कबीर आणि तुलसीदास यांचे विचार वर्तमान काळातही प्रासंगिक:डॉ. शीतला प्रसाद दुबे
कणकवली ता.२८-:* मध्ययुगीन काळात जात, धर्म, रुढी परंपरा, अंधश्रद्धा यांच्या कुचक्रामध्ये पूर्णपणे फसलेल्या व त्याचे आंधळेपणाने पालन करणाऱ्या समाजाचे डोळे उघडण्याचे व विवेकवादी स्पष्ट भूमिका घेण्याचे काम कबीर आणि तुलसीदास या कवींनी केले आहे. दुर्दैवाने आजही या संदर्भात परिस्थिती फार काही बदललेली नाही त्यामुळे या कवींचे विचार आजही प्रासंगिक ठरतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक…
