कथालेखनासाठी कौशल्य आवश्यक-: वृंदा कांबळी…
⚡वेंगुर्ला ता.०३-: कथानिर्मिती प्रक्रिया ही मनाच्या अनेक पातळ्यांवर घडत असते. ती काहीशी गूढ असते. जीवनानुभव घेत असताना एखाद्या तरल क्षणी संभाव्य कथाबीजाची निर्मिती होते. एखाद्या बीमध्ये पाने, फुले, फळे, फांद्या यांसह वृक्षाचा आकार लपलेला असावा त्याप्रमाणे कथाबीजामध्ये कथाविस्तार लपलेला असतो. बीजधारणेपासून संपूर्ण कथेची निर्मिती होईपर्यंतचा प्रवास हा दीर्घ असून त्यात अनेक टप्पे असतात. उत्स्फूर्तता आणि…
