मोती तलावातील गाळ काढण्याची मागणी
संजू शिरोडकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सावंतवाडी,ता.२२-:* येथील मोती तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. त्याचा परिणाम परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यावर होत असून, संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी गाळ काढून तलावाला नवसंजीवनी देण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी भाजपचे माजी शहराध्यक्ष संजू शिरोडकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना दिले आहे….
