वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी साकारले चित्त्याचे मुखवटे
⚡मालवण ता.१९-: भारतातून १९५२ साली चित्ता प्राणी नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आल्यानंतर ७२ वर्षांनी भारतात चित्त्याचे पुनरागमन झाले. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये चित्त्या बद्दल असलेले कुतूहल लक्षात घेऊन कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला विभागामार्फत फेस पेंटिंगच्या माध्यमातून मुलांचे चित्त्याच्या रूपातील मुखवटे रंगवण्यात आले. यावेळी चित्त्याच्या मुखवट्यातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन चित्यांविषयी माहिती दिली….
