शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यावरून शेतकरी व पर्यावरणप्रेमींचा आक्षेप…?
डॉ. जयेंद्र परुळेकर यांचं मत:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिगती महामार्गावर एकही एक्झिट प्रस्तावित नसल्याने स्थानिक विकासावर परिणाम.. ⚡सावंतवाडी ता.०४-: राज्य सरकारच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. सुधारित आराखड्यानुसार महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार असून त्याची एकूण लांबी ८०६ किमीवरून वाढवून ८५६ किमी करण्यात आली आहे.या नव्या मार्गात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…
