न्हावेली गावात गतिरोधक बसवण्याची ग्रामस्थांची मागणी…
⚡सावंतवाडी ता.१६-:तालुक्यातील न्हावेली गावातील ग्रामस्थांनी वाढत्या वाहनवाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून, शाळा परिसर, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आणि वस्ती भागात वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे नागरिक, विशेषतः विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने…
