Headlines

शेतक-यांनी नफ्यात वाढ होण्यासाठी सेंद्रीय शेतीची कास धरावी…

प्रा. प्रसाद ओगले;रामेश्वर सोसायटी व असलदे ग्रामपंचायतच्यावतीने शेतकरी मेळावा ⚡कणकवली ता.०९-: आंबा व काजु बागायतदारांनी किफायतशीर असलेली सेंद्रीय शेती करण्याची आवश्यकता आहे. सेंद्रीय शेतीमुळे होणारा खर्च मर्यादित होवून शेतक-याच्या उत्पन्नात वाढ होते , त्यासाठी आवश्यक ते तंत्र आत्मसात केले पाहिजे. भात शेती मध्ये उत्पादित झालेला तांदुळ बाजारात उकडा तांदूळ करुन विकल्यास शेतक-यांनी चांगला नफा होईल…

Read More

२२ नोव्हेंबरची कणकवलीतील ती घटना आठवा…नंतरच राष्ट्रवादीला इशारा द्या

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा ⚡कणकवली ता.०९-: वैचारिक शुन्यता असलेले आणि प्रसिद्धीसाठी हपापलेले व आपल्या नेत्याची मर्जी संपादन करण्यासाठी दादा साईल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा देताना निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत नको अन्यथा गप्प बसणार नाही असे बालीश उद्गार काढण्याअगोदर याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २२ नोव्हेंबर २००३ रोजी कणकवलीत काय…

Read More

‘रेस्क्यू स्कुबा डायव्हिंग व बोट चालविणे प्रशिक्षणाचे आयोजन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: महाराष्ट्र राज्यात जल पर्यटनासाठी असलेली मोठी संधी लक्षात घेवून जलपर्यटन उच्च दर्जाचे आणि सुरक्षित बनविण्यासाठी जल पर्यटन क्षेत्रातील प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा विकास करणे गरजेचे आहे. हे लक्षात घेवून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुरस्कृत राज्यातील स्थानिक युवकांसाठी कालबद्ध कार्यक्रम अंतर्गत जल पर्यटन आणि जीवरक्षक प्रशिक्षण देण्याचे…

Read More

बिपर जॉय’ ची निर्मिती* मच्छिमारांनी समुद्रात जावू नये

निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे ⚡सिंधुदुर्गनगरी ता०९-: प्रादेशिक हवामान विभाग,मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्राम ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 9 ते 13 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र…

Read More

सोमवारी जागतिक बाल कामगार विरोधी दिन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिन बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ – उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, याकरीता सातत्याने शासनाच्या विविध विभागामार्फत व विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. १४ वर्षाखालील…

Read More

पुणे विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिन सोमवारी

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: पुणे विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथे दिनांक १२ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती सदस्य सचिव तथा विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास पुणे संजय माने यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडयासाठी व्यासपीठ मिळावे,…

Read More

14 व्या हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करावे

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: पी एम.किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थी यांना पुढील वितरित होणाऱ्या १४ व्या हफ्त्याचा लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे आवश्यक असल्याचे प्रमोद बनकर तालुका कृषी अधिकारी, दोडामार्ग यांनी कळविले आहे.

Read More

तेर्से बांबर्डे गावासाठी त्वरित स्वतंत्र तलाठी मिळावा

ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच भास्कर परब यांनी केली मागणी ⚡कुडाळ ता.०९-: तेर्से बांबर्डे गावासाठी त्वरित स्वतंत्र तलाठी मिळावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भास्कर परब यांनी केली आहे मागील अनेक वर्षे तेर्से बांबर्डे गावासाठी स्वतंत्र तलाठी नाही. तेर्सेबाबर्डे, बिबवणे आणि मांडकुली या तीन गावाची मिळून सजा आहे. या सजासाठी मागील अनेक वर्षे एकच तलाठी कार्यरत असल्याने…

Read More

निलेश राणे यांचा सावंतवाडी राष्ट्रवादीने केला निषेध

शरद पवार यांचे आत्मचरित्र पुस्तक भेट पाठविणार:- अर्चना घारे परब ⚡सावंतवाडी ता.०९-: शरद पवार यांच्या बद्दल माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या बद्दल सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध केला आहे.यावेळी शरद पवार यांचे कृषी, कला, क्रीडा, सामाजिक, सहकार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठं काम आहे. निलेश राणे यांना शरद पवार हे काय आहेत…

Read More

शिवसेना शिंदे गटाने दिले छपराचे साहित्य

वादळी वाऱ्याने दोन वर्षापूर्वी रांगणा तुळसुली येथील मोहन तेंडुलकर यांचे झाले होते नुकसान कुडाळ ता.०९-: कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसुली येथील मोहन विनायक तेंडुलकर यांच्या घराचे छप्पर दोन वर्षापूर्वी वादळी वाऱ्यामुळे उडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ते बेघर होऊन बाजूला असलेल्या भावाच्या घरी पडवीत राहून जीवन जगत होते. ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिवसेना…

Read More
You cannot copy content of this page