पियाळी नदीत सिलिका वॉशिंगचे गढूळ पाणी
जन आंदोलन उभारणार;असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांचा इशारा *⚡कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील असलदे-पियाळी नदीचे पाणी पुन्हा एकदा गढूळ झाल्याने बऱ्याच गावांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सिलिका वाशिंग केलेले पाणी नदीत सोडले जात आहे, त्याला जबाबदार कोण? त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशी मागणी करुनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याबाबत वारंवार आवाज उठविला आहे तरीही सबधितांवर…
