Headlines

आचरे गोळीबार प्रकरणातील प्रतीक हडकरला जामीन

⚡मालवण ता.२२-: आचरा येथील गौरव प्रकाश पेडणेकर यांना ४ मे रोजी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी प्रतीक एकनाथ हडकर (२१, रा. चिंदर सडेवाडी) याला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. आहे. संशयितातर्फे जामिनासाठी अॅड. हेमेंद्र गोवेकर व अॅड. समीर कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केला होता. आचरा येथे घडलेल्या गोळीबार व…

Read More

सावंतवाडीत ब्लड बँकेतील टेक्निशियन सोमवारपर्यंत भरा

अन्यथा तीव्र आंदोलन; देव्या सुर्याजींचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२२-: उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी ही केवळ दोन जणांच्या जीवावर सूरु आहे. पदभरती करणं आवश्यक असताना केवळ दोघांच्या जीवावर ही ब्लड बँक सुरू आहे. वारंवार निवेदने देऊन इशारे देऊन देखील पदभरती केली जात नाही आहे. वैद्यकीय प्रशासनाचा याकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत ८ टेक्निशियन आहेत. यातून…

Read More

आंबोली घाटातील मृतदेहाची ओळख पटण्यास दुसर्‍या दिवशीही अपयश…

दोन टिम तपासासाठी रवाना.;पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांची माहीती ⚡सावंतवाडी ता.२२-:आंबोली घाटातील मृतदेहाची ओळख पटण्यास दुसर्‍या दिवशीही पोलिसांना अपयश आले असून सावंतवाडी पोलिस ठाण्याचे दोन पथक गोवा व कोल्हापूर येथे तपासाठी पाठविण्यात आल्याची माहीती पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.

Read More

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचा बांदा पोलीस ठाण्यात सत्कार

भेटवस्तू देवून देण्यात आल्या शुभेच्छा बांदा/प्रतिनिधीबांदा पोलीस ठाण्यातून बदली होऊन गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आज पोलीस निरीक्षक श्यामराव काळे व उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. येथील पोलीस ठाण्यातून ज्योती हरमलकर व विठोबा सावंत यांची कुडाळ पोलीस ठाणे तर वाहतूक पोलीस विजय जाधव यांची दोडामार्ग पोलीस ठाणे येथे प्रशासकीय बदली…

Read More

बी एस एन एल च्या अधिकाऱ्यांना बांदा ग्रामस्थांनी धरले धारेवर

भोंगळ कारभारा विरोधात व्यक्त केली नाराजी बांदा/प्रतिनिधीभारत संचार निगम लि.च्या मनमानी व भोंगळ कारभाराविरुद्ध आज बांदा ग्रामपंचायत सदस्य व त्रस्त नागरिक यांनी बीएसएनएलच्या सावंतवाडी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. बांदा येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरना विज गेल्यावर बॅकअप बॅटरी नसल्याने लगेच मोबाईल मनोरे बंद होतात व मोबाईल सेवा ठप्प होते. याबाबत महिन्याभरापूर्वी बीएसएनएलला…

Read More

गुगलवरून नातेवाइकांचा शोध घेत मतिमंद मुलीला दिले ताब्यात

जीवन आनंद संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी ⚡कुडाळ ता.२२-: जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार, वंचित आणि मानसिक आजारी व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ८ महिन्यांपूर्वी मुंबईहून गोव्याला गेलेल्या रविना खंडारे (वय २४ वर्षे) या मतिमंद मुलीला नुकतेच गुगलवरून तिच्या कुटुंबाचा शोध घेऊन पुन्हा एकत्र आणले. यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक सचिव संदीप परब म्हणाले की,…

Read More

प्रेयसीच्या पतीच्या खून प्रकरणी एकाला जन्मठेप

बांदा गडगेवाडी येथे जून २०२१ मध्ये घडली होती घटना;पश्चिम बंगाल राज्यातील मूळ रहिवाशी ओरोस ता.२२-: पत्नी बरोबर असलेल्या प्रेम संबंधांस विरोध केला म्हणून पतीचा खून करणाऱ्या सुखदेव सोपान बारीक (वय ३०) राहणार बाजबेलेनी, ता. गोवरदंगा, जि. उत्तर २४ परगणा, राज्य पश्चिम बंगाल याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने…

Read More

गणित प्रज्ञा परीक्षेत कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी येथील एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. प्रशालेतील इयत्ता पाचवीतील कुमारी गार्गी राजेश परब व कुमार पियुष नाना शिर्के यांनी सिल्वर मेडल तसेच इयत्ता आठवीतील कुमार भाग्यम संदीप धुरी यांनी…

Read More

वेंगुर्ला येथील ‘हातभार चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने आयोजित ‘नेत्र तपासणी’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

या शिबिराचे उदघाटन वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव,मुख्याध्यापक आत्माराम सोकटे,हातभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर,वासुदेव गावडे,एकनाथ चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजय पिळणकर, जिल्हासचिव यश माधव,’शुभांगी ऑप्टिक्स’ चे समीर हरमलकर,यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष कंकाळ यांनी शिबिरास भेट देऊन “हातभार चॅरिटेबल ट्रस्ट” च्या या…

Read More

पूर्ण कर्ज भरल्यानंतरच सोसायट्या करू शकतात कर्ज नूतनीकरण

सहकार आयुक्तांचे आदेश:शिक्षणमंत्री केसरकर यांना निवेदन देत आदेश रद्द करण्याची केली मागणी ⚡सावंतवाडी ता.२२-: सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार सोसायटीचे कर्ज पुर्ण भरणा केल्यानंतरच कर्ज नुतनीकरण करण्यात यावे असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शेतक-यांना खरीप हंगामात शेती, बागायती, खते, बी-बीयाणे, औजारे व इतर शेती साधने खरेदी करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. या अनुषंगाने एका लेखी…

Read More
You cannot copy content of this page