अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या…
मनसेची कुडाळ तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ ता.०८-:कुडाळात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यात मिरची, भुईमूग, वायंगणी भातशेती, चवळी ,आंबा, काजू, सूर्यफूल, केळी बागायती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी कुडाळ मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार अमोल पाठक यांच्याकडे केली आहे….
