Headlines

आंबोलीत तलाठी कार्यालय पावसाळ्यापूर्वी सुरू करावे

आंबोली,७: सुस्त प्रशासनाचा बेशिस्त कारभारामुळे आंबोलीत तलाठी कार्यालयासाठी लाखो रुपये शासन खर्च करून देखील तलाठी कार्यलय नाही.महसूल प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार,प्रांत यांनी आंबोलीत पाऊस सुरू होण्याआधी तलाठी कार्यलय सुरू करावे.अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर ग्रामस्थांसाह उपोषणाला बसण्याचा इशारा अनिल चव्हाण यांनी दिला आहे. आंबोलीत तलाठी कार्यालय हे गळक्या आणि नादुरुस्त इमारतीत सुरू असुन…

Read More

बॅरिस्टर नाथ पै सेवांगणतर्फे
१० रोजी खुले कविसंमेलन

जुन्या नव्या कवींनी सहभागी होण्याचे आवाहन ⚡कणकवली ता.०७-: बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणतर्फे शनिवार 10 जून रोजी स.१०.३० वा. सातारा-वाई येथील प्रसिद्ध कवयित्री डॉ योगिता राजकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या प्रमुख उपस्थितीत खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी दिली. कोकणातील कवीना…

Read More

देवगड जामसांडेचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवा

राष्ट्रवादीचे नेते घाटे यांचे तहसीलदार यांना निवेदन ⚡देवगड ता.०६-: नगरपंचायत झाल्यानंतर कोट्यवधीचा विकास निधी येतो. तरीही पाण्याचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे राजकारण विरहित सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर सुविधा पुरवण्यात याव्या व देवगड जामसंडे शहराला भेडसावणारा पाणी प्रश्नापासून शहरातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार यांच्याकडे…

Read More

आदित्य ठाकरेंच्या वाढदिनी युवासेनेचे विविध उपक्रम

वृक्षारोपण, फळ वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन;गणेश गावकर, फरीद काझी यांची माहिती ⚡देवगड ता.०६-: शिवसेना युवासेना नेते आम.आदित्य ठाकरे यांच्या १३ जून वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना अधिकारी सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुका युवा सेनेच्या वतीने दि.१३ जून रोजी देवगड ग्रामीण रुग्णालयात फळवाटप,वृक्षारोपण ,दि.१४ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवगड…

Read More

पावसाळ्यापूर्वी वीज वितरण दुरुस्तीची कामे पूर्ण करा

वीज वितरणला राष्ट्रवादीच्या नंदकुमार घाटे यांचे निवेदन ⚡देवगड ता.०६-: देवगड जामसंडे शहरासह तालुक्यातील पावसाळी हंगामात वीजप्रवाह खंडित होणार नाही .यासाठी आवश्यक ती दुरुस्ती उपाययोजना पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी.दि.२९ मे रोजी दुरुस्ती करीता वीजप्रवाह दिवसभर खंडित करण्यात आला होता. परंतु काही भागातील वीज रात्री दीड वाजेपर्यंत सुरळीत झाली नव्हती अशी परिस्थिती ऐन पावसाळ्यात येऊ नये यासाठी आवश्यक…

Read More

५ कोटींच्या निधी मंजुरी बाबत आम. वैभव नाईक यांची बनवाबनवी उघड – अमित इब्रामपूरकर

⚡मालवण ता.०६-: आमदार वैभव नाईक यांनी मार्चमध्ये कुडाळ मालवण तालुक्यातील ग्रामीण मार्गांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर असल्याची घोषणा केली होती. एकूण ५० ग्रामीण मार्गावर खडीकरण, डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी कणकवली कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे यासंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली किती निधी मंजूर झाला. देण्यात आलेली प्रशासकीय मान्यता आदी बाबींबाबत…

Read More

सेवानिवृत्त अभिलेखाधिकारी अशोक खराडे यांचे निधन

⚡मालवण ता.०५-: देवबाग येथील मूळ रहिवासी आणि सेवानिवृत्त अभिलेखाधिकारी अशोक कान्हू खराडे (वय ७४) यांचे रविवारी मुंबईतील चेंबुर येथील निवासस्थानी निधन झाले. राजभवन पुरालेखागार निर्मिती विभागाचे मुख्य संशोधकीय अधिकारी म्हणून अशोक खराडे यांनी सेवा बजावली होती. पुराभिलेख- विभागातून अभिलेखाधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. २००९ साली त्यांच्यावर राजभवन पुरालेखागाराची जबाबदारी सोपविण्यात आली. यात १९३४ ते…

Read More

महिलांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी व्यवसायाकडे वळावे…

सौ. अर्चना सावंत ; ग्रामपंचायत च्या माध्यमातून व्यवसायभिमुख देण्याची ग्वाही ⚡सावंतवाडी ता.०६-: समाजातील महिला व मुलींनी आत्मनिर्भर बनण्यासाठी व्यवसायाकडे वळावे, यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल अशी ग्वाही माजगाव सरपंच सौ अर्चना सावंत यांनी दिली. माजगांव ग्रामपंचायतीकडून आयोजित करण्यात आलेल्या १५ दिवसाच्या ” बेसिक ब्युटीपार्लर प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक…

Read More

छत्रपतींचे विचार आत्ताच्या पिढीला गरजेचे…

निलेश मोरजकर ; केंद्रशाळेत शिवराज्याभिषेक दिन साजरा ⚡बांदा ता.०६-: छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे आताच्या पिढीला देणे हे खुप गरजेचे आहे. विचारांचे वहन करण्यासाठी शाळा पातळीवर विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना छत्रपतींचे विचार देऊन प्रेरित करा. तरच खऱ्या अर्थाने महाराजांचे कार्य व विचार हे प्रत्येकाच्या मनामनात व घराघरात पोहोचतील असे प्रतिपादन श्री स्वराज्य…

Read More

शासन आपल्या दारी कार्यक्रम म्हणजे मुख्यमंत्री आणि राणें कुंटूबियांचे लाॅन्चिंग…

आम. वैभव नाईक ; जनतेला काहीच मिळाले नाही… कुडाळ, प्रतिनिधी-:‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून जनतेला काही मिळाले नाही. परंतु, फक्त हा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि राणे कुटुंबीयांनी आपले लॉन्चिंग करण्यासाठी केला. यात आर्थिक उधळपट्टी मात्र झाली. शासनाचे दोन ते तीन कोटी रुपये पाण्यात घालण्याच काम शिंदे-फडणवीस सरकारने केलेत, अशी खरमरीत टीका आमदार वैभव नाईक यांनी आज पत्रकार…

Read More
You cannot copy content of this page