Headlines

Global Maharashtra Breaking News

आचरा रामेश्वर मंदिरात ऐतिहासिक रामजन्म सोहळा पार…

मालवण दि प्रतिनिधी शिवकालीन परंपरेचा वारसा जोपासत मुखी रामनामाचा जप करीत आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत कसबा आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा ऐतिहासिक राम जन्मोत्सव संपन्न झाला. गुढीपाडव्यापासून येथील रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला. या उत्सवनिमित्त रामेश्वर मंदिराचासभामंडप आकर्षक फुलांनी तसेच मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास राघूविराच्या आरतीची फेरी…

Read More

करुळ भट्टीवाडीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्ताराम कदम यांचे निधन…

वैभववाडी प्रतिनिधीकरूळ भट्टीवाडी येथील रहिवासी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्ताराम सिताराम कदम (गुरुजी) वय ८५ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.मयत कदम गुरुजी यांनी तालुक्यात वैभववाडी, गडमठ, नाधवडे व अन्य ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. येथील तालुका स्कूलमध्ये ते उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. शांत व संयमी व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.सोमवारी सायंकाळी त्यांना…

Read More

देवबाग येथील विठ्ठल मंदिराचा २६ रोजी कलशारोहण सोहळा…

⚡मालवण ता.१७-: देवबाग येथील श्री विठ्ठल मंदिराचा कलशारोहण सोहळा दि. २६ एप्रिल रोजी तसेच श्रींच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन दि. ३० एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवारी १६ रोजी पुराणवाचन व कीर्तन संपन्न झाले. तर बुधवारी १७ रोजी रामनवमी उत्सव साजरा झाला. यानिमित्त गुरुवार,…

Read More

स्वच्छता समितीकडून एसटीच्या खारेपाटण बसस्थानकाची पाहणी…

⚡कणकवली ता.१७-: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राज्यभर राबविले जात आहे. या अभियांतर्गत स्वच्छता समितीने खारेपाटण बसस्थानक परिसरातील पाहणी केली. रत्नागिरी विभागाचे नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, उपयंत्र अभियंता मृदुला जाधव, कामगार अधिकारी विलास चौगुले यांचा समावेश असलेली ही समिती होती. पाहणी दरम्यान पत्रकार संतोष पाटणकर, प्रवासी मित्र शिवाजी पाटील हे उपस्थित होते. वाहतूक…

Read More

कणकवलीत राम नवमी उत्साहातराम जन्मोत्सव पाहण्यासाठी भक्तांची गर्दी…

आमदार नीतेश राणेंनी घेतले श्री रामाचे दर्शन.. ⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी राम नवमी उत्सव भक्तीमय वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरा केला. या उत्सवामुळे सर्वत्र राममय वातावरण होते. मंदिरांमधील राम जन्मोत्सव सोहळा भक्तांनी ‘याची डोळा, याची देही’ पाहिला. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तालुक्यातील हळवल, कलमठ, वरवडे यासह अन्य गावांमध्ये राम नवमी…

Read More

३० मे नंतर करुळ घाट वाहतुकीस खुला करा…

जिल्हाधिकारी किशोर तावडे:महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी.. वैभववाडी (प्रतिनिधी)३० मे नंतर करू घाटातील वाहतूक सुरू झाली पाहिजे. त्या पद्धतीने कामाचे नियोजन करून युद्धपातीवर काम करा. अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. तर भुईबावडा घाटातून अवजड वाहतूक सुरू करणे बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. करुळ घाटात जिल्हाधिकारी किशोर…

Read More

दहा वर्षात खा विनायक राऊत यांनी धनगर समाजासाठी काय केले…

भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचा प्रश्न:प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीला साथ देण्याचे केले आवाहन.. वैभववाडी | प्रतिनिधीधनगर समाज बांधवांसाठी खासदार विनायक राऊत यांचे योगदान काय ? समाजाला गृहीत धरून मताचा जोगवा मागणाऱ्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे. विनायक राऊत यांची अपयशी खासदार अशी समाजात नोंद झाली आहे. गतिमान विकासासाठी महायुती सोबतच सर्वांनी राहिले पाहिजे. असे प्रतिपादन वैभववाडी…

Read More

वेंगुर्ला शहरात उत्साहात रामनवमी साजरी…

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये बुधवारी भक्तिमय वातावरणात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. श्रीरामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

Read More

नितीन कदम यांचे निधन…

⚡कणकवली ता.१७-: वरवडे-हिवाळेवाडी येथील रहिवासी नितीन मोहन कदम (34) यांचे मंगळवारी निधन झाले. मंगळवारी दुपारी नितीन यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्याठिकाणी उचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने वरवडे गावात हळहळ व्यक्त होत अाहे. त्यांच्या पश्चात अाई, पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा मोठा परिवार अाहे.

Read More

शिक्षकांनी आत्मसन्मान जागृत ठेवावा…

राजन कोरगावकर यांचे आवाहन ः शिक्षक समितीचा कट्टा येथील गुणगौरव सोहळा उत्साहात.. ⚡कणकवली ता.१७-: शिक्षकांनी आपला आत्मसन्मान जागृत ठेवून आपले कार्य सचोटीने केले पाहिजे. कोणत्याही चुकीच्या आदेशाला शिक्षकांनी बळी न पडता ज्ञानदानाचे कार्य अविरत चालू ठेवावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण…

Read More
You cannot copy content of this page