Headlines

साळिस्ते येथे भारतीय मजदूर संघाच्या ध्वजाचे अनावरण

⚡कणकवली ता.२३-: भारतीय मजदूर संघाच्या ६८ व्या स्थापनादिनी साळिस्ते येथील सर्व कामगार वर्ग एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनेच्या सर्वात मोठ्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन भारतीय मजदुर संघ जिल्हा संघटक ओमकार दिपक गुरव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मजदुर संघ तळेरे प्रभागाने केलेले होते. भारतीय मजदूर संघ ही देशात प्रथम क्रमांकावर असलेली कामगार संघटना…

Read More

मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी च्या शैक्षणिक प्रगतीत मानाचा तुरा

⚡सावंतवाडी ता.२३-: सन २०२२ – २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिलाग्रीस च्या ९ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखील अभिनंदन करण्यात आले.यावेळी उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल , पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शिष्यवृत्ती…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत वेद, हंसिकाचे यश

⚡वेंगुर्ला ता.२३-: महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ला शहरातील सातेरी मंदिर नजिकच्या शाळा नं. ४ या शाळेतील वेद अभिषेक वेंगुर्लेकर आणि हंसिका जगन्नाथ वजराटकर हे दोन विद्यार्थी शहरी राज्यस्तरावरील शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका लिना नाईक व मुख्याध्यापिका संध्या बेहेरे यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक संध्या बेहेरे, शिक्षक संतोष…

Read More

….तर उपोषणाशिवाय पर्याय नाही

दूरध्वनी सेवेसाठी झोळंबेच्या आजी-माजी सरपंचांचा बीएसएनएल ला इशारा ⚡बांदा ता.२३-: झोळंबे गावात मागील काही महिन्यांपासुन मोबाईल रेंजच नसल्याने सेवा विस्कळीत झाली आहे. पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीत संपर्क साधने अवघड होत असल्याने गावातील सेवा सुरळीत करावी या मागणीचे निवेदन दुरसंचारच्या अधिकाऱ्यांना झोळंबे ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले. नेटवर्क नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. सद्यस्थितीत बीएसएनएल वगळता कोणत्याही…

Read More

सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प…

गगनबावडा मांडकुली महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली:राधानगरी मार्गे वाहतूक वळविली वैभववाडी प्रतिनिधीगगनबावडा तालुक्यात मांडूकली नजीक महामार्गावर पाणी आल्याने सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या राधानगरी मार्गे वळविण्यात आल्या आहेत. मार्ग बंद झाल्याने गगनबावडा व वैभववाडी तालुक्यात अवजड वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगाा लागल्या आहेत. गगनबावडा तालुक्याला गेले…

Read More

मुळस येथे गुलमोहर कोसळल्याने
बांदा कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

दोडामार्ग,ता.२३-: दोडामार्ग कोल्हापूर मार्गावर मुळस येथे शनिवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान गुलमोहरचे झाड कोसळल्याने त्या मार्गावरील वाहतूक पाऊण तास ठप्प झाली होती.एसटी व अन्य वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसला. सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो,बसत्याव परेरा,एकनाथ शेटकर,हेवाळेचे माजी सरपंच राजाराम देसाई यांनी कटरने झाड कापून रस्ता मोकळा केला.

Read More

तांबोळीत बत्ती गुल

ग्रामस्थांची विजवितरण कार्यालयावर धडक बांदा/प्रतिनिधीतांबोळी गावात गेले दहा दिवस बत्ती गुल असल्याने गाव अंधारात आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी कल्पना देऊनही पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज ग्रामपंचायत सदस्य मिलिंद देसाई यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बांदा महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र अधिकारीच उपस्थित नसल्याने येत्या सोमवारी तांबोळी गाववासीयानी कार्यालयासमोर बसून ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.तांबोळी गावातून जाणाऱ्या…

Read More

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत आपत्कालीन कक्षाची रंगीत तालीम

⚡सावंतवाडी ता.२२-: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी आपत्कालीन कक्षाकडुन येथील मोती तलावात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी स्वतःबोटीत बसून सहकार्‍या समवेत तलावात सैर केली.

Read More

बांदा उपसरपंच जावेद खतीब यांना मातृशोक…

⚡बांदा ता.२२-: बांदा मुस्लिमवाडी येथील सायराबी हुसेन खतीब (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे सून नातवंडे असा परिवार आहे. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अधिक उपचारासाठी म्हापसा गोवा येथे रुग्णालयात दाखल केले असता तेथे निधन झाले. भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बांदा…

Read More

साद फाऊंडेशन विद्यार्थ्यांच्या सदैव पाठिशी

गितांजली नाईक ः पाडलोसमधील मुलांना केले शिक्षणिक साहित्य वाटप ⚡बांदा ता.२२-: साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग मार्फत जिल्ह्यात आवश्यक ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सुरू आहे. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य क्षेत्रातही मोठे योगदान आहे. आपल्या गावातील विद्यार्थी एक अधिकारी बनवा यासाठी आपली सदैव धडपड सुरू असते. मुलांना शैक्षणिकबाबती कोणतीही आर्थिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून…

Read More
You cannot copy content of this page