शारीरिक शिक्षण शिक्षकांवरील अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलन…

अजय शिंदे;राज्यात बीपीएड अर्हताधारक शिक्षकांच्या रिक्त पदांचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात भरणे आहे.. ⚡मालवण ता.२८-: शिक्षक भरती पोर्टलमध्ये केवळ शारीरिक शिक्षण विषयाचा पूर्ण कार्यभार असला, तरच त्या विषयाचे पद शिक्षक भरतीसाठी पात्र आहे, अशी अट घातली गेली आहे. ही अट अत्यंत क्लेशदायक आहे. बीपीएड अर्हता प्राप्त बेरोजगार युवकांवर हा मोठा अन्याय आहे. हा अन्याय दूर करून…

Read More

कर्जबाजारीपणाला कंटाळून ठासणीच्या बंदुकीने गोळी झाडून घेत एकाची आत्महत्या…

काल रात्री आठची घटना: पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद.. ⚡मालवण ता.२८-: कर्जबाजारीपणाला कंटाळून सचिन सहदेव डिकवलकर (वय- ३८) रा. डिकवल बौद्धवाडी यांनी ठासणीच्या बंदुकीने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना काल रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मालवण…

Read More

तळरे ते गगनबावडा रस्ता आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा…

इर्शाद शेख:ठाकरे शिवसेना करणार ३० पदयात्रा.. ⚡ओरोस ता.२८-: तळेरे ते गगनबावडा या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडून रस्त्याची पूर्णतः दुरावस्था झाली आहे. सदर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून २५० कोटी रुपये मंजूर झालेले होते. या कामाची ०१/१२/२०२२ रोजी निविदा प्रक्रिया होऊनही अद्याप काम सुरू झालेले नाही. तसेच रस्त्यावरील खड्डे देखील बुजविले गेले नाहीत. २१ किमीचा…

Read More

निगुडे सोनुर्ली रस्त्यावर भरधाव ववाहतूक करणाऱ्या डंपरने बकऱ्यांच्या कळपाला दिली धडक…

एका बकरीचा जागीच मृत्यू: शेतकऱ्याचे 15 हजारचे नुकसान.. ⚡बांदा ता.२८-: निगुडे सोनुर्ली रस्त्यावर निगुडे येथे भरधाव वेगात खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने शेतकरी पांडुरंग बाळा गावडे यांच्या बकऱ्यांच्या कळपाला धडक दिली. या धडकेत एका बकरीचा जागीच मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.निगुडे पोलीस पाटील सुचिता मयेकर, ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, महेश गावडे यांनी पंचनामा…

Read More

राजकोट येथे शिवपुतळा उभारणीचे काम युद्ध पातळीवर…

भाजप नेते निलेश राणे यांनी केली पाहणी:१ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री करणार पाहणी मालवण दि प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनानिमित्त मालवण शहरातील राजकोट येथे भव्य असा शिवपुतळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाची माजी खासदार निलेश राणे यांनी पाहणी करून हे काम निर्धारित वेळेत पूर्ण…

Read More

बाहेरचावाडा येथील शंकर वाळके यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी बाहेरचावाडा येथील शंकर उर्फ दत्ता शांताराम वाळके यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी,सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहरातील प्रतिथयश व्यापारी म्हणून त्यांची ओळख होती. बाजारपेठेतील लता लॉजचे ते मालक होते. सावंतवाडी अर्बन बँकमध्ये देखील त्यांनी…

Read More

मराठा बांधवांनी संयम ठेवावा,…

आम.नितेश राणे:पिढ्यानपिढ्या टिकणारे आरक्षण देणार.. कणकवली 28 ऑक्टोंबर (प्रतिनिधी)-मराठा आरक्षण मिळणारच असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल आहे. कोणताही मराठा छत्रपतींची खोटी शपथ घेणार नाही. थोडा संयम ठेवा पिढ्यानपिढ्या टिकणार आरक्षण मराठा समाजाला शिंदे,फडणवीस, अजिदादा यांचे असलेले आपल्या सर्वांचे देईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी दिला. कोणी आपल्या समाज बांधवांच्या विरोधात बोलण्यापेक्षा समाज…

Read More

टस्कर हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचाऱ्याचा मृत्यू…

आंबोली घाटकरवाडी येथील दुर्दैवी घटना: सोंडेने उचलून आपटत घेतले पायदळी आंबोली, ता.२८: आंबोली घाटकर वाडी परिसरात स्थिरावलेल्या हत्तीच्या हल्ल्यात घाटकरवाडी येथील वन कर्मचारी प्रकाश गोविंद पाटील वय 54 याना हत्तीने सोंडेने उचलून आपटल्याने आणि पाय दिल्याने जागीच मृत्यू झाला.ही घटना आज सकाळी घाटकर वाडी(ता.आजरा) येथे ग्रामस्थांसोबत हत्ती हुसकवताना घडली.हा टस्कर हत्ती गेली काही वर्षे आंबोली…

Read More

आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी मोहिमेत प्रशासनाने धान्यदुकानदारांनाही वेठीस धरले…

धान्यदुकानदारांवरील अन्याय शासनाने दूर करावा:जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख… ओरोस ता.२८-: केंद्र शासनामार्फत तळागाळातील सर्वसामान्य नागरीकांना आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य विषय लाभ देण्यासाठी येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवरील निमशासकिय संस्था व आरोग्य यंत्रणा यांचेमार्फत युध्द पातळीवर मोहिम राबविली जात आहे. हि चांगली गोष्ट आहे पण हे काम पुर्ण होताना येणाऱ्या अडचणी…

Read More

मोबाईल ऐवजी विविध पर्यायातून मुलांना आनंदाच्या झऱ्यापर्यंत न्यावे…

वैशाली पंडित:छोट्या छोट्या गोष्टीत असणारा आनंद पालकांनी मुलांना दाखवून दिला पाहिजे.. ⚡मालवण ता.२८-: आज लहान मुलांचा जास्त वेळ मोबाईल मध्येच व्यतीत होत असतो. अशावेळी त्यांचा मोबाईल बघण्याचा म्हणजेच मोबाईल स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेऊन मोबाईलला पर्याय म्हणून आनंद देणाऱ्या इतर गोष्टी मुलांसमोर उपलब्ध केल्या पाहिजेत, तरच मुलांमधील नैसर्गिक आनंद, कल्पनाशक्ती व सृजनशिलता वाढीस…

Read More
You cannot copy content of this page