Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात उत्तम आरोग्य सेवेसाठी प्रयत्न…

पालकमंत्री:नेरूर येथील महाआरोग्य शिबिराचा १२८९ रुग्णांनी घेतला लाभ ,बेळगाव येथील के.एल्.ई. रुग्णालयातही होणार उपचार.. ⚡कुडाळ ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य सेवेत स्वयंपूर्ण व्हावा. येथेच जिल्हावासियांना चांगली आरोग्य सेवा मिळावी. जिल्हावासियांना आरोग्य सेवेसाठी अन्य ठिकाणी जावे लागू नये, यासाठी उत्तम आरोग्य व्यवस्था येथे निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. कै….

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर…

⚡बांदा ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाच्या वतीने सन 2025-26 या वर्षासाठी विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आदर्श हिंदी शिक्षिका, आदर्श मुख्याध्यापक तसेच हिंदी प्रचारक आणि विशेष सन्मान पुरस्कारांचा समावेश आहे.यावर्षी आदर्श हिंदी शिक्षिका पुरस्कार मोंड हायस्कूल, देवगड येथील सौ. असावरी सुनील कदम यांना जाहीर झाला आहे. तसेच स्व. हनुमंत गोविंद दळवी स्मृती…

Read More

तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी समन्वय गरजेचा…

गणेश राणे:देवगडमध्ये कृषी महोत्सव २०२६ उत्साहात.. ⚡देवगड ता.२८-: शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. गावातील ग्रामसभांमध्ये कृषी सहाय्यकांनी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, असे मत देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी व्यक्त केले.देवगड तालुका कृषी विभागाच्यावतीने जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा…

Read More

मराठीचा दर्जा वाढविण्यासाठी पाट हायस्कुल सोबत गीतकार गुरु ठाकूर…

पाट हायस्कूल मध्ये गीतकार गुरु ठाकूर यांची शिक्षकांसोबत ‘मन की बात’.. ⚡कुडाळ ता.२८-: पाट हायस्कूलमध्ये गीतकार गुरु ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली . या भेटीदरम्यान मराठी दर्जा वाढविण्याबाबत शिक्षकांशी चर्चा करण्यात आली. मराठी विषय सुधारण्यासाठी विविध उपक्रमही सुचविले. यामध्ये विविध स्पर्धेचा आयोजन करण्यात येऊन त्यांना आपल्या मार्फत बक्षीस योजना राबविण्याचे गुरु ठाकूर यांनी जाहीर केले.एस….

Read More

विद्यार्थ्यांनो राष्ट्रकार्यात सहभागी व्हा…

डॉ. विजय जोशी :संत राऊळ महाराज महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न.. ⚡कुडाळ ता.२८-: बदलत्या काळाचे भान ठेवा. काळासोबत चालाल तर टिकाल. आज तुम्हाला जी पदवी मिळाली आहे त्याची आहुती समाज यज्ञामध्ये द्या आणि राष्ट्रकार्यात सहभागी व्हा, असे आवाहन मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा माजी डीन डॉ. विजय जोशी यांनी केले. डॉ. विजय जोशी यांच्या…

Read More

आंबा-काजू बागायतदारांची फसवणूक; भरपाईवरून उपरकरांचा सरकारवर घणाघात…

⚡कणकवली ता.२८-: आंबा व काजू बागायतदारांना जाहीर केलेली भरपाई अत्यंत अपुरी असून सरकारने सरळ फसवणूक केली आहे, अशी तीव्र टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. हेक्टरी आंब्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी असताना विमा भरलेल्यांना केवळ ४२ हजार आणि विमा न भरलेल्यांना २२ हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक झाडामागे अवघे २२०…

Read More

कणकवली रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याचे भूमिपूजन…

⚡कणकवली ता.२८-: कणकवली रेल्वे स्थानकातील सरकता जीनाच्या कामाचे भूमिपूजन व वातानुकुलित कक्षाचे उद्घाटन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, कोकण रेल्वेचे डीओ सुनील गुप्ता, कोकण रेल्वेचे अधिकारी शैलेंद्र बापट, शैलेश आंबोडकर, प्रशांत गाड, सुनील नारकर, आरपीएफचे कोकण विभागीय आयुक्त यश मिश्रा, अधिकारी गोकुळ…

Read More

सुशांत दळवी खूनप्रकरणी सखोल तपासाची मागणी…

कळसुली ग्रामस्थांचे पालकमंत्री नाम. नितेश राणेंना निवेदन.. ⚡कणकवली ता.२८-: बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्या निर्घृण खूनप्रकरणी सखोल व निष्पक्ष तपास करून मुख्य आरोपींना अटक करावी, अशी मागणी कळसुली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,…

Read More

कलमठला दर दिवशी ३ लाख लिटर पाणी मिळणार…

नगराध्यक्ष संदेश पारकर व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या उपस्थितीत कलमठ ला पाणी पुरवठा सुरू.. कणकवली : कणकवली शहरातील सांडपाणी गडनदीपात्रात सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले. नदीपात्रातील पाण्यावरील कलमठ गावची नळपाणी योजना बंद पडली आहे. त्यामुळे कलमठ बाजारपेठ, नाडकर्णीनगर व अन्य भागाला होणारा पाणीपुरवठा थांबला आहे. कलमठच्या पाणीप्रश्नी सरपंच संदीप मेस्त्री, ग्रा. पं….

Read More

…अन्यथा वेळ काढल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू

वैभव नाईक, परशुराम उपरकर यांचा इशारा:सुशांत दळवी खून प्रकरण तापले.. कणकवली : सुशांत दळवी खून प्रकरणाबाबत पोलिसी तपासाविषयी साशंकता निर्माण होत आहे. पोलीस अद्याप या घटनेविषयी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. वास्तविक सुशांत यांना दोन महिन्यापूर्वी सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने धमकी दिली होती. याबाबत सुशांत यांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यामुळे या घटनेचा पोलिसांनी सखोल…

Read More
You cannot copy content of this page