Headlines

राज्यातील एनएचएम च्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा…

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर मिळणार संधी:राणे पिता-पुत्रांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.. ⚡मुंबई दि.३०-: राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत गेली दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना समकक्ष नियमित पदांवर सामावून घेण्याचा…

Read More

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ विषयावरील विशेष मुलाखतीचे २ जुलै रोजी प्रसारण…

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.३०-: राज्य शासनाने शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर करून राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची उद्दिष्टे, पात्रता, निकष, लाभाची प्रक्रिया तसेच शेतकऱ्यांच्या मनातील विविध प्रश्नांची सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्गच्या वतीने आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावर विशेष मुलाखतीचे…

Read More

कणकवलीतील जुने भाजी मार्केटचा काही भाग कोसळला…

जीर्ण इमारत तातडीने निर्लेखित करून नव्या व्यापारी संकुलाची उभारणी करणार:नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही.. ⚡कणकवली ता.३०-: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली शहरातील जुने भाजी मार्केट इमारतीचा काही भाग मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी…

Read More

अन्नसुरक्षा शिबिरात व्यापाऱ्यांना थेट मार्गदर्शन…

​सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा उपक्रम:कुडाळ येथील शिबिराला ८०० हून अधिक व्यापाऱ्यांची उपस्थिती.. ⚡​कुडाळ ता.३०-: अन्न आणि औषध प्रशासनाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यातील अन्नसुरक्षा कायद्याची व नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील व्यापारी बांधवांना नवीन कायदे व नियमांची सविस्तर माहिती व्हावी, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने…

Read More

मनसेच्या पाठपुराव्याला यश; बांदा सटमटवाडीतील बंद पथदिवे पुन्हा सुरू…

⚡बांदा ता.३०-: मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा सटमटवाडी येथे बंद पडलेल्या पथदिव्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. गोवा राज्याच्या सीमेपासून बांदा पोलीस तपासणी नाक्यापर्यंतच्या दुभाजकातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या पार्श्वभूमीवर मनसेचे सावंतवाडी तालुका प्रमुख मिलिंद सावंत यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न…

Read More

…तर वालावल-मुर्तळीवाडीचे ‘माळीण’ होईल

रुपेश पावसकर :चार महिन्यांपूर्वी लक्ष वेधून सुद्धा प्रशासन ढिम्म,प्रशासन,ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला.. ⚡​कुडाळ ता.३०-: मतदारसंघातील बेकायदेशीर माती आणि दगड उत्खननाबाबत मी चार महिन्यांपूर्वीच (२९ एप्रिल २०२६ रोजी) तहसीलदारांना लेखी पत्र देऊन आपत्ती व्यवस्थापन बैठक घेण्याची मागणी केली होती. हे उत्खनन लोकांच्या जीवावर बेतू शकते, अशी भीती मी व्यक्त केली होती. पण प्रशासनाने याकडे…

Read More

गुणवंत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कला-कौशल्य आत्मसात करावे…

जिल्हाप्रमुख संजू परब: आमदार दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.३०-: आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थ्याने केवळ शिक्षणावरच अवलंबून न राहता, त्यासोबत इतर क्षेत्रातील कला व कौशल्य आत्मसात केले पाहिजे. परीक्षेत भरपूर टक्केवारी मिळवली म्हणजे आयुष्याचे कल्याण झाले असे होत नाही, त्यामुळे पालकांनी मुलांची आवड ओळखून त्यांना त्यांचे…

Read More

हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश…

आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला;मनीष दळवी.. ⚡ओरोस ता.३०-: पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. आतापर्यंत या योजनेंतर्गत कोकणातील आंबा, काजू व केळी या तीन पिकांनाच विमा संरक्षण दिले जात होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड…

Read More

आज सीड बाॅल… उद्या हिरवाईचा महासागर…

घारपी जिल्हा परिषद शाळेचा प्रेरणादायी उपक्रम ⚡बांदा ता.३०-: १ जुलै ‘कृषी दिन’ हा केवळ शेतकऱ्यांच्या कष्टांचा गौरव करणारा दिवस नाही, तर माती, शेती, निसर्ग आणि पर्यावरणाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची संधी आहे. आधुनिक कृषीक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथे विद्यार्थ्यांसाठी ‘सीड…

Read More

नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास कृषी क्षेत्रास पुन्हा चांगले दिवस…

प्रभाकर सावंत: वेंगुर्लात नैसर्गिक शेती संमेलन उत्साहात संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.३०-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षात अनेक समाजाभिमुख योजना राबविल्या असून त्या योग्यप्रकारे यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या बारा वर्षात देशाचा सर्वच क्षेत्रात कायापालट झाला आहे. दरम्यान रासायनिक शेतीचे परिणाम पाहता व पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीचा पर्याय आणला आहे….

Read More
You cannot copy content of this page