आळवाडी येथे घाटपायऱ्यांवर मगरीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण…

⚡बांदा ता.२९-: तेरेखोल नदीत महाकाय मगरिंचे वास्तव्य असून आज आळवाडी येथे घाटपायऱ्यांवर मगरीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. तेरेखोल नदीत हजारोंच्या संख्येने मगरी आहेत. त्यातील काही मगरी या 15 फुटाहुन अधिक लांबीच्या आहेत. आज दुपारी याठिकाणी घाट पायऱ्यांवर महाकाय मगरीचे दर्शन झाले. यामुळे स्थानिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read More

प्रीपेड स्मार्ट मिटरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करा…!

शिवसेनेचे अतुल बंगे यांची शासनाकडे मागणी.. कुडाळ : स्मार्ट प्रीपेड मिटर बसवु नये यासाठी आंदोलन उभे झाले तरीही चोरुन मीटर बसवल्याने चारशे रुपये बिला ऐवजी चार हजार बिले येत आहेत. विज ग्राहक ही बिले भरुच शकत नाहीत याबाबत शासनाने ग्राहकांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहेस्मार्ट प्रिपेड मिटर बसवु नये…

Read More

भरत गोगावले यांनी जाहीर माफी मागितल्याशिवाय जिल्ह्यातील महायुती बाबत कोणतीही चर्चा होणार नाही…

प्रभाकर सावंत:राणेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवून जिंकलेले मंत्री आणि आमदार यांच्या समोर वक्तव्य करण्याचे धारिष्ट्य अत्यंत क्लेशदायक.. ⚡ओरोस ता.२९-: भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायणराव राणे हे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत,ते आमचे आदरस्थान आहेत,त्यांच्या बद्दल मंत्री भरत गोगावले यांनी जाहीर सभेत केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे.राणेसाहेबांचा राजकीय इतिहास व त्यांच्या कार्यशैलीबद्दल केवळ आमच्या पक्षातीलच नव्हे…

Read More

निवती समुद्रकिनारी विराट कोहलीचं १५ फूटांचं भव्य चित्र…

पाट येथील अल्पेश घारे याची मनमोहक कलाकारी.. कुडाळ : कला आणि क्रिकेट यांचा अनोखा संगम कुडाळ तालुक्यात पाहायला मिळाला आहे. कुडाळ-पाट परिसरातील सुप्रसिद्ध चित्रकार अल्पेश घारे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचं तब्बल १५ फूट उंचीचं भव्य पोर्ट्रेट निवती समुद्रकिनारी साकारलं आहे.अल्पेशला कलेचे प्राथमिक शिक्षण पाट हायस्कूल मध्ये मिळाले पाट हायस्कूल मध्ये…

Read More

मंत्री भरत गोगावलेना शिवसेना पक्ष श्रेष्ठींनी समज द्यावी…

खा. नारायण राणे यांच्याबद्दलचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे:सिंधुदुर्गात महायुतीत मिठाचा खडा टाकू नये,समीर नलावडे.. ⚡कणकवली ता.२९-: महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी कुडाळ मधील शिवसेना बैठकीत खासदार नारायण राणेंबद्दल केलेले ” ते ” वक्तव्य अत्यंत चुकीचे असून माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्याबाबत गैरसमज निर्माण करणारे आहे. त्यामुळे मंत्री भरत गोगावले याना त्यांच्या पक्ष…

Read More

मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीचे भान ठेवून बोलावे…

अबिद नाईक:केवळ प्रसिद्धीसाठी वाटेल ती वक्तव्य करून महायुतीमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य नाही.. ⚡कणकवली ता.२९-:राज्यात आणि जिल्ह्यातही आपण महायुती सरकार मध्ये आहोत. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वाटेल ती वक्तव्य करून महायुतीत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांनी वक्तव्य करताना महायुतीचे भान…

Read More

भरत गोगावले यांचे वक्तव्य निषेधार्ह

मिलिंद मेस्त्री: त्यांना वरिष्ठांनी समज द्यावी:अशी वक्तव्य खपवून घेणार नाही.. ⚡कणकवली ता.२९-: महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी त्यांची पक्ष संघटना वाढीसाठी मेळावे जरूर घावेत. मात्र त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगून बोलावे. आपण महायुतीत आहोत, याची जाण ठेवत मतभेद निर्माण होतील अशी वक्तव्ये करू नयेत. ती…

Read More

भरत गोगावलेंनी जाहीर माफी न मागितल्यास शिवसेना कार्यालयासमोर तिरडी आंदोलन करू…

महेश सारंग:भाजपची ताकद जिल्ह्यात मोठी आहे आहे, त्यामुळे स्थानिक निवडणुका कार्यकर्ते स्वबळावर लढ्यास इच्छुक आहेत.. सावंतवाडी : कुडाळ येथील शिवसेनेचा कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री, भाजपचे खास. नारायण राणे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झालेत. येत्या आठ दिवसांत त्यांनी जाहीर माफी न मागितल्यास शिवसेना कार्यालयासमोर तिरडी आंदोलन…

Read More

शालेय गटात मैथिली कदम, खुल्या गटात शिदलाळे प्रथम…

⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग सोसायटी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२५ चा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेतील शालेय गटातून शिवडाव हायस्कूलमधील मैथिली मिलिंद कदम तर खुल्या गटातून आंबोली येथील आर.एस. शिदलाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे. नवउद्योजक घडविण्याच्या उद्देशाने कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग…

Read More

आंबोली बचाव कार्याला बळकटी,सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपला आपत्कालीन बचाव साहित्याचे वाटप…

सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांचे मानले आभार.. ⚡आंबोली ता.२९-: सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गेली अनेक वर्षे शोध व बचाव कार्य करून अपघातग्रस्त आणि प्रशासनाला मोलाचे सहकार्य करणाऱ्या सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगेली च्या सदस्यांना आपत्कालीन बचाव साहित्याचे वाटप करण्यात आले. आंबोलीच्या सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी याबाबत मा….

Read More
You cannot copy content of this page