मळगाव येथे काजू बागायत आगीच्या भक्ष्यस्थानी…
लाखोंचे नुकसान : शेतकरी चिंतेत.. सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासलगत मळगाव व वेत्ये सीमेलगतच्या काजू बागायतीत सायंकाळी ४ च्या सुमारास लागलेल्या आगीत स्थानिक शेतकऱ्यांच्या काजू बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात विलास राऊळ, सुरेश राऊळ, संजय मोहन राऊळ, दिलीप परशुराम राऊळ यांच्या गावठी व कलमी काजू बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले…
