साहित्यिकाने समाजातील प्रश्नांशी संवादी राहून वाचकांप्रति नम्र राहावे – रंगनाथ पठारे
⚡मालवण ता.११-:साहित्यिक हा आपले जगणे आणि आपली भाषा यांचा मेळ साधून साहित्यकृतीची निर्मिती करून ते पुन्हा आपल्या भाषेलाच देत असतो. साहित्यिकाने लिहिलेल्या कवितेत मोठी ताकद असते तर नाटकाची संहिता ही समाजाला मार्गदर्शक असते. प्रत्येक साहित्यिकाचे स्थान हे वाचक ठरवत असतात, म्हणूनच साहित्यिकाने समाजातील प्रश्नांशी संवादी राहून वाचकांप्रति नम्र राहावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे…
