Headlines

मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांना देवगड पोलिसांच्या नोटीसा

देवगड ता.०४-:* सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ५ अथवा ५ हुन अधिक व्यक्तिनी जमाव करणेस बंदी घालण्यात आली आहे तसेच लाठी काठ्या दगड,शस्त्रे इत्यादी वस्तू बाळगणे ,व शांतता भंग होईल असे कृत्य करण्यास दि २४ एप्रिल २२ते ८ मे २२ रोजी २४.०० वा. कालावधीपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…

Read More

ओटवणे करमळगाळू पेरणेवाडी रस्त्याचे काम अर्धवट

ग्रामस्थांचे होतात हाल:ठेकेदारावर कारवाई करा ;अन्यथा उपोषण करण्याचा राजेंद्र जाधव यांचा इशारा सावंतवाडी ता.०४-:* मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या ओटवणे करमळगाळू, पेरणेवाडी या रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत सोडले असून यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे ठेकेदाराने केलेल्या या कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा कुडाळ येथील मुख्यमंत्री सडक कार्यालयासमोर ग्रामस्थांना घेऊन…

Read More

आयआयटी पवई इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बबली राणे यांचा मदतीचा हात

कणकवली ता.०४-:* माणुसकी हा आपला स्वभाव असल्याचे ओसरगाव माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी दाखवून दिले असून मुंबई येथील आयआयटी पवई इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मदतीला धावत माणुसकीचा धर्म जोपासला आहे. वेळ रात्री दोनची .गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर ओसरगाव येथे फॅन बेल्ट तुटल्याने गाडी बंद पडली. त्याच वेळी रात्रीचा फेरफटका मारण्यासाठी निघालेले…

Read More

मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना बजावल्या नोटीसा

कणकवली ता.०४-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्या करिता 3 मे ची डेडलाईन दिल्यानंतर जर 3 मेपर्यंत हे भोंगे उतरवले नाही तर मशिदीसमोर आवश्यकता भासल्यास परवानगी घेऊन हनुमान चालीसा वाजवा असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतर राज्यभरात मनसे कडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती. दरम्यान संभाजीनगर मध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे…

Read More

नांदगाव सोसायटी चेअरमनपदी गौरीशंकर खोत बिनविरोध

व्हाईस चेअरमनपदी अतुल सदडेकर यांची निवड;घोषणाबाजी करत केला जल्लोष कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील मोठ्या नांदगाव सोसायटी निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत बळीराजा पॅनेलचे १३ संचालक निवडणूक आले होते.या सोसायटी चेअरमनपदी शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग सहसंपर्कप्रमुख गौरीशंकर खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर व्हाईस चेअरमनपदी अतुल सदडेकर यांची निवड वर्णी लागली आहे.नूतन चेअरमन गौरीशंकर खोत, व्हाईस चेअरमन अतुल…

Read More

सावंतवाडी येथील स्वामी मठात स्वामी पुण्यतिथी सप्ताह भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न…

सावंतवाडी ता.०४-:* दिंडोरी प्रणित अखिल भारतीय सावंतवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात २२ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह भक्तिपूर्ण उत्साहात स्वामी सेवेकरांच्या उपस्थित पार पडला आहे. यावेळी या सात दिवसात अखंड नाम जप, अखंड श्री स्वामी समर्थ सारामृत वाचन आणि अखंड वीणा तसेच सगळ्यात दुर्मिळ आणि स्वामीच्या अगदी जवळ…

Read More

मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाऊंडेशनचा बेबी कोळेकर यांना मदतीचा हाथ …

सामाजिक बांधिलकी ने केले आव्हान; रमजान ईदचे औचित्य साधून घर दुरुस्तीसाठी केली आर्थिक मदत सावंतवाडी ता.०४-:* काही दिवसांपूर्वी सामाजिक बांधिलकी या संस्थे मार्फत बेबी कोळेकर यांच्या घर दुरुस्ती व छपरासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील मुस्लिम हेल्थ अँड वेलफेअर फाउंडेशन या संस्थेने रमजान ईद सणाचे औचित्य साधून आर्थिक मदत केली. सर्व धर्म समभाव व…

Read More

सत्ताधारी आमदार त्यांच्याशी सेटलमेंट ‘तर’ करत नाहीत ना…?

राजन तेली यांचा सवाल… सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सुरू असणाऱ्या खाणीवर चुकीच्या पद्धतीने पर्यावरणाला हानी पोचणार काम होत आहेत. तसेच त्या उत्खननाची बेदरकारपणे वाहतूक होत आहेत. वाहतूक करणारे डंपर ओव्हरटेक करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी येत्या आठ दिवसांत यावर…

Read More

नियमांची पायमल्ली करणाऱ्या खणींवर येत्या आठ दिवसांत कारवाई करा…

राजन तेली; अन्यथा भाजप करणार तीव्र आंदोलनराजन *⚡सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील खाणींमध्ये पर्यावरण विषयक नियमांची पायामल्ली करून परवागीहून जास्त प्रमाणात उत्खनन होत आहे. तसेच त्या खनिजाची ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने शासनाने घालून दिलेले निर्बंध मोडले जात आहेत. तसेच त्यांच्याकडून योग्य रॉयल्टी भरली जात नसल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांच्यावर तातडीने योग्य ती…

Read More

पाडलोसमधील शेतकऱ्याचे उपोषण स्थगित

अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन : नियोजन शून्य कामाचा परिणाम बांदा दि.०४-:* तिलारी पाटबंधारे विभागाच्या नियोजन शून्य कामामुळे आपल्या शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले. स्वतःची जमीन असताना आज माझ्यावर खंडाची शेती करण्याची वेळ तिलारी पाटबंधारे विभागाने आणली आहे असे सांगत शेतकरी राजू माधव यांनी आपला रोष अधिकाऱ्यांवर व्यक्त केला. अखेर ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहून अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते श्री…

Read More
You cannot copy content of this page