तारकर्लीच्या निशाणकाठी समुद्रकिनारी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
मालवण : (प्रतिनिधी) तारकर्ली येथील निशाणकाठी समुद्रकिनारी बुधवारी दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी एका अनोळखी…
मालवण : (प्रतिनिधी) तारकर्ली येथील निशाणकाठी समुद्रकिनारी बुधवारी दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविण्यात अडचण निर्माण झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावातील सत्यवान भगत यांनी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास समुद्रकिनारी मृतदेह आढळल्याची माहिती संबंधित व्यक्तीला फोनद्वारे दिली. त्यानंतर दुपारी…
कुडाळ एमआयडीसीतील भूखंडावरून वाद ; ग्रामस्थ आक्रमक:वैभव नाईकांसह ग्रामस्थांचा एमआयडीसी अधिकाऱ्यांना जाब.. ⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ एमआयडीसीतील उद्योगांसाठी राखीव असलेल्या भूखंडाचा मंगल कार्यालय आणि रामदेव बाबा मंदिरासाठी वापर केला जात असल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थ आणि उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एमआयडीसी कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना याबाबत जाब…
⚡मालवण ता.०२-:सिंधुदुर्गच्या जिल्हा क्रीडा अधिकारी अंतर्गत क्रीडा दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कुलच्या विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले उद्या स्पर्धेत १७ वर्षीय मुलगे १०० मीटर फ्रीस्टाईल पोहणे या क्रीडाप्रकारात वेदांत विनायक पोफळे याने तसेच १७ वर्षीय मुलगे १०० मीटर फ्रीस्टाईल पोहणे यामध्ये १७ वर्षीय मुली १०० मीटर फ्रीस्टाईल पोहणे…
सर्व धर्मीय सणांसाठी अन्नसुरक्षेचे समान नियम लागू करण्याची मागणी.. ⚡सावंतवाडी ता ०३-:हिंदू सण-उत्सवांतील ‘महाप्रसाद’, ‘भंडारा’ व ‘अन्नदान’ या उपक्रमांवर अन्नसुरक्षेच्या नावाखाली एकतर्फी कारवाई केली जाऊ नये. सर्व धर्मीय सण-उत्सवांमध्ये अन्नवितरणासाठी समान नियम लागू करण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन मंदिर महासंघाच्या वतीने येथील नायब तहसीलदार श्रीम. सविता तारी यांच्या जवळमा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र…
मालवण : (प्रतिनिधी) मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझार मालवणची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स. का. पाटील सिंधुदूर्ग कॉलेज मालवणच्या सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या मालमत्तेचा विकास करून संस्थेची व्यवसायिक वाढ करण्यासाठी सुसज्ज असे डिपार्टमेंट व नवनवीन सेवा ग्राहक सभासदांना देण्याच्या धोरणात्मक निर्णयाने…
सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन व उद्बोधन संपन्न मालवण (प्रतिनिधी) आजचे तरुण देशाचे मुख्य स्तंभ आहेत. एनएसएस मधून मिळणारे अनुभव, शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि संघभावना यांचा व्यावहारिक जीवनात मोठा उपयोग होतो, एनएसएस स्वयंसेवकांनी समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गच्या उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांनी केले. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना कणकवली, दि. १ : कणकवली तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती सभागृहात जनता दरबाराचे सोमवार दि.०१ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी ४२ निवेदने प्रत्यक्ष, तर ५४ तोंडी अशी एकूण ९६ निवेदने प्राप्त झाली…
⚡कुडाळ ता.०२-: माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड माणगाव या संस्थेची 75 वी रौप्य महोत्सवी वार्षिक आधीमंडळाची सभा माणगाव त्रिमूर्ती हॉल येथे पार पडली माणगाव विभाग विविध सेवा सहकारी सोसायटी या संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून दोन घमाले, एक फावडे, सुपारीचे रोप व…
परजिल्ह्यातील तबला मेकर्स आबा साळुंखे यांचा वेंगुर्ल्यात सत्कार.. ⚡वेंगुर्ला ता.०२-: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गेली ५२ वर्षे वेंगुर्ला शहरात येऊन भजनी मंडळांना दर्जेदार वाद्ये उपलब्ध करून देणारे सांगली जिल्ह्यातील वसंत उर्फ आबा साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबियांचा वेंगुर्ल्यातील हिंदू धर्माभिमानी मंडळींच्यावतीने सत्कार करण्यात आला.अलिकडे भजन हा प्रकार वर्षभर चालत असला तरी गणेश चतुर्थीला याचे प्रमाण जास्त असते….
⚡मालवण ता.०२-: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि सौ. नीलमताई राणे यांनी मसुरे येथे कै. सरोज परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष सौ सरोज परब यांचे शनिवारी हृदय विकाराने निधन झाले होते.सरोज ताईंच्या निधनाने जिल्ह्याच्या विकासात्मक राजकीय वाटचालीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नेहमी हसतमुख…