Headlines

आव्हान स्वीकारल्यानंतर मंत्री केसरकर यांनी रडत बसू नये

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : युती कशाला पाहिजे मैत्रीपूर्ण लढण्याचा लगावला टोला ⚡सावंतवाडी ता.०८-: केसरकर यांनी दिलेल आवाहन मी स्विकारीन. परंतु केसरकर यांनी वरिष्ठ नेत्यांकडे जाऊन युतीसाठी रडत बसू नये, असा पलटवार भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केला. दरम्यान युती कशाला पाहिजे ? मैत्रीपूर्ण लढत लढू, असा टोलाही ही तेली यांनी यावेळी केसरकर…

Read More

राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने दिलीप भालेकर यांना सन्मानित

⚡सावंतवाडी ता.०८-: अखिल भारतीय धोबी (परिट) महासंघातर्फे रायगड रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अखिल भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, राष्ट्रीय नेते राजेंद्रशेठ आहेर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शांतारामभाऊ कदम यांच्या…

Read More

भोसले फार्मसी कॉलेजचे प्रा.विनोद मुळे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी प्राप्त

⚡सावंतवाडी ता.०७-: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमधील फार्माकोलॉजी विभागप्रमुख प्रा. विनोद मुळे यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएचडी प्राप्त केली. प्रा.विनोद मुळे हे कॉलेजच्या स्थापनेपासून कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत फार्माकोलॉजी या विषयावर विविध रिसर्च पेपर सादर केले आहेत. ‘इव्हॅल्युएशन ऑफ मेडिसिनल प्लॅन्ट फॉर अँटीडायबेटिक ऍक्टिव्हिटी इन ऍनिमल मॉडेल्स’ या विषयावर त्यांनी शोधनिबंध सादर केला होता. मधुमेहावर…

Read More

शाहू महाराजांचे विचार अमलात आणणे हीच त्यांच्यासाठी आदरांजली

नट वाचनालय उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांचे प्रतिपादन बांदा/प्रतिनिधीराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जनतेविषयी विशेष कळवळा होता. त्यांनी शेतकऱ्यांसाठी व शैक्षणिक विकासासाठी विविध योजना अमलात आणल्या. म्हणूनच त्यांना लोकराजा म्हणून मान्यता होती. त्यांच्या विचारांना आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेलं असे प्रतिपादन नट वाचनालयचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी येथे केले.येथील नट वाचनालयात छत्रपती शाहू महाराज…

Read More

बांदा केंद्र शाळेत वर्षभर नियमित उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

⚡बांदा ता.०७-: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून गुणवत्ता विकास घडवून आणणाऱ्या जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत वर्षभर नियमितपणे १००% उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. बांदा केंद्र शाळा ही जिल्ह्यातील सर्वात पटसंख्या असलेली शाळा असून या शाळेची पटसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे .या शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात. सन २०२२-२३या शैक्षणिक…

Read More

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माझ्यात वाद लावण्याचा तेलींचा प्रयत्न…

मंत्री दिपक केसरकर यांचा आरोप; तिसऱ्यांदा आमदारकीसाठी प्रयत्न मात्र हॅट्रिक नक्कीच करू ⚡सावंतवाडी ता.०७-: जिल्हा परिषद अध्यक्ष होऊनही स्वतःच्या जिल्हापरिषद मतदार एकदा आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघात दोनदा पराभूत झालेले राजन तेलींना पुन्हा येथे आमदारकी लढवायची आहे आणि त्यामुळेच याठिकाणी भाजपा शिवसेना युतीत वाद लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी आज…

Read More

सावंतवाडी पालिकेच्या स्विमिंग पूल मध्ये बुडून युवकाचा मृत्यू..

⚡सावंतवाडी ता.०७-: जिमखाना मैदान येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून ग्लेन जॉन डिसोझा, वय. १९ रा. चराठा सावंतवाडी येथिल युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्विमींग करत असताना पाण्यात उडी घेतल्यानंतर तो वर आला नाही.यावेळी येथे उपस्थित ट्रेंनरनी त्याला लागलीच बाहेर काढलं. परंतु, तो प्रतिसाद देत नसल्यानं त्याला रूग्णालयात हलवले. मात्र, यानंतर काही वेळानं त्याला मृत घोषित करण्यात आले….

Read More

दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

⚡मालवण ता.०७-: मालवण येथील जि. प. शाळा दांडी या प्रशालेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा २०२३ संपन्न झाला. मुलांच्या शिक्षणात माता पालकांचा सहभाग वाढावा, गावात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, ५ ते ७ या वयोगटातील जी मुले या वर्षी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत त्यांना अंक ओळख, अक्षर ओळख, सोप्या शब्दांचे वाचन, पूर्ण वाक्यात बोलता यावे,जेणेकरून पुढे जाऊन…

Read More

बांदा केंद्र शाळेत लोकराजा शाहू महाराजांना वंदन

⚡बांदा ता.०७-: सामाजिक समतेचा आग्रह धरत आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या उद्धारासाठी देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या १०१व्या पुण्यतिथी शनिवारी बांदा केंद्र शाळेत अभिवादन करण्यात आले. १००सेकंद नि:शब्द राहत विद्यार्थी, शिक्षक व पालकांनीमानवंदना देत लोकराजाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाला गतवर्षी ६मेला सुरुवात झाली होती.शनिवारी या स्मृती शताब्दी वर्षाचा समारोप झाला. यावेळी…

Read More

पाडलोसमध्ये शॉर्टसर्किटमुळे काजुबाग जळाली

तीन ते चार लाखांचे नुकसान : आगीच्या ज्वालानी शेतकरी अस्वस्थ ⚡बांदा ता.०७-: पाडलोस केणीवाडा येथे रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आंबा काजू बागायतीस आग लागली. यात पाच शेतकऱ्यांचे सुमारे तीन एकरावर असलेली 400 ते 500 काजू, आंबा कलमे, बांबूची झाडे असे मिळून तीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला. रविवारी सुट्टीचा दिवस…

Read More
You cannot copy content of this page