Headlines

Global Maharashtra Breaking News

श्री गावडे काका महाराज यांच्याकडून कारीवडेतील गरजू महिलेला घरासाठी धनादेश…

बांदा/प्रतिनिधीश्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू. सदगुरु श्री गावडे काका महाराज संस्थापीत श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी या सामाजीक संस्थेने समाज बांधीलकी जपत निराधारांना आधार या योजनेखाली सावंतवाडी तालूक्यातील कारीवडे गावात राहणाऱ्या पार्वती शंकर मेस्त्री या गरीब व गरजू कुटुंबाला घर बांधणीसाठी आर्थिक मदतीचा धनादेश दिला. श्रीमती मेस्त्री या महिलेला सहा मुले असून…

Read More

नारायण राणे यांचे पार्सल बांधण्याची कोणाचीही ताकद नाही…

कोणाचे पार्सल बांधायचे हे भाजपने ठरविले आहे:भाजपच्या केनवडेकर यांचा उबाठा सेनेच्या खोबरेकर यांना प्रत्युत्तर. मालवण (प्रतिनिधी) नारायण राणे यांच्यावर टीका करणाऱ्या ठाकरे शिवसेनेच्या हरी खोबरेकर यांनी प्रथम खास. विनायक राऊत यांनी कोणता विकास केला हे सांगावे. राणे यांचे पार्सल बांधण्याची वल्गना करणाऱ्या खोबरेकर यांनी राणे यांचे पार्सल बांधण्याची ताकद कोणाचीही नाही हे लक्षात ठेवावे. ज्यांची…

Read More

मांद्रेकर यांनी यापुढेही मराठा योध्यांचे पराक्रम लिखित स्वरूपात पुढे आणावे…

अभिनेते अनिल गवस यांनी केले आवाहन:भावार्थ मांद्रेकर लिखित सरनोबत हंबीरराव पुस्तकाचे प्रकाशन.. ⚡बांदा ता.११-: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे शूर योद्धा यांचा इतिहास, त्यांची युद्धनीती, गनिमी कावे हे आताच्या पिढीला समजणे अत्यंत आवश्यक आहे. गोव्याच्या मातीतील लेखक भावार्थ मांद्रेकर यांनी लिहिलेले सरनौबत हंबीररराव हे पुस्तक खरोखरच वाचनीय आहे. आपण स्वतः ही व्यक्तीरेखा…

Read More

तळवडे ग्रामपंचायतीमध्ये 72 लाखाचा अपहार चौकशीत सिद्ध…

तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्यांसह अन्य दहाजणांचा सहभाग ; नारायण जाधव यांची माहीती.. ⚡सावंतवाडी ता.११-: तळवडे ग्रामपंचायतीच्या १४ व १५ वित्त आयोग तसेच ग्रामनिधीमध्ये तब्बल ७२ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीतून सिद्ध झाले आहे. या अपहारात तत्कालीन ग्राम विकास अधिकारी नामदेव तांबे यांसह अन्य दहा जणांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधितावर फौजदारी गुन्हा…

Read More

बांदा शहरात रमजान ईद उत्साहात साजरी…

⚡बांदा ता.११-: बांदा शहरात आज रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवानी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्यात.बांद्याचे माजी उपसरपंच तथा भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांना माजी आमदार राजन तेली यांनी भेट देत शुभेच्छा दिल्यात. तसेच बांद्याचे माजी सरपंच अक्रम खान यांना विशाल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपचे युवा नेते…

Read More

ओटवणे माडवपातळवाडी सती मंदिरातील वारकरी दिंडी ठरली लक्षवेधी…

सावंतवाडी ता.११-: ओटवणे मांडवफातरवाडी येथील श्री सती देवी मंदिरात गुढीपाडव्याच्या वार्षिक महोत्सवातील वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली. या वारकरी दिंडीत वारकरी वेशात आबालवृद्धांनी ठेका धरीत सर्वांचेच लक्ष वेधले. सोबतीला भालावल येथील वारकरी भजन मंडळाच्या अखंड हरिनामामुळे या दिंडीची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.सती मंदिरातील गुढीपाडव्याच्या वार्षिक उत्सवानिमित्त सालाबादचे धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी मुलांचे विविध मनोरंजनात्मक खेळानंतर शतदीप…

Read More

कै. बाळकृष्ण जाधव कुटूंबाला विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदत…

⚡दोडामार्ग ता.११-: दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील होमगार्ड सेवेत असलेले बाळकृष्ण जाधव यांचे मार्च महिन्यात झाडावरून पडून दुःखद निधन झाले. आज भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कै. बाळकृष्ण यांच्या आईची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी विशाल परब यांनी त्यांना आर्थिक मदत देऊन यापुढे केव्हाही अडचण असली तर हाक मारा…

Read More

अन्वय सापळे इंग्रजी माध्यमातून तालुक्यात प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला येथील मदर तेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये पहिलीत शिकणारा अन्वय जगदीश सापळे याने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत इंग्रजी माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला. त्याने १०० पैकी ८४ गुण मिळवित ब्राँझ मेडल प्राप्त केले. त्याला शिक्षिका स्मिता डुबळे व पालकांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

अक्रम खान यांना विशाल परबांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा…

⚡बांदा ता.११-: रमजान ईद निमित्त बांद्याचे माजी सरपंच अक्रम खान यांच्या निवासस्थानी विशाल परब यांनी सदिच्छा भेट देत अक्रम खान यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चराठा ग्रा. पं. चे उपसरपंच अमित परब, केतन आजगावकर, ज्ञानेश्वर सावंत तेजस माने, ओमकार पावसकर, श्रेयस परब आदी उपस्थित होते.

Read More

कोकणाच्या विकासासाठी उद्धव ठाकरेंनी काय केले…?

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा सवाल:कणकवलीत भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा… ⚡कणकवली ता.११-: उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी कोकणासह सिंधुदुर्गाच्या विकासासाठी काय केले? असा सवाल केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार विनायक राऊत हे भाजपमुळेचे खासदार होऊ शकले. मात्र, मागील 10 वर्षांत त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच काम केले…

Read More
You cannot copy content of this page