Headlines

वालावल बंगेवाडीमध्ये दरड कोसळून घराला तडे

भविष्यात माळीण दुर्घटना उद्भवण्याची भीती:ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी केली पाहणी ⚡कुडाळ ता.२१-: कुडाळ तालुक्यातील वालावल बंगेवाडीमध्ये दरड कोसळून बाबू उर्फ केशव बंगे यांच्या घराला तडे गेले. बंगे कुटुंबीयांनी ताबडतोब ६ घरे खाली केली. या ठिकाणी भविष्यात माळीणसारखी दुर्घटना उद्भवण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ या प्रकाराची दखल घ्यावी. केशव बंगे यांच्या घराची ओबीसी जिल्हाप्रमुख…

Read More

वालावल-हुमरमळा येथे घराची भिंत कोसळली…

प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी:अद्याप प्रशासन न फिरकल्यामुळे आकलेकर परिवाराने व्यक्त केली नाराजी ⚡कुडाळ ता.२१-: कुडाळ तालुक्यातील वालावल- हुमरमळा येथील कमळेवाडी येथे मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे भालचंद्र आप्पा आकलेकर यांच्या घराला तडे जाऊन भिंत कोसळली आहे. तरी याची प्रशासन अद्याप गंभीर दखल का घेत नाही असा सवाल आकलेकर परिवाराकडून केला जात आहे. हा प्रकार घडून कित्येक तास…

Read More

कुडाळमध्ये विद्युत पोलवर काम करत असताना शॉक लागून वायरमन गंभीर

⚡कुडाळ ता.२१-: कुडाळ शहरातील गवळदेव जवळील अभिमन्यू हॉटेल समोरील आज सकाळी वीज वितरण कंपनीच्या पोलवर काम करीत असताना कंपनीचा कर्मचारी धनंजय फाले (सध्या रा. पिंगुळी शेटकरवाडी, मूळ रा. महादेवाचे केरवडे) हा विजेचा तीव्र धक्का लागून पोलवरच चिकटून राहिला. सुदैवाने त्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला. वीजवितरणचे कर्मचारी, एमआयडीसी अग्नीशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर…

Read More

शेतकऱ्यांना काजू पिकासाठी हमीभाव मिळण्याची गरज

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घेतली भेट.. ⚡कणकवली ता.२१-: नैसर्गिक आपत्ती आणि वन्य प्राणी, कमी बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांसमोर शेती करावी किंवा नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेती करताना उत्पादन खर्च आणि उत्पादनाचा बाजारभाव याची तुलना केली तर नेहमी उत्पन्न वजाबाकीच्या दिशेने दिसते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. बागायतीचेही वन्य प्राणी नुकसान…

Read More

घाडीगांवकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 30 जुलै रोजी सत्कार

⚡कणकवली ता.२१-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई , सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने रविवार ३० जुलै २०२३ रोजी कणकवली येथे इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या घाडीगांवकर समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेत ७५ % पेक्षा अधिक किंवा इयत्ता १२ वी परीक्षेत ६० % पेक्षा अधिक…

Read More

निगुडेतील ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना

⚡बांदा ता.२१-: सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून निगुडे पाटीलवाडीतील तीन राहत्या घरांत पुराचे पाणी शिरले. तर पाटीलवाडीकडे जाणारा मार्ग काही काळ पूर्णपणे बंद होता. स्ट्रीट लाईटचे तीन विद्युत खांबही कोसळले अन रस्त्यावर अंधार पडला होता. तलाठी प्रणिता गव्हाणकर व वायरमन श्री. कुडव यांनी पाहणी केली व ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना केल्या. यावेळी दयानंद पाटील, श्यामसुंदर…

Read More

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द

⚡कुडाळ ता.२१-: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार त्यांच्या वाढदिवसानिमित्तचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करत असल्याचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. दोन दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील ग्रामस्थांवर दरड कोसळून मोठी आपत्ती ओढावलेली होती. यामध्ये काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. तर…

Read More

तालुक्यात पूर परिस्थिती असताना स्थानिक आमदार मात्र “वांटेड”…

रुपेश राऊळ यांची टीका: कबुलायतदार प्रश्न अर्धाच सुटला सांगून केसरकारांचा जनतेवर थंड दहशतवाद.. सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी तालुक्यात पूर परिस्थिती असताना जनतेने निवडून दिलेले स्थानिक आमदार मंत्री दीपक केसरकर हे वॉन्टेड असून जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे आता या ठिकाणी वालीच कोण नसल्याने येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही अशी टीका ठाकरे गटाचे तालुका प्रमुख…

Read More

एन.पी.मठकर यांची देशपातळीवरील पुरस्कारासाठी निवड

⚡वेंगुर्ला ता.२१-: ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅडव्होकेट अॅण्ड असोसिएशन दिल्लीतर्फे देशातील देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले असून यात वेंगुर्ला तालुक्यातील मठ-सिद्धार्थनगरचे सुपुत्र एन.पी.मठकर यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मठकर हे सिधुदुर्ग ओरोस न्यायालयातून ३७ वर्ष ९ महिने उत्कृष्ट न्यायालयीन सेवा पूर्ण करून अधिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.न्यायालयीन सेवेत असताना मठकर यांनी राज्य सरकारी कर्मचारी…

Read More

राहत्या घराची भिंत कोसळून ८० हजारचे नुकसान…

बांदा येथील घटना: तलाठीकडून पंचनामा ⚡बांदा ता.२१-: बांदा शहरातील उभाबाजार येथील सुदन भास्कर वाळके यांची राहत्या घराची मातीची भिंत मुसळधार पावसाने आज सकाळी कोसळली. वाळके यांचे ८० हजार रुपये नुकसान झाले. तलाठी फिरोज खान यांनी नुकसानीचा पंचनामा केला. उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्या श्रेया केसरकर, शैलेश केसरकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली….

Read More
You cannot copy content of this page