Headlines

स्पीकर ची वायर काढत असताना शॉक लागल्याने बिहार येथील कामगाराचा मृत्यू…

⚡कणकवली ता.२६-: हुंबरठ दळवीवाडी येथील सेंट्रींग कामगार रोहितकुमार भुट्टीप्रसाद (३०, मूळ रा. बिहार) याचा स्पीकरच्या वायर काढताना शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर अनिल बिजली प्रसाद याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. रोहितकुमार भुट्टीप्रसाद हुंबरठ येथे सेंट्रींगचे काम करत होता. सोमवारी धुलीवंदन निमित्ताने कामगारांनी स्पीकर बॉक्स लावले…

Read More

सार्वजनिक विहिरीचे पिण्यासाठी पाणी मिळेना…

कृत्रिम पाणी टंचाई विरोधात मुळदे मागासवर्गीय नागरिक संतप्त:१ एप्रिल रोजी जिल्हा परिषद समोर करणार आंदोलन.. ओरोस ता.२६-: कुडाळ तालुक्यातील मुळदे मागासवर्गीय वस्तीतील ग्रामस्थांना सध्या कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या मागासवर्गीय वस्तीनजिक असलेल्या एलपालववाडी येथे असलेल्या शासकीय निधीतून उभारलेल्या विहिरी व्यतिरिक्त येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. मात्र, तेथील काही ग्रामस्थ हे पाणी…

Read More

लोकसभा मतदार संघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही..

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची माहिती:सिंधुदुर्गातील निवडणुकीसंदर्भात घेतला आढावा.. ओरोस ता.२६-: रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकूण १९४० मतदान केंद्रे निश्चित झाली आहेत. यातील एकही मतदान केंद्र संवेदनशील नाहीत. तसेच या निवडणुकीत उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा असल्याची माहिती लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम…

Read More

दीपक केसरकर यांनी आज पर्यंत भूमिपूजन केलेली किती विकास कामे मार्गी लावली…?

रुपेश राऊळ यांचा सवाल:ज्यांच्या जीवावर मोठे व्हायचे त्यांना धडा शिकवायचा हि केसरकर यांची संस्कृती.. ⚡सावंतवाडी ता.२६-: खासदार राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे विकास कामे मंजूर झाली त्याच विकास कामांचे नारळ आम्ही फोडले मात्र दीपक केसरकर यांनी आज पर्यंत भूमिपूजन केलेली किती विकास कामे मार्गी लागली हे सांगावे,असा सवाल ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे…

Read More

वस्त्रहरण मधील “गोप्या” ची एक्झिट…

नाट्य अभिनेते लवराज कांबळी यांचे निधन.. ⚡मालवण ता.२६-: रेवंडी गावचे सुपुत्र आणि मराठी चित्र -नाट्य अभिनेते, निर्माता लवराज गिरीधर कांबळी (६६) यांचे आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले मराठी रंगभूमीवर इतिहास निर्माण करणाऱ्या वस्त्रहरण या नाटकात सुरुवातीला प्रॉम्प्टर आणि नंतरच्या काळात गोप्या या दोन्ही भूमिका आपल्या समर्थ अभिनयाने…

Read More

मालवणात मनसेतर्फे पर्यावरण पूरक रंगांचे वाटप…

⚡मालवण ता.२६-: धुलीवंदन म्हणजेच निरनिराळ्या रंगांची उधळण करून आनंद साजरा करण्याचा दिवस. मात्र यासाठी वापरण्यात येणारे रंग काही वेळा आरोग्यासाठी हानिकारक ठरत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मालवण शहराच्या वतीने पर्यावरण पूरक रंगांचे वाटप करण्यात आले. धुलीवंदनच्या उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन त्यांनी रंग उधळीत आनंद लुटावा घ्यावा, या हेतूने पर्यावरण पूरक रंगांचे वाटप करण्यात…

Read More

राणेंचा तवा गरम असल्याने त्या तव्यावर केसरकर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा करताहेत प्रयत्न…

रुपेश राऊळ यांचा टोला:केसरकांनी गद्दारी, विश्वासघात, या पाठांचा तिसरी आणि चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करावा.. ⚡सावंतवाडी ता.२६-: तवा गरम दिसला की तिथे आपली पोळी भाजून घ्यायची ही केसरकरांची वृत्ती आहे,सध्या राणेंचा तवा गरम आहे म्हणून केसरकर सध्या त्यांची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत,असा टोला ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे लगावला. दरम्यान गद्दारीचा…

Read More

अरविंद केजरीवाल अटक प्रकरणी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार…

संयुक्त पत्रकार परिषदेत दिली माहिती:आ नाईक, अमित सामंत, संजय पडते, विवेक ताम्हणकर यांचा इशारा ⚡कुडाळ ता.२६-: कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावलीय. कथित मद्य धोरण प्रकरणात १०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीतर्फे…

Read More

आमदार नितेश राणे यांनी दिली एपीएमसी मार्केटला भेट…

आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केली सकारात्मक चर्चा.. ⚡मुंबई दि.२६-: आमदार नितेश राणे यांनी आज मुंबई येथील एपीएमसी मार्केटला भेट देऊन आंबा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. एपीएमसी मार्केटचे प्रमुख श्री पानसरे व त्यांच्या प्रतिनिधी समवेत यावेळी सविस्तर चर्चा केली. सकारात्मक झालेल्या चर्चेत आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे एपीएमसी मार्केट ला आमदार…

Read More

हळवल येथे २८ मार्च ला शिवजन्मोत्सव सोहळा…

शिवजयंती उत्सव मंडळ हळवलचे आयोजन.. ⚡कणकवली ता.२६-: शिवजयंती उत्सव मंडळ हळवल च्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. २८ मार्च २०२४ रोजी हा शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी ९:३० वाजता शिवप्रतिमेचे पूजन, सकाळी १०:३० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२:०० वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७:०० वाजता हरिपाठ, रात्री ८:३०…

Read More
You cannot copy content of this page