कणकवली काँग्रेस तालुकाध्यक्षपदाची धुरा प्रदीप मांजरेकर यांच्याकडे…
⚡कणकवली ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर…
⚡कणकवली ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. काही नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. तर कणकवली तालुका अध्यक्षपदी प्रदीप मांजरेकर यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच देवगड तालुकाध्यक्षपदी उमेश कुलकर्णी, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर,…
⚡कणकवली ता.०१-: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मान्यताप्राप्त तथा सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, हरकुळ बुद्रुक (ता. कणकवली) येथील द्वितीय वर्षाच्या वार्षिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयाने ९५ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये १३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १५ विद्यार्थी…
प्रांताधिकाऱ्यांच्या समर्थनासाठीही काही संघटना, सामाजिक कार्यकर्ते सरसावले:मराठी शाळा वाचविण्यासाठीही आंदोलन व्हावे.. ⚡कणकवली ता.०१-: शिक्षक व कर्मचारी संघटनांनी प्रांताधिकाऱ्यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन छेडल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ काही सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्तेही पुढे सरसावले आहेत. सत्यशोधक संघटनेतर्फे याचा बॅनरही प्रांत कार्यालयानजीक लावण्यात आला असून त्यात प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी…
५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमुक्तीपलीकडे शाश्वत शेतीचा शासनाचा व्यापक आराखडा.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०१-: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष लाभ वितरणास सुरुवात होणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने दिलेल्या सूचनांची प्रत्येक जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे.राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सुमारे ५६ लाख…
फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा कृषीदिनी गौरव… ⚡मालवण ता.०१-:मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील प्रगतिशील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर आणि त्यांचे वडील आबा फोंडेकर यांना महाराष्ट्र शासनाचा फलोत्पादन क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘उद्यान पंडित’ पुरस्कार कृषीदिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच मृदा व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख…
शिक्षक रुजू होईपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा पालकांचा निर्धार ⚡मालवण ता.०१-:मालवण तालुक्यातील तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील तीन शिक्षकांपैकी एक शिक्षक कामगिरीवर पाठविल्याने शिक्षकांची झालेली अपुरी संख्येमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांविनाच उघडली. शिक्षकांची पुन्हा नियुक्ती होईपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार…
तुंबलेल्या गटाराची तातडीने सफाई: नागरिकांकडून समाधान व्यक्त.. सावंतवाडी ता.०१-: मुसळधार पावसामुळे माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिर परिसरातील गटार तुंबल्याने पावसाचे पाणी काही नागरिकांच्या घरात शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सुधीर आडीवरेकर व नगरसेविका दुरळी रांगणेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी तात्काळ नगरपालिका कर्मचाऱ्यांना पाचारण करून तुंबलेले गटार साफ करण्याच्या…
मालवण (प्रतिनिधी) ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका विजयाबाई मेहता यांचे निधन झाल्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मालवण यांच्यावतीने शनिवार दि. ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता नगर वाचन मंदिर सभागृह, मालवण येथे विजयाबाई मेहता यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या श्रद्धांजली सभेला मालवणातील सर्व रंगकर्मींनी उपस्थित राहून आपला भावना व्यक्त…
मालवण (प्रतिनिधी) रोटरी क्लब मालवणच्या वतीने मालवण भरड येथील ‘श्री शिवाजी वाचन मंदिर’ या संस्थेला आधुनिक संगणक संच भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे वाचनालयाच्या डिजिटलायझेशनला आणि प्रशासकीय कामाला मोठी मदत होणार आहे. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत या संगणकाचा रीतसर शुभारंभ करण्यात आला. रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत वाचनालयाला…
तरुणांनी अत्याधुनिक शेतीकडे वळावे:जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०१-: शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेली मोठी उद्योगसाखळी आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचा स्वीकार केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करण्याची गरज…