Headlines

दिल्लीतील नाबार्ड ४२ व्या वर्धापन दिन सोहळ्यास जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची उपस्थिती…

सोहळ्यास अमित शहांनी केले मार्गदर्शन ⚡ओरोस ता.१४-: राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड )ची स्थापना १२ जुलै १९८२ रोजी ग्रामीण विकासासाठी झाली. नाबार्डचा ४२ वा वर्धापन दिन १२जुलै २०२३ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कर्यक्रमासाठी देशभरातील राज्य बँकांचे व निवडक जिल्हा मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निमंत्रित…

Read More

प्रचंड मेहनत करा तरच भविष्यात उच्च पदावर पोहचाल:रविंद्र बाईग यानी

⚡कणकवली ता.१४-: शाळेत शिक्षक आपल्याला शिक्षा करतात तेव्हा त्याचा राग येतो मात्र त्यानी शिक्षा केल्यानतंर मी अभ्यास केला आज मोठा झालो याची जाणीव होते. आज जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होत चालली आहे मात्र याच शाळेतील विद्यार्थी आज उच्च पदावर पोहचले असून शालेय जीवनापासून प्रचंड मेहनत करा तरच भविष्यात उच्च पदावर पोहचाल असे प्रतिपादन भारतीय…

Read More

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

⚡मुंबई दि.१४-: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय…

Read More

मुलांनी शालेय जीवनापासून अभ्यासाबरोबरच कौशल्यही जपावीत:डाॅ. जयवंत शेलार

⚡कणकवली ता.१४-:दहावी व बारावीत आज कोकण अव्वल आहे.आज मुलांची गुणांची टक्केवारी वाढली आहे.मात्र आजच्या काळात गुणांपेक्षा आपल्या अंगी असणारे कौशल्यही तितकेच महत्वाचे आहे.यासाठी मुलांनी शालेय जीवनापासून अभ्यासाबरोबरच कौशल्यही जपली पाहिजेत भविष्यात हीच आपल्याला वेगळी दिशा देऊ शकते असे प्रतिपादन कौशल्य विद्यापीठ नवी मुंबईचे कुलगुरू डाॅ. जयवंत शेलार यानी केले. श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ,…

Read More

मडुरा हायस्कूल ची स्वरा सिंधुदुर्गात प्रथम

शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले यश बांदा/प्रतिनिधीफेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेची स्वरा संदीप निऊंगरे २५२ गुण (८४ टक्के) गुणांसह सर्वसाधारण ग्रामीण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. तिच्या यशामुळे मडुरा हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वराचे व तिच्या पालकांचे धी बांदा नवभारत…

Read More

तलाठी भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत…

राजन तेली यांचे आवाहन:भाजपा महाराष्ट्र प्रदेश देणार ऑनलाईन प्रशिक्षण… ⚡सावंतवाडी ता.१४-: शासनाकडून ‘तलाठी’ पदासाठी मेगा भरती जाहीर झालेली असून त्याद्वारे लवकरच 4644 पदे भरण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज दाखल करावेत.अश्या इच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप…

Read More

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी शिक्षणाचा पाया भक्कम करावा…

श्रीलोचन बाल विकास केंद्र पुणे येथे सिंक्रो डिजिटल या कंपनीकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप… ⚡बांदा ता.१४-: पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते, बरेच परदेशी आणि आंतरदेशीय विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुण्यात येतात कारण या स्पर्धेच्या काळात टिकण्यासाठी विविध विषयांचे ज्ञान मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. आपण सातत्यपूर्ण अभ्यास करायला हवा. आपण जरी गरीब कुटुंबातून आलो…

Read More

डिंगणे शाळा नं. १ मध्ये पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡बांदा ता.१४-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे शैक्षणिक साहित्य भारतीय जनता पक्षाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेश धुरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी डिंगणे गावचे सरपंच संजय डिंगणेकर, ग्रामपंचायत सदस्य जयेश सावंत, पालक भास्कर सावंत, प्रशाळेचे मुख्याध्यापक…

Read More

१० ऑगस्ट पूर्वी अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार…

सर्वोच्च न्यायालयाची नोटीस: सावंतवाडी मतदारसंघ होणार पोरका ?डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केली भिती ⚡सावंतवाडी ता.१४-: विधानसभेच्या १६ आमदारांच्या अपात्रातेबाबत निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष विलंब करीत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे अध्यक्षांना याबाबतचा निर्णय १० ऑगस्ट पूर्वी घ्यावा लागणार आहे. याचाच अर्थ ते 16 आमदार आता अपात्र ठरणार ही निश्चित आहे. त्याच…

Read More

राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन अखेर मागे..

वाहतुक निरीक्षकांकडून लेखी आश्वासन; अन्यथा १५ ऑगस्टला पुन्हा हल्लाबोल सावंतवाडी ता.१४-: येथील सावंतवाडी बस स्थानक परिसरात आज राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं हल्लाबोल आंदोलन अखेर आश्वासनाअंती मागे घेण्यात आले आहे. येथील बस स्थानक परिसरात असलेल्या समस्या बाबत आज राष्ट्रवादीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी…

Read More
You cannot copy content of this page