Headlines

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.             दुपारी 1 वा. ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे अरुणा प्रकल्प, देवघर प्रकल्पाबाबत आढावा बैठक, दुपारी 1.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील कोविड…

Read More

शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकभारतीचे सलग चौथ्या दिवशीही बेमुदत साखळी उपोषण सुरूच

*⚡ओरोस ता.२६-:* कोरोनाच्या आगमनापासून शाळेचे दरवाजे बंद झाल्याने सध्या बहुतांश विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाऊ लागले आहेत.विद्यार्थ्यांचे हे नुकसान कधीही भरून निघणारे नाही म्हणून लवकरात लवकर शाळा सुरू करा.. जिल्ह्यासह राज्यातील शाळा अनलाॅक करण्याच्या मागणीसाठी शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेच्या माध्यमिक शिक्षकांनी सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले असून गुरुवारी चौथ्या दिवसी कणकवली…

Read More

मालवणात पोलिस पथकासह दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीसांनी केले संचलन

भयमुक्त वातावरणात व जिल्ह्यात शांतता कायम राहण्यासाठी प्रयत्न *⚡मालवण ता.२६-:* गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी काळात येणारे सण , उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडावेत व जिल्ह्यात शांतता कायम राहावी यासाठी मालवणात आज सायंकाळी पोलिस पथकासह दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस यांचे संचलन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक…

Read More

राणेंची जन आशीर्वाद यात्रा ही जनतेला ताप यात्रा ठरली:परशुराम उपरकर

एक वेळ राज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या आणि विकासाची ब्लू प्रिंट प्रत्यक्षात अनुभवा *⚡कणकवली ता.२६-:* भाजप आणि शिवसेनेला विकासाबाबत काही देणेघेणे नाही ही केवळ एकमेकांना शिव्या देणे ,आरोप करणे आणि प्रसिद्धी मिळवणे हा त्यांचा धंदा आहे, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2014 च्या निवडणूकीत सांगितले होते. त्याची खात्री पटत असून जनतेच्या विकासाच्या कोणत्याही…

Read More

सेना-भाजप नेते तळाशील ग्रामस्थाची फसवणूक करीत आहेत

बंधाऱ्यासाठी निधी देण्याचे आश्वासन देऊनही अद्याप पत्र नाही;मनसे प्रदेश सरचिटणीस उपरकर यांचा आरोप मालवण दि प्रतिनिधी राज्यातील सत्ताधारी आणि देशातील सत्ताधारी हे दोघेही सामान्य जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविण्याचे काम करत आहेत. तळाशील येथे कायमस्वरूपी बंधाऱ्यासाठी ग्रामस्थानी आंदोलन केले असताना आम. वैभव नाईक यांनी ५४ लाखांच्या तात्पुरती बंधाऱ्याची मलमपट्टी करताना बंधारा कामासाठी आणखी आमदार फंडातून…

Read More

जुन्या गाळे धारकांनी लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन सहकार्य करावे

नगराध्यक्ष राजन गिरप;आत्मदहन सारखे कृत्य न करण्याचे आवाहन वेंगुर्ले: येथील सागररत्न मत्स्य बाजारपेठमधील तळमजल्यावरील १५ गाळ्यांबाबत जुन्या गाळे धारकांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या “फस्ट राईट टू रिफ्युजल” यानुसारच लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन या शासकीय प्रक्रियेला सहकार्य करावे. नियोजित लिलाव प्रक्रिया झाल्यानंतर ज्यांना गाळे मिळतील अशा गाळेधारकांना ३० वर्षे दीर्घ मुदतवाढ देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवून योग्य तो न्याय…

Read More

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे स्वागतासाठी कणकवलीत रोषणाई

राणेंच्या स्वागतासाठी नगराध्यक्ष समीर नलावडेंची टीम सज्ज *⚡कणकवली ता.२६-:* केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचे जनआशीर्वाद यात्रेच्यानिमित्ताने प्रथमच मायभूमी कणकवलीत आगमन होत आहे. केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या स्वागतासाठी कणकवली नगरी सज्ज झाली असून कणकवली शहरात जणू दिवाळी दसरा असल्यासारखेच भासत आहे. राणेंच्या स्वागतासाठी शहरात हायवेलगत सर्व्हिस रोडच्या दुतर्फा गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. पटवर्धन चौक तसेच महत्वाच्या ठिकाणी…

Read More

परवा जन आशीर्वाद यात्रा मालवणात

जोरदार स्वागत करणार;तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर *⚡मालवण ता.२६-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवार दि. २८ ऑगस्ट रोजी मालवण तालुक्यात दाखल होणार असून दुपारी दोन वाजता आचरा येथे या यात्रेचे भव्य स्वागत मालवण तालुका भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे…

Read More

नारायण राणेंच्या अटकेमागे राष्ट्रवादी नाही

कारवाई कायदेशीर:राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे *⚡सावंतवाडी ता.२६-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटके मागे राष्ट्रवादी काँग्रेसचा काडीमात्र संबंध नसून, कोणत्याही नेत्याने अटक करण्यास सांगितले म्हणून कोणालाही अशाप्रकारे अटक होत नाही. कायद्यापुढे कोणीही मोठा नसतो त्यामुळे ती पोलिसांनी केलेली कारवाई आहे. दिलीप वळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे गृह खाते चांगल्या प्रकारे काम करत आहे. असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी…

Read More

ही तर उपनगराध्यक्षांची राजकीय स्टंटबाजी: दिलीप गिरप

*⚡वेंगुर्ला ता.२६-:* नगरपरिषद उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही तर केवळ आगामी नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली ही राजकीय स्टंटबाजी आहे. या राजीनाम्यात दिलेले कारणही चुकीचे असल्याचे मत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केले आहे. येथील सागररत्न मत्स्य बाजारपेठेच्या तळ मजल्यावरील १५ गळ्यांबाबत जुन्या गाळेधारकांवर सत्ता धाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप…

Read More
You cannot copy content of this page