ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याचे रुपेश राऊळ यांनी केले स्वागत….

*💫आंबोली दि.०५-:* राष्ट्रवादी नेते तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आज आंबोली येथे दौऱ्यानिमित्त आले असता शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Read More

मायनिंगच्या डंपरमुळे मळगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडी

लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावा : वाहनधारक व मळगाव ग्रामस्थांमधून मागणी *💫सावंतवाडी दि.०५ सहदेव राऊळ-:* अचानक सुरू झालेल्या मायनिंगच्या डंपरमुळे मळगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना व मळगाव बाजारपेठेत येणाऱ्या लोकांना नाहक त्रास होत आहे. डंपरची सतत ये-जा असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मळगावातील लोकप्रतिनिधींनी याकडे…

Read More

वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांच्या बाजूने “मनसे”

_ मत्स्य व बंदर विभागाचे शॅडो कॅबिनेट मंत्री माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली वॉटरस्पोर्ट व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी मनसे प्रयत्न करणार -:अमित इब्रामपूरकर *💫मालवण दि.०५-:* मालवण मधील समुद्रकिनाऱ्यावर चालणारा पर्यटकांचा खास आकर्षण असलेला वॉटरस्पोर्ट व्यवसाय काल बंदर विभागाने बंद केला.बंदर विभागाच्या या आडमुठी धोरणाला आमदार वैभव नाईक जबाबदार असुन त्यांनी वॉटरस्पोर्ट व्यवसायिकांची रोजीरोटी हिरावून…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात खरेदीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद…

कणकवली खरेदी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा; प्रति क्विंटल २५६८ रुपये मिळणार दर.. *💫कणकवली दि.०५-:* महाराष्ट्र शासनामार्फत भात खरेदी यावर्षी वेळेत सुरु झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात खरेदीला शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कणकवली खरेदी-विक्री संघामार्फत आठवड्यापूर्वी भात खरेदी सुरु करण्यात आली आहे.शनिवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या भात विक्रीसाठी रांगा लागल्या होत्या. कणकवली खरेदी-विक्री संघामार्फत आतापर्यंत ७५८ क्विंटल…

Read More

तीन पलटी मारत कार झाडावर ठोकरत घडला अपघात…

अपघातात तिघे सुदैवाने बचावले;जीवितहानी टळली.. *💫कणकवली दि.०५-:* कणकवलीकडून कुंभवडेकडे जात असताना नरडवे रोड वरील माऊली देवी देवस्थानच्या प्रवेशव्दारासमोर होंडाई कारचा अपघात घडला. हा अपघात १२.४० वाजतच्या सुमारास घडला.कारचालक भरधाव वेगात असल्याने तब्बल तीन- चार पलटी मारत ही कार रस्त्याशेजारी गटारानजीकच्या झाडावर ठोकरली.सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी टळली. या गाडीतील २ पुरुष प्रवासी व १…

Read More

आमदार वैभव नाईक यांनी बालिशपणा सोडून मच्छीमारांसाठी आत्मीयतेने करावे काम – बाबा मोंडकर

*💫मालवण दि.०५-:* स्थानीक आमदार श्री वैभव नाईक यांनी जलक्रिडा व्यावसाईकांच्या समस्येवर मार्ग न काढता स्वतः चा दिखाऊपणा करून, जलक्रिडा व्यावसाईकांच्या समस्या आपण सोडवल्या असा आभास निर्माण करून व्यावसाईकांनी आपल्या स्वःकष्टातुन दिलेला फुलांच्या बुके स्विकारला मात्र जबाबदारी स्वीकारली नाही. येणाऱ्या काळात त्यांनी हा बेजबाबदारपणा, बालिशपणा सोडावा आणि मच्छीमार समाजासाठी आत्मीयतेंने काम करावे. असा टोला भाजप प्रवक्ते…

Read More

शिक्षक समिती तालुका महिला आघाडीचा स्वयंअध्ययन कार्ड निर्मिती उपक्रम आदर्शवत- नूतन आईर

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०५-:* कोव्हीड 19 विषाणू प्रादुर्भाव काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी कुडाळ तालुका शिक्षक समिती तालुका महिला आघाडी चा शैक्षणिक पाऊल – स्वयंअध्ययन कार्ड निर्मिती उपक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आदर्शवत व दिशा दर्शक ठरेल असे गौरवोद्गार कुडाळ पं स सभापती सौ नूतन आईर यांनी अल्पबचत सभागृह पं स कुडाळ येथे संपन्न…

Read More

मालवणात ६ रोजी टायगर ग्रुपतर्फे एक वही एक पेन अभियान

*💫मालवण दि.०४-:* भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी टायगर ग्रुप यांच्यावतीने ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजता बांगीवाडा समाजमंदिर येथे ‘एक वही एक पेन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनेक लोक, अनुयायी हार, फुल घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी ही फुले…

Read More

तलावाकाठील परिसर होणार आता दररोज स्वच्छ….

आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचे कर्मचाऱ्यांना आदेश *💫सावंतवाडी दि०४-:* शहराचे सौंदर्य वाढवणाऱ्या मोती तलावाकाठी आज पासून नेहमी संध्याकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून साफसफाई केली जाणार असल्याची माहिती आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी दिली आहे. तशा प्रकारचे आदेशच त्यानी आरोग्य विभागाला दिले आहेत. शहरातील मोती तलावाकाठी रोज संध्याकाळी विरंगुळ्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येऊन बसत असतात परंतु…

Read More

ग्लोबल फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती

जिल्ह्यातील १५१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण *💫कुडाळ दि०४-:* जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्लोबल फाउंडेशन या संस्थेतर्फे जिल्ह्यातील गरीब होतकरू व हुशार अशा १५१ विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आली. या शिष्यवृत्तीसाठी वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेच्या सानिया विलास गावडे, करुणा संतोष तळेकर, प्रथमेश श्रीकांत हडकर, हर्षल सुभाष परुळेकर व अभिषेक उमेश…

Read More
You cannot copy content of this page