तुळस ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा
वेंगुर्ला प्रतिनिधी– वीजेच्या कमी दाबामुळे तुळस सावंतवाडा ते चुडजीवाडीपर्यंतच्या वीजग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत असून या परिसरात त्वरीत नव्याने ट्रान्स्फार्मर न बसवल्यास येत्या २६ जानेवारी रोजी आम्ही ग्रामपंचायत कार्यकारीसह ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. नदीवरील शेतीपंप, तुळस नळपाणी पुरवठा योजनेचा २० एच.पीचा विद्युत…
