साहित्यिक बनण्यासाठी लेखन, वाचनाची आवड महत्वाची…
राजेंद्र गोसावी:नगरवाचनालयात साहित्य परिचय कार्यक्रम.. कणकवली 2 डिसेंबर (प्रतिनिधी)-साहित्यिक बनण्यासाठी लेखन व वाचनाची आवड फार महत्वाची असते. साहित्यिकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे नवोदित साहित्यिकांनी वाचन केले पाहिजे. त्यामुळे तुमच्या लिखाणात व विचारांमध्ये प्रगल्भता येईल, असे प्रतिपादन कवी राजेंद्र गोसावी यांनी केले. कणकवली येथील नगरवाचनालयातर्फे वाचनालयात सभागृहात साहित्य परिचय कार्यक्रम आयोजित केला. याच्या उद्घाटनप्रसंगी श्री. गोसावी बोलत होते….
