Headlines

जनतेच्या सहकार्यानेच पोलिसांचे काम सुलभ

डी वाय एस पी विनोद कांबळे वैभववाडी संजय शेळके :जनतेच्या सहकार्यामुळेच पोलीस खात्याचे काम अधिक सुलभ होते. आपत्तीच्या काळात जनतेने प्रशासनाला असेच सहकार्य करत राहावे. करुळ सह्याद्री रक्षक व ग्रामरक्षक दलाचे काम कौतुकास्पद आहे. भविष्यात या दलाची दखल निश्चित प्रशासन घेईल असे प्रतिपादन कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले.करुळ ग्रामपंचायत सभागृहात सह्याद्री रक्षक…

Read More

वादळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना द्या…

हरी खोबरेकर ; तहसीलदारांकडे मागणी… ⚡मालवण ता.३१-: हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ५ जून ते ७ जून या कालावधीत किनारपट्टी भागात वादळसदृश परिस्थिती निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

Read More

आचरा ग्रामंचायत येथे सौ अनुष्का गांवकर,श्रीमती पूजा आचरेकर यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित

⚡मालवण ता.३१-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार माजी ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर व महिला बचत गटाच्या श्रीमती पुजा आचरेकर यांना बुधवारी ग्रामपंचायत आचरा सभागृहात ग्रामपंचायत प्रशासक विनायक जाधव व ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम…

Read More

मालवणातील पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ‘घागर कळशी आंदोलन’ छेडू

युवक काँग्रेसचा नगरपालिकेला इशारा ⚡मालवण ता.३१-: मालवण नगरपालिकेतर्फे धामापूर नळपाणी योजनेद्वारे शहरात होणारा पाणीपुरवठा सध्या विस्कळीत झाला असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा मालवण नगरपालिकेसमोर घागर कळशी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज युवक काँग्रेसतर्फे नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला. मालवण शहरात नगरपालिकेतर्फे धामापूर नळपाणी योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा अनियमीत…

Read More

जलपर्यटन नियमावलीत बदल करून घेणे गरजेचे – महेश कांदळगावकर

⚡मालवण ता.३१-: जलपर्यटन बंदी विषयी परिपत्रकामुळे जी संभ्रमावस्था निर्माण होत आहे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पर्यटन महासंघ, जलपर्यटन व्यावसायिक, मच्छिमार, व्यापारी वर्ग, पर्यटन व्यवसायासाठी निगडीत सर्व घटकांनी एकत्र येवून सर्वपक्षीय पाठपुरावा शासनाकडे करून या जलपर्यटन नियमावलीत बदल करून घेणे गरजेचे बनले आहे, असे मत मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. दहा…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी – अरविंद मोंडकर

⚡मालवण ता.३१-: नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनामधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्र जनतेच्या हृदयातील दैवतांचे पुतळे हटविण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित असल्याने शिंदे- फडणवीस सरकार हे महाराष्ट्रद्रोही असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या कृतीचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने…

Read More

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा वेत्ये ग्रामपंचायतीकडून गौरव…

वेत्ये गावातील दोन कर्तबगार महिलांचाही अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.३१-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वेत्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थाचा गौरव केला. तर वेत्ये गावातील श्रीम संतोषी संतोष गावकर व श्रीम नुतन सुशिल कोकुळकर या कर्तबगारमहिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान केला. यावेळी सरपंच गुणाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य भगवान गावडे,राजेंद्र…

Read More

सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कटीबद्ध

मनीष दळवी;जिल्हा बँक ओसरगांव शाखा स्थलांतर सोहळा ⚡कणकवली ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सर्व जिल्हावासयांची, शेतक-यांची, सर्वसामांन्याची बँक आहे.या बँकेला आपली बँक समजून कर्ज,ठेवी यासारखे सर्व आर्थिक व्यवहार ओसरगाव पंचकोशी मधील सर्व व्यापारी, शेतकरी, उद्योजग स्थानिकांनी करावेत. या सर्वांसाठी चांगली सेवा बँकेच्या ओसरगांव शाखेमार्फत दिली जाईल. या शाखेच्या माध्यमातून व्यवसाय उभा करण्यासाठी सर्वांनी फायदा घ्यावा….

Read More

दुचाकी पळविण्याचा अज्ञाताचा प्रयत्न फसला…

सावंतवाडी गवळी तिठा येथील प्रकार सावंतवाडी ता.३१-: केसकर्तनालया समोर लावलेली दुचाकी अज्ञात युवकाकडून पळवून नेण्याचा प्रकार सायंकाळी गवळी तिठा परिसरात घडला. दुचाकीला चावी विसरल्याचा फायदा घेत त्याने हा प्रयत्न केला. मात्र पुढे बुर्डी पुल परिसरात दुचाकीला अपघात झाल्याने त्याचा हा प्रयत्न फसला. अपघातानंतर संबधीत अज्ञात युवक हा गंभीर जखमी झाला असून त्याने दुचाकी तेथेच टाकून…

Read More

पोलीस भरतीत दोघांनी दाखल केली बनावट कागदपत्रे

भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असल्याचे दाखले जोडत नोकरी मिळविण्याचा प्रयत्न;सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल ओरोस ता.३१-: नुकतीच पोलीस शिपाई भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल भरतीत चक्क दोन उमेदवारांनी बोगस प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ…

Read More
You cannot copy content of this page