रिकेट ग्रुपचे आयोजन.. कुडाळ : दशावतारातील दर्जेदार पौराणिक नाटकांची मेजवानी दशावतार नाट्य रसिकांना देणारा आणि सर्वांना उत्कंठा लागून राहिलेला कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपचा ‘मान्सून महोत्सव-२०२६ ‘ येथील सिद्धिविनायक सभागृहात १५ व १६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे चौदावे वर्ष आहे. यात…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात १० शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊन दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. या योजनेनुसार कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना आता अधिकृतपणे ‘थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र’ वाटप करण्याच्या मोहिमेचा जिल्हा स्तरावर औपचारिक शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे…

Read More
You cannot copy content of this page