नाथ पै नगर, बिजलीनगर येथील रहिवाश्यांना टँकरद्वारे केला पाणीपुरवठा
नगरसेवक सुशांत नाईक, योगेश मुंज यांनी घेतला पुढाकार ⚡कणकवली ता.१८-: गडनदी पत्रातील पाणीसाठा संपल्याने कणकवली नगरपंचायत मार्फत पुरविले जाणारे पाणी काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. मात्र कणकवली शहरातील नाथ पै नगर, बिजली नगर येथील काही रहिवाशी हे नगरपंचायतच्या पाण्यावर अवलंबून असल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. याची माहीती मिळताच शिवसेना गटनेते, नगरसेवक सुशांत नाईक यांनी…
