मुलांच्या कौशल्याला खतपाणी घाला…

शांताराम नाईक: वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.०९-: शाळा हे देवालय आहे. पालकांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करा आणि त्यांच्या कौशल्याला खतपाणी घाला असे आवाहन ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम उर्फ अण्णा नाईक यांनी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी केले. शाळेच्या भौतिक सुविधांसाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत उभी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अॅड.नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले. पालकांनी…

Read More

परीट समाजाच्या बैठकीला दिलीप भालेकर यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड…!

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिरच्या हॉलमध्ये महाराष्ट्राचे परीट समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष शांताराम भाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली दिलीप भालेकर यांची परीट समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शांताराम भाऊ कदम, कोकण विभागीय अध्यक्ष नंदकिशोर राक्षे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिपक कदम, रायगड जिल्हाध्यक्ष विलास तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. मान्यवारांचा यथोचित सत्कार करण्यात…

Read More

चौकुळ येथे एम एस सी आय टी संगणक कक्ष सुरू…

⚡आंबोली,ता.९-: चौकुळ येथे आजी माजी विद्यार्थी मेळावा २०२२,चौकुळ यांच्या सौजन्याने चौकुळ येथे एम एस सी आय टी संगणक कक्ष सुरू करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत संगणक कक्षाचे उदघाटन चौकुळ ज्युनिअर काॅलेज येथे करण्यात आले. या प्रसंगी गावचे देवकार हिरुदादा गावडे,सोनूदादा गावडे, गिरीभाई गावडे, विजय तुकाराम गावडे, प्रा. मधुकर गावडे,अरुण गावडे मुंबई ग्रामस्थ संघटनेचे अध्यक्ष शामभाई गावडे,…

Read More

गोपुरी जीवन शिक्षण शाळेला वाढता प्रतिसाद…

सुमारे १२० विद्यार्थी झाले सहभागी… ⚡कणकवली ता.०८-: गोपुरी आश्रमच्या माध्यमातून पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेल्या ‘जीवन मूल्य शिक्षण शाळा’ या उपक्रमास कणकवली व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. मुलांसाठी हस्तकला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षिका अस्मिता परब यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी व स्वावलंबन शिकवण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या…

Read More

शो बाजी करून मच्छीमारांचे प्रश्न सुटणार नाहीत…

निलेश राणे:यापुढे समुद्रात अवैधरित्या मासेमारी करण्यास येणाऱ्या मलपीतील एकाही ट्रॉलरला परत जाऊ देणार नाही … ⚡मालवण ता.०८-: परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांमध्ये जी भीती निर्माण करणे गरजेचे होती ती कशी होईल. त्यासाठीच आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर करून जी ताकद दाखवण्याची गरज होती ती दाखविली. त्यामुळेच जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मलपीतील ट्रॉलर्स पकडण्याची कार्यवाही मत्स्यव्यवसाय खात्याकडून झाली. यातून मोठ्या प्रमाणात…

Read More

राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा अर्चना घारे परब यांची फेर निवड…

⚡सावंतवाडी ता.०८-: राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा अर्चना घारे परब यांची फेरनिवड करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र आज त्यांना अँड. रोहिणी खडसे यांच्या हस्ते देण्यात आले. संघटना बांधणी करिता अर्चना घारे यांच्याकडे पुन्हा एकदा ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Read More

सामाजिक बांधिलकीकडून रुग्णांसाठी ५० ब्लॅंकेट्स उपजिल्हा रुग्णालयाला सुपूर्त…

⚡सावंतवाडी ता.०८-: थंडीचे प्रमाण वाढल्या कारणाने थंडीपासून रुग्णांचा बचाव होण्याकरिता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व राजधानी ट्रॅव्हलर्सचे ट्रॅव्हलर्स एजन्सी चे मालक शोभन भाई यांच्या संयुक्त विद्यमानाने राणी जानकीबाई सुतिका गृह व उपजिल्हा रुग्णालयात एकूण ५० ब्लॅंकेट्स देण्यात आली.राजधानी ट्रॅव्हल्स एजन्सी चे मालक शोभन भाई यांनी सदर ब्लॅंकेट संस्थेची सचिव समीरा खलील यांचे पती आमीन खलील यांच्याजवळ…

Read More

बॅ. नाथ पै पुण्यतिथीनिमित्त कुडाळ येथे १५ रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा…

⚡मालवण ता.०८-:बॅ. नाथ पै यांच्या ५४ व्या पुण्यतिथीनिमित्त बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ येथे दि. १५ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय (इयत्ता ८वी ते १२वी ) व खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी शालेय गट- इयत्ता आठवी ते बारावीसाठी विषय: बॅ. नाथ पै आणि कोकणचा विकास, सामान्य जनतेचे कैवारी बॅ. नाथ…

Read More

मानसिक आरोग्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची-:डॉ. रुपेश पाटकर…

⚡मालवण ता.०८-: भावनिक आरोग्य हे सामूहिक असते, त्यामुळे एकमेकांचे भावनिक आरोग्य सांभाळले पाहिजे, यासाठी भावनिक बुद्धिमत्ता आवश्यक असून ती विकसित केली पाहिजे. आपल्या मानसिक आरोग्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची आहे, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट्स व स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा आजीवन अध्यायान…

Read More

शिवसेना पक्ष वाढीच्यादृष्टिकोनातून उद्यापासून गाव तिथे शिवसेना शाखा अभियान सुरू…

आमदार निलेश राणे:आगामी काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरणार.. ⚡मालवण ता.०८-: शिवसेना पक्ष वाढीच्यादृष्टिकोनातून उद्यापासून गाव तिथे शिवसेना शाखा अभियान राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत गावातील संघटना,गावातील बूथ सक्षम करण्यासाठी तसेच पक्षाला प्रत्येक बूथ वर जास्तीत जास्त मतदान कसे वाढेल यासाठी विशेष प्रयत्न केले जातील आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका,…

Read More
You cannot copy content of this page