सोनुर्ली बसफेऱ्यांच्या अनियमिततेवर ग्रामस्थ संतप्त; आंदोलनाचा इशारा…

⚡सावंतवाडी ता.०९-:सोनुर्ली गावासाठी सोडण्यात येणाऱ्या बस फेऱ्या वेळेत येत नसल्याने प्रवासी वर्ग तसेच शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे या बस फेऱ्या वेळेत सोडाव्यात अन्यथा हा ग्रामस्थ प्रवासी व विद्यार्थ्यांना घेऊन सावंतवाडी बस स्थानकात आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे.सोनुर्ली गावासाठी सावंतवाडी एसटी बस स्थानकातून सकाळी सव्वा…

Read More

वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे यांनी घेतले तुळस ग्रामदैवत श्री देव जैतिराचे दर्शन…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे मातोंड पंचायत समिती सदस्य शंकर शशिकांत घारे यांची आज बिनविरोध निवड झाली. यानिमित्त त्यांनी तुळस ग्रामदैवत श्री देव जैतिराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच त्यांनी पेंडूर श्री देव घोडेमुख, मातोंड श्री देवी सातेरी, पाल श्री भूमिकादेवी, पाल श्री खाजणादेवी तसेच होडावडा येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर चे दर्शन घेतले….

Read More

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव…

सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी पंचायत समिती सभापती निवड आज येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर आज त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे यात शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कोलगाव शिंदे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राकेश पवार यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

सावंतवाडीत तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०९-: स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ”आपण व्यक्त होऊया!” समितीकडून तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते दुसरीसाठी रंगभरण तर इ. तिसरी व चौथीसाठी चित्रकला स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. रविवार १५…

Read More

वैभववाडी पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा…

सभापतीपदी सिद्धेश रावराणे, उपसभापतीपदी साची कोलते बिनविरोध.. ⚡वैभववाडी ता.०९-: वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे सिद्धेश दिलीप रावराणे तर उपसभापतीपदी भाजपाच्या सौ. साची सचिन कोलते यांची बिनविरोध निवड झाली आहे.दोन्ही पदांसाठी अन्य कोणतेही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.निवड जाहीर होताच विविध राजकीय, सामाजिक…

Read More

देवगड सभापतीपदी भाजपाचे गणेश राणे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल लोके यांची बिनविरोध निवड…

⚡देवगड ता.०९-: प्रशासकीय राजवटीच्या चार वर्षाच्या कालखंडानंतन देवगड पंचायत समितीवर लोकप्रतिनिधी राज आले असून तब्बल चार वर्षानंतर देवगड पंचायत समितीच्या कारभारावर सभापती व उपसभापती विराजमान झाले आहेत.सोमवारी झालेल्या निवडीमध्ये सभापतीपदी भाजपाचे गणेश राणे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल लोके यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेली चार वर्षे पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट होती.गटविकास अधिकारी हे प्रशासकीय कारभार…

Read More

जामसंडे आझादनगर येथे रिक्षा पलटी ; चालकासह चार जण गंभीर जखमी…

निरोम मधलीवाडीतील महिलांसह लहान मुलगी जखमी; मायलेक सुदैवाने बचावले ⚡देवगड ता.०९-: जामसंडे आझादनगर येथील एका अवघड वळणावर रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात निरोम येथील दोन महिलांसह एकूण चारजण गंभीर जखमी झाले आहेत. तेजस प्रकाश नारकर (३५, निरोम मधलीवाडी), मनोरमा रमेश राऊत (६५), नयना नामदेव राऊत (५३), आर्या सचिन राऊत (१२, सर्व रा. निरोम मधलीवाडी)…

Read More

दोडामार्ग पंचायत समितीत गवस यांचे वर्चस्व…

सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस.. ⚡दोडामार्ग ता.०९-: दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी पार्वती महादेव गवस यांची तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद शंकर गवस यांची बिनविरोध निवड झाली. विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. कोणतीही विरोधी उमेदवारी न आल्याने दोन्ही पदांवर बिनविरोध निवड निश्चित झाली.निवड जाहीर होताच दोघांनीही पदभार स्वीकारला. तालुक्यातील राजकीय वर्तुळात समाधानाचे वातावरण निर्माण झाले…

Read More

संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त दोडामार्गात उद्देशिका कोरीव दगडावर बसवण्याची मागणी…

⚡दोडामार्ग ता.०९-: भारतीय संविधानाच्या गौरवशाली ७५ व्या वर्षानिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी दोडामार्ग चौकात भारतीय संविधानाची उद्देशिका (Preamble) कोरीव दगडावर कायमस्वरूपी बसवण्यात यावी, अशी मागणी समाज जागृती मंच, दोडामार्गच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात तहसीलदार तसेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. दोडामार्ग येथील तहसील कार्यालयासमोर तसेच तालुक्यातील प्रमुख शासकीय कार्यालये आणि मुख्य…

Read More

नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्या…

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी;मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.०९-: हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसान…

Read More
You cannot copy content of this page