Headlines

बुर्डी पुलावर रिक्षा-आयशरची भीषण धडक…

वृद्ध प्रवासी गंभीर जखमी.. सावंतवाडी : सावंतवाडी-आंबोली मार्गावरील बुर्डी पुलावर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आंबोली येथील गणपत राऊळ (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी दहाच्या सुमारास बुर्डी पूल परिसरात रिक्षा आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता…

Read More

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त तीन तालुक्यांत विविध सामाजिक उपक्रम..

५ हजार वृक्षांचे वाटप; रक्तदान शिबिरासह विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके, रुग्णालयांना पंखे व गरजूंना छत्री वाटप.. सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महिला जिल्हाप्रमुख…

Read More

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे स्वप्न साकार करण्याची ही मुहूर्तमेढ…

ना. नितेश राणे:’झोया मरीन’ बोट बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० स्थानिक युवकांना रोजगार,रेडी बंदर व आरोंदा जेटीसह ताज पंचतारांकित प्रकल्प ही लवकरच मार्गी.. ⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा व या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे हे स्वप्न काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे साहेब यांनी पाहिले. ते…

Read More

दीपक केसरकर, मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सूर्याजींचे आंदोलन स्थगित…

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची यशस्वी शिष्टाई.. ⚡सावंतवाडी ता.१६- : केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा यांची ओपिडी सावंतवाडीमध्ये चालू होण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी १२ वा. विशेष सभा बोलावून सर्व सदस्यांची सहमती देऊन त्यांच्या अटी मंजूर करून तातडीने ओपीडी चालू करावी असा ठराव मंजूर करून आयुर्वेद संस्थानला पाठवण्यात येईल असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी…

Read More

वेंगुर्ला पोलिस ठाणे आणिस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांची जलद कामगिरी

वेंगुर्ला आडारी येथील घरफोडीचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील आडारी-टेंबवाडी येथील रहिवासी मनिषा गुंडराज शिरोडकर (वय ६४) यांच्या बंद असलेल्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सुमारे 31.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेऊन घरातील सामानाची तोडफोड करून साहित्य अस्ताव्यस्त टाकले होते. यामध्ये एकूण 15 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचेविकास संस्था अधिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय : श्री. मनीष दळवी…

⚡वेंगुर्ला ता.१४-: विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्था हा सहकार व्यवस्थेचा पाया असून, या संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विकास संस्थांनी केवळ कर्जवाटप व वसुलीपुरते मर्यादित न राहता विविध व्यवसाय सुरू करून सभासद शेतकऱ्यांना अधिकाधिक सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष…

Read More

फाळणीच्या वेदनादायी स्मृतींना उजाळा..

लाखो निरपराधांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन; इतिहासातून शिकून राष्ट्र अधिक भक्कम करण्याचे विशाल परब यांचे आवाहन.. ⚡बांदा ता.१४-: भारताच्या इतिहासातील १४ ऑगस्ट हा दिवस ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ म्हणून फाळणीच्या काळातील वेदनादायी स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मरणात ठेवला जातो. या पार्श्वभूमीवर भाजपा राज्य युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या असंख्य निरपराध नागरिकांना विनम्र अभिवादन…

Read More

डेगवेतील पडलेले पिंपळाचे झाड तात्काळ हटविले…

बांदा-दोडामार्ग मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत.. ⚡बांदा ता.१४-:बांदा दोडामार्ग मार्गावरील डेगवे बाजारवाडी येथे पिपळाचे झाड पडल्याने वाहतूक बंद होती. याबाबत भाजपा बांदा मंडळचे अध्यक्ष मधुकर देसाई यांनी आमसभेत प्रश्न मांडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी तात्काळ बांधकाम विभागाला सूचना दिल्या. त्यानंतर तात्काळ ते झाड हटविण्यात आले. मात्र या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली…

Read More

तपस्वी मयेकर यांनी मालवण शहराची नाहक बदनामी करू नये…

नगराध्यक्षा ममता वराडकर:वैभव नाईक हे दहा वर्षे आमदार असताना ही कामे का नाही पूर्ण करू शकले..? ⚡मालवण ता.१४-:उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर हे मालवण शहरातील प्रलंबित कामांवरून व्हिडीओ बनवून आम्हा सत्ताधाऱ्यांवर टीका करत उपोषणास बसण्याचा इशारा देत आहेत. मात्र आम्हाला नगरपालिकेत सत्तेत येऊन आठ महिनेच झाले असून नळपाणी योजना, भुयारी गटार, भाजी मार्केट ही कामे…

Read More

मालवणात ‘अखंड भारत, समर्थ भारत’चा जयघोष; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जागर..

मालवण दि प्रतिनिधी : भारताच्या अखंडतेचा, राष्ट्रप्रेमाचा आणि देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीने ‘अखंड भारत, समर्थ भारत’ या संकल्पनेवर आधारित भव्य टु-व्हीलर तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली. हातात अभिमानाने तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, नगरपरिषद या सर्वांच्या सहभागामुळे मालवण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे…

Read More
You cannot copy content of this page