ओवळीये गावातील आरोग्य तपासणीचा आ.वैभव नाईक यांनी घेतला आढावा

तापसरीने निधन झालेल्या दिव्या खांदारे हिच्या घरी भेट देत केले सांत्वन *💫कुडाळ दि.२६-:* ओवळीये वायंगणीवाडी येथील दिव्या आबा खांदारे या १८ वर्षीय मुलीचे तापसरीच्या आजाराने निधन झाले. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी खांदारे यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. ओवळीये गावात अन्य काही जणांना तापाची साथ सुरु असल्याने आरोग्य विभागामार्फत तेथील लोकांची…

Read More

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेला तो आदेश अन्यायकारक

शिक्षक भारती संघटनेचा आरोप , आदेश रद्द करण्याचीजिल्हाधिकाऱ्यांकडून मागणी सिंधुदुर्गनगरी ता २६ कोरोना चा धोका आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी मुख्यालय सोडून जाऊ नये .असा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी काढलेला आदेश शिक्षकांवर अन्याय करणारा व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आनणारा आहे.तरी संबंधित आदेश त्वरित रद्द व्हावा.अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी…

Read More

देशव्यापी संपात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटना सहभागी

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सिंधुदुर्गनगरी ता २६ केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षण, कामगार, शेतकरी, विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी देशातील सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुकारलेल्या आजच्या संपात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भरती संघटना सहभागी झाली असून कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांची पूर्तता त्वरित करण्यात यावी. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे…

Read More

लेप्टोबाबत घाबरून न जाता आरोग्य यंत्रणेला माहिती द्या

मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी ता २६ लेप्टो स्पायरोसिस अर्थात लेप्टो हा आजार वेळेत योग्य उपचार झाल्यास पूर्णतः बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी या आजाराला घाबरून न जाता शासकीय आरोग्य यंत्रणेकडे उपचार घ्यावेत. सर्व्हेसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना खरी माहिती द्यावी. ताप आल्यास लपवू नये असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी…

Read More

आश्वासनांची पूर्तता न झाल्यास अधिकाऱ्यांना खुर्च्यांवर बसू देणार नाही – राजन तेली यांचा इशारा.

आठ दिवसांत आधार कार्ड सुविधा केंद्र सुरु करण्याचे तहसीलदार यांचे आश्वासन.;वैभववाडीत जनतेच्या विविध मागण्यांसाठी भाजपाचे ठिय्या आंदोलन. *💫वैभववाडी दि.२६-:* तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची झालेली दुरवस्था याला संबंधित खात्याचे अधिकारी जबाबदार आहेत. खड्डे भरण्यासाठी तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाखो रुपयांचा निधी दिला आहे. मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात यांच्यात मिलीभगत व हितसंबंध असल्यामुळे सदर डागडुजीची…

Read More

बेकायदेशीर दारू वाहतुकीवर आंबोलीत पोलिसांची कारवाई

साडेतीन लाखांच्या मुद्देमालासह दोन संशयित ताब्यात आंबोली दि.२६-:* गोव्यातून सांगली येथे होणाऱ्या बेकायदेशीर दारू वाहतुकीवर आंबोली पोलिसांनी धडक कारवाई केली असून ५४ हजाराच्या दारू सह एकूण ३ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई काल बुधवारी रात्री ११:३० च्या दरम्यान आंबोली मुख्य धबधब्या जवळ करण्यात आली आहे. या दारू वाहतूक प्रकरणी प्रकाश चव्हाण…

Read More

मत्स्यशेती व शोभिवंत मासे व्यवसायाबाबत ऑनलाईन मार्गदर्शन…..

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र आणि उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्यशेती व शोभिवंत मासे व्यवसाय यावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनासाठी डॉ. नितीन सावंत मत्स्यशास्त्रज्ञ उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे हे दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शनासाठी स्वयंरोजगार ईच्छूक उमेदवारांनी Meeting…

Read More

शहीद विजय साळसकर यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही – सतीश सावंत

वैभववाडी शिवसेनेच्या वतीने एडगाव येथे वाहिली श्रद्धांजली *💫वैभववाडी दि.२६-:* शहीद साळसकर यांनी देशाच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता बलिदान दिले.त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही ,त्यांच्या बलिदानाने वैभववाडी तालुक्यातील अनेक तरुण प्रेरणा घेतील,असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले. शाहिद विजय साळसकर यांच्या पुतळ्याला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते व जिल्हा बँक अध्यक्ष…

Read More

संविधानाने देशातील नागरिकांमध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण केली- संग्राम कासले

*💫मालवण दि.२६-:* संविधानाने भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची शिकवण दिली आहे. संविधानातील या मूल्यांमुळेच संपूर्ण भारत देश जगाला एकतेचा संदेश देत आहे. संविधानाने देशातील नागरिकांमध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण केली आहे, असे प्रतिपादन संग्राम कासले यांनी येथे बोलताना केले. बार्टी समतादूत प्रकल्प व भंडारी ए.सो. हायस्कूल मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी हायस्कुलमध्ये संविधान दिनाचा…

Read More

वरवडेत २८ नोव्हेंबरला होणार महारक्तदान शिबीर….

सोनू सावंत मित्रमंडळातर्फे आयोजन;सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान करावे… *💫कणकवली दि.२६-:* भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सोनु सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीरआयोजित करण्यात आले आहे. सोनू सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी विविध सेवाभावी उपक्रमांची रेलचेल असते. मात्र, कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सोनू सावंत यांच्या वाढदिनी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सोनू…

Read More
You cannot copy content of this page