नांदगाव – असलदे येथे महामार्ग रोखत ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी ३७ जणांवर गुन्हे दाखल…
⚡कणकवली ता.२४-: आंबा, काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी नांदगाव – असलदे येथे ठिय्या मारत सोमवारी महामार्ग रोखला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेला असताना बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता रोखला. तसेच आक्षेपार्ह भाष्य करून जमावाला भडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टी, माजी…
