Global Maharashtra Breaking News

कसई-दोडामार्गसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर…

शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार:नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची माहिती.. ⚡दोडामार्ग ता.१४ वैभव साळकर-: गेल्या अनेक वर्षांपासून शहरवासीयांची डोकेदुखी ठरणारा कसई – दोडामार्गचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कायमचा मिटणार आहे.कारण शहरासाठी साठवण टाकीसह असलेला तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांचा जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर झाला आहे.अशी माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी गुरुवारी दिली. शहरासाठी मंजूर झालेल्या…

Read More

राष्ट्रीय महामार्गावरील रंबलिंग स्ट्रिप्सला मारणार पांढरेपट्टी…

उपअभियंता सगळे यांचे माजी नगरसेवक सुरेश भोकरे यांना आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.१४-:शहरात मुंबई गोवा जुन्या राष्ट्रीय महामार्गावर घालण्यात आलेल्या रम्बलींग स्ट्रिप्स मुळे वाहनांना बसणार्‍या हादर्याची तीव्रता लक्षात घेता ती कमी करण्यासाठी सदर स्ट्रिप्स जवळ येत्या आठ दिवसात पांढरे पट्टे मारण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे यांनी आज माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्यासह…

Read More

वैभववाडीत 18 ते 20 मार्च रोजी जाणता राजा नाटकाचे आयोजन…

350 व्या शिवराज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त शासनाचे नियोजन:मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ.. वैभववाडी प्रतिनिधी३५० व्या शिवराज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित १८ मार्च ते २० मार्च या कालावधीत जाणता राजा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश…

Read More

अंगणवाडी स्तरावरील कामकाज झाले ‘स्मार्ट’…

अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना 1 हजार 588 स्मार्ट फोनचे वाटप.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 1 हजार 539 अंगणवाड्या कार्यरत असून या अंगणवाडयांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका तसेच बीट स्तरावर कार्यरत असलेल्या 49 पर्यवेक्षिका असे एकूण 1 हजार 588 स्मार्टफोनचा पुरवठा राज्य शासनामार्फत करण्यात आलेला आहे.या स्मार्टफोन सॅमसंग कंपनीचे असून मोबाईल…

Read More

स्टार्टअप महाकुंभ एक्स्पोजर व्हिजिटसाठी मालवणच्या दोन विद्यार्थिनींची निवड…

⚡मालवण ता.१४-: दिल्ली येथे १७ ते २० मार्च दरम्यान होणाऱ्या स्टार्टअप महाकुंभ एक्स्पोजर व्हिजिटसाठी महाराष्ट्र स्टार्टअप इनोव्हेशन सोसायटी, महाराष्ट्र शासन यांच्याकडून मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी निकिता शर्मा आणि महेक शेख यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांची महाराष्ट्र स्टार्टअप इनोव्हेशन सोसायटीने आयोजित केलेल्या स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत निवड झाली…

Read More

ठाकरे शिवसेना ‘सिडको हटाव, गाव बचाव’ आंदोलन छेडणार…

हरी खोबरेकर:महाराष्ट्र शासनाने या कोकण वासियांवर अन्याय करण्याचे काम केले.. ⚡मालवण ता.१४-: कोकण किनारपट्टीवरील गावे विकासासाठी सिडकोच्या ताब्यात देऊन राज्य शासनाने कोकणवासीयांवर अन्याय करण्याचे काम केले आहे. त्यामुळे इथल्या गाव वहिवाटी या अबाधित राहिल्या पाहिजेत यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने ‘सिडको हटाव आणि गाव बचाव’ हे आंदोलन येत्या काळात छेडले जाणार आहे, असे…

Read More

कलमठ बिडयेवाडी येथील युवकाची राहत्या घरात आत्महत्या..

कणकवलीकणकवली बिडयेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या संजय रामसिंगर उपाध्याय (३८, मूळ उत्तरप्रदेश) याने राहत्या घरातील सिलिंग फॅन कडील ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वा. च्या सुमारास उघडकीस आला. याबाबतची खबर पत्नी प्राची संजय उपाध्याय यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. संजय उपाध्याय यांची पत्नी प्राची उपाध्याय दुपारी मुलांना आणायला शाळेमध्ये दिली असता…

Read More

सावंतवाडी मतदारसंघातील धान्य कोठारांची तात्काळ तपासणी करा…

नवोदय विद्यालय विद्यार्थी विषबाधा पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा ची मागणी:जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी प्रांताधिकारी यांना दिले निवेदन ⚡बांदा ता.१४-: सांगेली येथील नवोदय विद्यालयात मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने या पार्श्वभूमीवर सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील पोषण आहार पुरविणाऱ्या सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील धान्य कोठाराची तात्काळ तपासणी करावी अशी मागणी भारतीय जनता…

Read More

अनधिकृत मासेमारी अंमलबजावणी पक्षाचे श्रेय आमदार वैभव नाईक यांनाच…

अन्य कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये:ठाकरे शिवसेनेचे नेते बाबीजोगी यांचा इशारा.. मालवण, दि प्रतिनिधीअनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. याचे संपूर्ण श्रेय हे आमदार वैभव नाईक यांनाच आहे. त्यांनीच सातत्याने विधानसभेत आवाज उठविल्यानंतर अध्यक्षांनी याची कार्यवाही करण्याची सूचना प्रशासनास दिली. त्यामुळेच याबाबतचा शासन निर्णय झाला आहे…

Read More

वेंगुर्लेतील 48, मालवण मधील 21 गावांचा डोंगरी विभागात समावेश…

राज्य शासनाच्या निर्णयाचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले स्वागत:समाविष्ट गावांना विकासासाठी स्वतंत्र निधी तसेच शिक्षणात दोन टक्के मिळणार आरक्षण.. ओरोस ता.१४-: राज्य शासनाने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ७७ तालुके डोंगरी म्हणून नव्याने घोषित केले आहेत. याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला झाला आहे. आतापर्यंत एकही गाव डोंगरी नसलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील ४८ तर मालवण तालुक्यातील २१…

Read More
You cannot copy content of this page