संजू परब यांना मुख्याधिकाऱ्यांचा शब्द:कामे मार्गी न लागल्यास आम्ही पुढची भूमिका ठरवू..
⚡सावंतवाडी ता.१९-: मुसळधार पावसाने काल सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबले होते गटाराचे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्याने हा प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यासंदर्भात माजी नगराध्यक्ष यांना आज या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये विचारले असता चार दिवसापूर्वीच आपण मुख्याधिकारी यांचे याबाबत लक्ष वेधले आहे. तात्काळ ही कामे मार्गी लावली जातील असा शब्द त्यांनी आपल्याला दिला आहे.
त्यामुळे आम्ही गप्प आहोत कामे मार्गी न लागल्यास
आम्ही पुढची भूमिका ठरवू असे संजू परब यांनी सांगितले
