Headlines

Global Maharashtra Breaking News

शेतक-यांचा १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

⚡वेंगुर्ला ता.०९-: सन २०१५ ते २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले २ लाखावरील शेतक-यांना कर्जमाफीचा निर्णय मिळत नसल्यामुळे तसेच शिवाजी छत्रपती कर्जमुक्ती योजनेमध्ये शेतकरी अद्यापपर्यंत वंचित असून त्याचप्रमाणे खावटी अल्पभुधारक व मध्यम मुदत व पिक विम्या संदर्भात सिधुदुर्गातील आंबा, काजू, सुपारी, भात पीक घेणा-या शेतक-यांनी १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे….

Read More

गाव समृद्ध करता काय करावे- डॉ.श्रीनिवास गावडे

⚡वेंगुर्ला ता.०९-: लोकराज्य मंचच्यावतीने महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंच मुख्यपमुख डॉ.श्रीनिवास गावडे योनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. गाव समृद्ध होण्याकरता कार्यकर्त्यांनी काम करावे असे प्रतिपादन श्री.गावडे यांनी केले.

Read More

ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्लेचा वर्धापनदिन संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०९-: ज्येष्ठ नागरीक संघ, वेंगुर्लेचा वर्धापनदिन २ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला दिवाणी न्यायलायाचे सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. २०१९ साली संघाचे सचिव रघुनाथ परब यांना झालेल्या अपघातामुळे व त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे संघाचा वर्धापनदिन होऊ शकला नव्हता. यावर्षी झालेल्या या वर्धापनदिनात सुमारे १०० स्त्री-पुरुष ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

Read More

बाह्य कार्याचेही शिक्षण विद्यार्थ्यांना द्या!- शेखर सामंत

⚡वेंगुर्ला ता ०९-: आपल्या तत्त्वांपासून न ढळता व्रतस्थपणे पुरस्कार देण्यासाठी योग्य शिक्षक व शाळा निवडून मागील ४० वर्षे आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येणारी नगर वाचनालय वेंगुर्ला ही जिल्ह्यातील अग्रेसर संस्था आहे. शिक्षकांनी चार भिती पलिकडचे सर्वच विषयांचे शिक्षण देतानाच बाह्य कार्याचेही शिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. यासाठी गुणात्मक कार्याने शैक्षणिक गुणवत्तेसह आदर्श शाळा…

Read More

कार्य तत्परांना साद फाउंडेशनचे ‘ऋणाई पुरस्कार’

अध्यक्षा गीतांजली नाईक यांच्या हस्ते सन्मानित : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप ⚡बांदा ता.०९-: दिवंगत माजी ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण महादेव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजातील गरजू, होतकरू, अन्यायग्रस्त आणि वंचित घटकांना स्वतःसह समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून मदत व्हावी यासाठी बहुुद्देशीय अशी “साद फाउंडेशन सिंधुदुर्ग” संस्था प्रशासकीय अधिकारी गितांजली लक्ष्मण नाईक यांनी स्थापन केली. तसेच लक्ष्मण नाईक…

Read More

कर्तव्यपूर्तीचे समाधान…!

कर्तव्यपूर्तीचे समाधान…! डॅा.जयवंत खबालेहॅास्पिटल मध्ये आज शेकड्याने रूग्ण भरती होताना आपण पाहतो त्यातले बहुतेक रूग्ण ह्रदयविकार , डायबेटिस , पॅरिलिसीस चे असतात.त्यांचे नातेवाईक अत्यवस्थ अवस्थेत त्यांना हॅास्पिटल मध्ये घेऊन येतात, खरं तर ब-याचं वेळा वैधकीय सेवा त्यांना मिळाली नाही, अशा शेवटच्या अवस्थेला पोहचण्या पूर्वी त्यानां तज्ञ डॅाक्टरांचा सल्ला व योग्य उपचार मिळाले पाहिजेत या जाणीवेने…

Read More

सावंतवाडीत सुरू असलेल्या बेकायदा धंद्यांचा उद्या होणार पर्दाफाश…

मटका ,जुगार व्यवसायामागच्या गॉडफादरचे नाव होणार उघड;माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या पत्रकार परिषदेकडे शहरवासीयांचे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडीत सुरू असलेला मटका ,व जुगार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याचा पर्दाफाश उद्या माजी नगराध्यक्ष संजू परब करणार आहेत . राजरोस सुरू असलेल्या या बेकायदा धंद्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलीस गांधारीच्या भूमिकेत वावरत असल्याने उद्या पत्रकार परिषद घेऊन…

Read More

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शिवसेनेच्या वतीने उद्या गरबा उत्सवाचे आयोजन…

⚡मालवण ता.०७-: मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उद्या ९ रोजी शिवसेना शाखा कार्यालय येथे रात्री आठ वाजता महिलांसाठी गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

कोळोशी येथील मासे विक्रेता हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी केला पंचनामा

⚡कणकवली ता.०८-: कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे शुक्रवारी पहाटे ४:४५ वाजता ओटव येथील मच्छी विक्रेते लवू शिवाजीओटवकर (वय ७५) यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी भा.द. वि.कलम ३२३,३२४,३४ नुसार गुन्हा अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे.त्यानुसार मासे विक्रेता हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.कोळोशी,ओटव, आयनल,नांदगाव या…

Read More

आ नितेश राणे यांच्या दणक्यानंतर कापूर कंपनीने मागितली माफी

बांदा/प्रतिनिधीआमदार नितेश राणेंच्या दणक्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांचा जाहिरातीत अवमान करणाऱ्या ‘त्या’ कापूर कंपनीच्या मालकाने अखेर समस्त भाविकांची जाहीर माफी मागितली आहे. तसा माफीनाम्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित केला आहे. बांद्यातील व्यापारी व नागरिकांनी संबंधित कंपनीची तक्रार आमदार नितेश राणे यांच्याकडे केली होती. तसेच संबंधित कंपनीचा कापूर विक्री व वापर बंद केला होता.नितेश राणे यांनी बांदावासियांच्या या…

Read More
You cannot copy content of this page