शेतक-यांचा १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
⚡वेंगुर्ला ता.०९-: सन २०१५ ते २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले २ लाखावरील शेतक-यांना कर्जमाफीचा निर्णय मिळत नसल्यामुळे तसेच शिवाजी छत्रपती कर्जमुक्ती योजनेमध्ये शेतकरी अद्यापपर्यंत वंचित असून त्याचप्रमाणे खावटी अल्पभुधारक व मध्यम मुदत व पिक विम्या संदर्भात सिधुदुर्गातील आंबा, काजू, सुपारी, भात पीक घेणा-या शेतक-यांनी १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे….
