Headlines

शक्तीपीठ महामार्ग आता मळगावसह तिलारी आणि रेडीपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू…

दीपक केसरकर:महायुतीची राजकीय परिस्थिती चांगली, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त विधान करू नये.. ⚡सावंतवाडी ता.०४-: शक्तीपीठ महामार्ग आता मळगावसह तिलारी आणि रेडीपर्यंत विभागून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेर आदेश दिले असून, या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेलअसा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी आज इथं व्यक्त केला. दोडामार्ग तालुक्यात…

Read More

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी युवानेते संदिप गावडे यांची नियुक्ती…!

⚡सावंतवाडी ता.०४-: भारतीय जनता पार्टी तर्फे दि ०४ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी युवानेते संदिप गावडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आजरोजी जाहीर केले. या अभियानंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात येणार…

Read More

उबाठाच्या वतीने १३ ऑगस्टला महामार्गावर चक्का जाम आंदोलन…

पत्रकार परिषदेत उबाठा पदाधिकाऱ्यांची माहिती:गेल्या अकरा वर्षात महामार्गाची दुरवस्था.. कुडाळ : सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रवींद्र चव्हाण यांनी गेल्या गणेश चतुर्थीपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल असे सांगितले होते. पण रस्ता पूर्ण होणे सोडाच अस्तित्वात असलेल्या मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अकरा वर्षातच रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी…

Read More

मुंबई – गोवा महामार्गावर अपघात…

आईचा मृत्यू ; वडील, मुलगा, मुलगी बचावली.. ओरोस : मुंबई – गोवा महामार्गावर खालसा धाब्यासमोर मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक दिल्याने ओरोस वर्देरोड येथील मोपेडवर मागे बसलेल्या शमिका शशांक पवार ( वय २७ ) या जागीच मृत झाल्या आहेत. तर मोपेड चालक शशांक प्रकाश पवार ( वय. ४० ) व त्यांचे चार महिन्याचे बाळ पवित्रा…

Read More

बोलेरो पिकपने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील छोटी मुलगी जखमी…!

⚡बांदा ता.०४-: बांदा उड्डाणंपूलाखाली बोलेरो पिकपने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील छोट्या मुलीला दुखापत झाली. जखमीना रुग्णवाहिकेतून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली असून बांदा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त बोलेरो चौकातून हायवेवर येत होती तर दुचाकी हायवेवरून जात होती. बोलेरोची धडक बसल्याने दुचाकी चालक त्याची पत्नी व…

Read More

केसरकरांच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे, वजन कमी झाल्याने मतदार संघात अधिकारी नाहीत…

रुपेश राऊळ: यांची टीका: अधिकारी नसल्याने लोकांनी न्याय मागायचा कोणाकडे..? ⚡सावंतवाडी ता.०४-: मतदार संघात अनेक प्रश्न गंभीर आहेत.मतदार संघात अधिकारीच नाहीत, असे असताना केसरकर गप्प का..? की त्यांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे वजन कमी झाले की काय असा संशय रुपेश राऊळ यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान आम्ही विरोधक म्हणून सातत्याने विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहे. परंतु…

Read More

साटेली येथे मायनिंगमध्ये कोट्यावादीचा घोटाळा…

बाबुराव धुरी व रुपेश राऊळ यांचा गंभीर आरोप: पालकमंत्री मायनिंग वाल्यांच्या पाठीशी राहून जिल्ह्याचा अक्का बनायला बघतात का….? ⚡सावंतवाडी ता.०४-: कोट्यावादी चा शासनाचा महसूल बुडून साटेली तर्फ सातार्डा येथील बेकायदा मायनिंग सुरू आहे. लीज एकीकडे आणि उत्खनन दुसरीकडे असा प्रकार आहे. त्यात देखील मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. असा आरोप आज इथे आयोजित संयुक्त पत्रकार…

Read More

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू…

⚡कणकवली ता.०४-: शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाखाली गेली अनेक वर्ष मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून याबाबत व्यापारी संघाचे पदाधिकारी नागरीक यांनी संबंधित शासकीय विभागांचे तसेच पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आज ( सोमवारी ) कणकवली नगरपंचायत प्रशासन, कणकवली पोलीस व आरटीओ विभागाचे अधिकारी कर्मचारी सोमवारी सकाळीच ‘ऑन फिल्ड’ उतरले. या तिन्ही विभागाचे अधिकारी, कर्मचारी…

Read More

कणकवली आचरा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश चाळण…!

⚡मालवण ता.०३-: कणकवली आचरा या मुख्य रस्त्यावरील चिंदर बाजार ते आचरा दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच वाहन चालकांना समजत नाही अशीच काहीशी दुरवस्था या रस्त्याची झालेली आहे. गेल्या वर्षी चतुर्थी पूर्वी ऑगस्ट महिन्या मध्ये सदर रस्त्याचे खड्ड्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलमपट्टी करून बुजविण्याचे काम करण्यात आले…

Read More

साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मालवणात १७ रोजी चर्चासत्राचे आयोजन…

⚡मालवण ता.०३-:कोकणातील ज्येष्ठ लेखक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत त्यांच्या जीवन व कार्याला उजाळा देण्यासाठी येथील बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण व साहित्य अकादमी दिल्ली यांच्यावतीने दि. १७ ऑगस्ट रोजी सेवांगण, मालवण येथे जयवंत दळवींच्या समग्र साहित्याची चर्चा करणारे एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी…

Read More
You cannot copy content of this page