दांडी येथे जाळ्यात अडकलेल्या घारीला जीवदान…
⚡मालवण ता.११-:दांडी येथील दांडेश्वर मंदीर नजीक जाळ्यात अडकलेल्या व उष्णतेमुळे निर्जलीकरण झालेल्या घार (ब्लॅक काईट)…
⚡मालवण ता.११-:दांडी येथील दांडेश्वर मंदीर नजीक जाळ्यात अडकलेल्या व उष्णतेमुळे निर्जलीकरण झालेल्या घार (ब्लॅक काईट) पक्षास मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांनी जीवदान दिले. दांडी येथील दांडेश्वर मंदिरनजीकच्या समुद्र किनाऱ्यालगत जाळ्यात अडकलेला व उष्णतेमुळे निर्जलीकरण अवस्थेत घार हा पक्षी प्रविण कुबल यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पारंपरिक मच्छिमार, पर्यटन व्यवसायीक प्रविण कुबल, रामा धुरत व वरद मोरजकर यांनी…
⚡सावंतवाडी ता.११-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून रुग्णांच्या सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी अण्णा देसाई प्राध्यापक सुभाष गोवेकर व संस्थेचे सचिव प्रकाश राऊळ यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्याकडून रोख रक्कम 51 हजार 500 रुपये एवढी देणगी देण्यात आली.सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जिल्हास्तरावर करत असलेले सेवाभावी कार्य अतिशय उत्कृष्ट आहे याचा अनुभव आम्ही नेहमी…
आठ खलाशी ताब्यात, जप्त मासळीचा लिलाव सुरू.. देवगड / प्रतिनिधी :महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय नौकांकडून होणाऱ्या अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई करत कर्नाटक राज्यातील एका ट्रॉलिंग नौकेला जप्त केले आहे. या कारवाईत नौकेवरील तांडेलसह आठ खलाशांना ताब्यात घेण्यात आले असून जप्त करण्यात आलेल्या मासळीचा लिलाव सुरू करण्यात आला आहे.मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने…
⚡देवगड ता.११-:हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव, बाजारातील शेतमालाच्या दरातील घसरण व अनिश्चितता तसेच वाढलेला उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. या समस्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाला मराठा समाज, देवगड यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.याबाबत देवगड तालुका…
गुरु तेग बहादूर सिंग यांच्या ३५० शहिदी शताब्दी वर्षानिमित्त आयोजन.. ⚡मालवण ता.११-:श्री गुरु तेग बहादूर सिंग यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने युथ फॉर भारत मालवण तर्फे दि.१४ मार्च रोजी सायंकाळी ४. ३० वा. दैवज्ञ भवन, मालवण येथे ‘शहादत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत देशाच्या हिंदभूमीवर, स्वातंत्र्याच्या स्थन्डीलावर…
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरव.. ⚡सावंतवाडी ता.११-:राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य, जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आणि जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘नारीशक्ती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक माधुरी अनिल…
जिल्हाधिकारी धोडमिसे:मुख्यालय पत्रकार संघाच्या क्रिकेट स्पर्धेला दमदार सुरुवात.. ओरोस ता ११सुखर जीवनासाठी निरोगी आयुष्य महत्वाचे असते. निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा असतो. हा व्यायाम मैदानावरील खेळातून मिळते. त्यामुळे नियमित खेळणे महत्वाचे आहे. त्याच उद्देशाने मुख्यालय पत्रकार संघाने आयोजित केलेल्या जिल्ह्यातील पत्रकारांसाठीच्या क्रिकेट स्पर्धा हा उपक्रम निश्चितच बोध घ्यायला लावणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…
अँड. राजू कासकर: मुख्याधिकाऱ्यांना निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.११-: तलावापाशी पुरुष व महिला प्रसाधनगृह तयार करण्यात यावे. तसेच शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये मोफत ओपन जीम सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख ॲड. राजू कासकर यांनी मुख्याधिकारी यांना केली आहे ते म्हणाले, शहारातील अनेक नागरिक तलावाकाठी सकाळ संध्याकाळी फेरफटका व चालण्यासाठी येतात. लहान मुले, महिला,…
संजू परबांची जोरदार टीका: तर गॅस पाईपलाईन संदर्भात कोणी कुठे कुठे बैठका घेतल्या ? ते नावानिशी जाहीर करेन.. ⚡सावंतवाडी ता.११-: पाणी पुरवठा विभागाच्या नळपाणी योजनेच काम तज्ञ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरु नाही. याबाबत सभागृहात आम्ही आवाज उठवला. बांधकाम विभाग हे काम बघत आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विकासाच व्हिजन सांगणारे गायब झालेत. सत्ताधाऱ्यांचा…
अमित सामंत:बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा.. ⚡कुडाळ ता.११-: आंबा बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पाठिंबा दिला आहे. बाधीत सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई फक्त जाहीर न करता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मागणी केली आहे.अमित…