उद्योगमंत्री उदय सामंत:मित्रपक्षांच्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला असता तर त्यांचा गैरसमज दूर झाला असता..
⚡ओरोस ता.१९-: आडाळी एमआयडीसीमध्ये येत्या काही दिवसात चांगले प्रकल्प आलेले दिसतील त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत मात्र २१० कोटी रुपयाचा प्रोजेक्ट लवकरच येते सुरु होत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी २२ कोटी दिले तर तेथे पाण्यासाठी पाच कोटी रुपये देतोय त्यामुळे एमआयडीसीचे काम कोठेही थांबले नाही. मात्र ज्या मित्रपक्षांच्या लोकांनी पत्रकार परिषद घेण्याआधी माझ्याशी संपर्क साधला असता तर त्यांचा गैरसमज दूर झाला असता अशी माहीती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली
