एसटी कर्मचाऱ्यानी विलिनीकरणाचा भूलभुलैया विसरून कामावर रुजू व्हावे:मोहन केळुसकर
कणकवली ता.१५-:* एसटी कर्मचाऱ्याचे स्वंयम घोषित नेते अॕड. गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचार्यांची दिशाभूल करुन एसटीचा संप साडेपाच महिने चिघळवून ठेवला. आता त्यांची न्यायालयीन फरफट उभा देश अनुभवतो आहे. कर्मचार्यांनी आता झाले गेले ते दु:स्वप्न विसरून जावे. राज्यातील प्रवाशाची जीवनवाहिनी असलेली एसटी जगली पाहिजे आणि कर्मचार्यांचे कुटुंबही जगले पाहिजे. भाजप पक्षाचे धोरण हे खाजगीकरणाच्या दिशेने चालले…
