मत्स्य शेतकरी व मत्स्य संवर्धक यांचा सिंधुरत्न योजनेत समावेश करावा- रविकिरण तोरसकर
⚡मालवण ता.१५-: रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मत्स्यसंवर्धनास बळकटी देण्यासाठी मत्स्यसंवर्धन संबंधित मत्स्य शेतकरी तथा मत्स्यसंवर्धक यांचा सिंधुरत्न समृद्ध योजनेमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक साधनसामग्रीवर आधारित पर्यटन, मत्स्यव्यवसाय व सूक्ष्म उद्योगांचा…
