तीन पलटी मारत कार झाडावर ठोकरत घडला अपघात…

अपघातात तिघे सुदैवाने बचावले;जीवितहानी टळली.. *💫कणकवली दि.०५-:* कणकवलीकडून कुंभवडेकडे जात असताना नरडवे रोड वरील माऊली देवी देवस्थानच्या प्रवेशव्दारासमोर होंडाई कारचा अपघात घडला. हा अपघात १२.४० वाजतच्या सुमारास घडला.कारचालक भरधाव वेगात असल्याने तब्बल तीन- चार पलटी मारत ही कार रस्त्याशेजारी गटारानजीकच्या झाडावर ठोकरली.सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी टळली. या गाडीतील २ पुरुष प्रवासी व १…

Read More

आमदार वैभव नाईक यांनी बालिशपणा सोडून मच्छीमारांसाठी आत्मीयतेने करावे काम – बाबा मोंडकर

*💫मालवण दि.०५-:* स्थानीक आमदार श्री वैभव नाईक यांनी जलक्रिडा व्यावसाईकांच्या समस्येवर मार्ग न काढता स्वतः चा दिखाऊपणा करून, जलक्रिडा व्यावसाईकांच्या समस्या आपण सोडवल्या असा आभास निर्माण करून व्यावसाईकांनी आपल्या स्वःकष्टातुन दिलेला फुलांच्या बुके स्विकारला मात्र जबाबदारी स्वीकारली नाही. येणाऱ्या काळात त्यांनी हा बेजबाबदारपणा, बालिशपणा सोडावा आणि मच्छीमार समाजासाठी आत्मीयतेंने काम करावे. असा टोला भाजप प्रवक्ते…

Read More

शिक्षक समिती तालुका महिला आघाडीचा स्वयंअध्ययन कार्ड निर्मिती उपक्रम आदर्शवत- नूतन आईर

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०५-:* कोव्हीड 19 विषाणू प्रादुर्भाव काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी कुडाळ तालुका शिक्षक समिती तालुका महिला आघाडी चा शैक्षणिक पाऊल – स्वयंअध्ययन कार्ड निर्मिती उपक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आदर्शवत व दिशा दर्शक ठरेल असे गौरवोद्गार कुडाळ पं स सभापती सौ नूतन आईर यांनी अल्पबचत सभागृह पं स कुडाळ येथे संपन्न…

Read More

मालवणात ६ रोजी टायगर ग्रुपतर्फे एक वही एक पेन अभियान

*💫मालवण दि.०४-:* भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी टायगर ग्रुप यांच्यावतीने ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजता बांगीवाडा समाजमंदिर येथे ‘एक वही एक पेन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनेक लोक, अनुयायी हार, फुल घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी ही फुले…

Read More

तलावाकाठील परिसर होणार आता दररोज स्वच्छ….

आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचे कर्मचाऱ्यांना आदेश *💫सावंतवाडी दि०४-:* शहराचे सौंदर्य वाढवणाऱ्या मोती तलावाकाठी आज पासून नेहमी संध्याकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून साफसफाई केली जाणार असल्याची माहिती आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी दिली आहे. तशा प्रकारचे आदेशच त्यानी आरोग्य विभागाला दिले आहेत. शहरातील मोती तलावाकाठी रोज संध्याकाळी विरंगुळ्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येऊन बसत असतात परंतु…

Read More

ग्लोबल फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती

जिल्ह्यातील १५१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण *💫कुडाळ दि०४-:* जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्लोबल फाउंडेशन या संस्थेतर्फे जिल्ह्यातील गरीब होतकरू व हुशार अशा १५१ विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आली. या शिष्यवृत्तीसाठी वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेच्या सानिया विलास गावडे, करुणा संतोष तळेकर, प्रथमेश श्रीकांत हडकर, हर्षल सुभाष परुळेकर व अभिषेक उमेश…

Read More

बेकायदेशीररित्या बंदुका घेऊन शिकारीसाठी गेलेल्या १६ जणांची जामिनावर मुक्तता

गुरुवारी मध्यरात्री घेतले होते ताब्यात;४ लाख ३६ हजार ५० रूपयाचा मुद्देमाल जप्त *💫कुडाळ दि.०४-:* शिकारीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बंदुका व काडतुसा घेऊन बाव तिरांबीवाडी येथील जंगलात शिकारीसाठी जाणाऱ्या १६ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यांच्यावर शस्त्र परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या कारवाईत पाच काडतुसाच्या बंदुका, आठ जिवंत काडतुसे,…

Read More

तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने हरवलेल्या मोबाईलचा लावला शोध.

वैभववाडीचे पो. काँ. संदीप राठोड यांचा सोनाळी  ग्रामस्थांकडून सत्कार. *💫वैभववाडी दि.०४-:* तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने वैभववाडीचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी काही तासात हरवलेल्या मोबाईलचा शोध लावत तो मोबाईल मालकाला परत केला आहे. पोलीस राठोड यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव व संदीप राठोड यांचे मोबाइल मालक किशोर भोसले…

Read More

महाआवास अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक टिकवण्यासाठी तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे

पालकमंत्री उदय सामंत यांचे ऑनलाईन बैठकीत आवाहन *💫सिंधूदुर्गनगरी दि.०४-:* शासनाच्या आवास योजनेत सिंधूदुर्ग राज्यात प्रथम आहे, हे अभिमानास्पद आहे. परंतु याच्यावर समाधानी न राहता महा आवास अभियानमध्ये आपल्याला राज्यात प्रथम क्रमांक टिकवायचा आहे. यासाठी तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यानी समन्वयाने काम केले पाहिजे. ज्या २८६ लाभार्थीना जागा नाही. त्यांची यादी तयार करून यातील किती…

Read More

*दिव्यांग प्राप्त असलेल्या मुलांचा पालकांनी खचून न जाता दिव्यांग व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ध्येय निश्चित करा- मदन भिसे*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०४-:* जगातील अनेक दिव्यांग व्यक्तीनी हिंमत जिद्दीच्या जोरावर जागतीक दर्जाचे यश मिळविले आहे. नोकरी, व्यवसाय या क्षेत्रासह क्रीडा प्रकारातही यश संपादन केले आहे. त्यामुळे दुर्दैवाने दिव्यांगत्व लाभलेल्या मुलांनी व त्यांच्या पालकानी खचून न जाता अशाप्रकारे यश मिळविलेल्या दिव्यांग व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ध्येय्य निश्चित करावे. या धेय्याला प्रचंड मेहनतीची जोड द्यावी. त्यातून तुम्हाला यश…

Read More
You cannot copy content of this page