Headlines

वेंगुर्ला पोलीसांनी पकडली शिकारीसाठी वापरली जाणारी अनधिकृत बंदुक…

⚡वेंगुर्ले ता.०९-: अणसुर वादळवाडी येथे मंगेश भिकाजी गावडे, रा. अणसुरपाल, ता. वेंगुर्ला हा त्याच्या रहात्या घराच्या पाठीमागे विनापरवाना काडतूसची बंदुक घेवून शिकारीसाठी फिरत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला बंदुकीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. वेंगुर्ला पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी रात्रौ अणसुरपाल भागात सापळा रचला होता. ८ वाजण्याच्या सुमारास…

Read More

जिल्ह्यात काॅग्रेसला मानणारा मतदार आहे…

सतेज उर्फ बंटी पाटील;पालकमंत्री बदला चक्क कोल्हापूर भाजपाकडून मागणी.. सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस गेल्याचा थोडाफार त्रास झाला परंतु जिल्ह्यात अजूनही काँग्रेसला मानणारा मतदार आहे. परंतु त्यासाठी पळापळ करून लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्यासाठी येणार काळात आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज येथे दिली. दरम्यान…

Read More

कलमठ ग्रा.पं.तर्फे महिलांना कापडी, कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण

कलमठ ग्रामपंचायतच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा धडाका ⚡कणकवली ता.०९-:माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्लास्टिक मुक्ती जनजागृती व महिलास्नेही गाव म्हणून गावातील महिलांना रोजगार संधी म्हणून कलमठ ग्रामपंचायतने कागदी व कापडी पिशव्या बनवण्याच्या 3 दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ग्रामपंचायतच्या श्री देव काशीकलेश्वर सभागृहामध्ये आयोजित केले आहे. या प्रशिक्षण वर्गाला चांगला प्रतिसाद लाभला यावेळी गावातील 50 महिलांनि नोंदणी करून लाभ…

Read More

मनीष दळवी यांची उद्या आकाशवाणीवर मुलाखत

जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून प्रथमच मान ओरोस ता ९सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या ४० वर्षाच्या वाटचालीत २७ जुलै २०२३ रोजी ५ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार पाडला आहे. सहकार बँकींग क्षेत्रात राज्यामध्ये या बँकेच्या कामकाजाची दखल घेतली गेली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण विकासामध्ये सिंधुदुर्ग बँकेचा सिंहाचा वाटा आहे. या योगदानाची दखल घेत आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्राने सिंधुदुर्ग…

Read More

कुत्र्यांनी हल्ला केलेल्या सांबराच्या पिल्लाला दिले जीवदान…

रिक्षा चालक प्रथमेश गावडे यांनी दाखविली माणुसकी:वनविभाग अधिकारी, ग्रामस्थानी उपचारासाठी दाखल केले पशू दवाखान्यात आंबोली, ता.९: फौजदारवाडी येथील हिरण्यकेशी नदीपात्रात आज सकाळी कुत्र्यांनी एका सांबराच्या पिल्लाला शिकारीसाठी घेरले होते.त्याचवेळी तेथून रिक्षा घेऊन जाताना जवळच घर असणाऱ्या रानमाणूस” प्रथमेश गावडे याला लक्षात आल्यानंतर त्याने त्या पिल्लाला सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यासोबत मग शैलेश गावडे आणि राकेश अमृसकर…

Read More

चौकुळ प्राथमिक शाळेला प्रथमोपचार पेटी प्रदान…

उद्धव ठाकरे वाढदिवसानिमित्त तालुका पदाधिकाऱ्यांचा उपक्रम आंबोली,ता.७:चौकुळ गावातील प्राथमिक शाळांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आल्या. आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील चौकुळ प्राथमिक शाळेत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करण्यात आला. यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, रमेश गावकर,बाळा गावडे,चंद्रकांत कासार,शब्बीर मणियार,अशोक सावंत,हिमांशू परब,राजू शेटकर,चौकुळ सरपंच बाबू शेटये,आंबोली मतदारसंघ विभाग…

Read More

आगामी लोकसभा- स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक…

बंटी पाटील यांची उपस्थिती; तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले स्वागत सावंतवाडी-: आगामी लोकसभा स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमी सावंतवाडी काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक होत असून यावेळी माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच सावंतवाडीत आगमन झाले असून यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांचं सावंतवाडी काँग्रेस तर्फे स्वागत केले.दरम्यान बंटी पाटील यांच्या उपस्थितीत सावंतवाडी काँग्रेसचे महत्वपूर्ण बैठक…

Read More

कबुलायतदार अध्यादेशात असंख्य त्रुटी

आज ग्रामसभेत होणार चर्चा:शासनाला कळविणार अपेक्षित बदल.. आंबोली,ता.८ : अनिल चव्हाण : सरकारने मोठा गाजावाजा करून आंबोली कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न सुटल्याची शेखी मिरवली मात्र यात अनेक त्रुटी असल्याचे सरकारी जीआर(अद्यादेश) आल्यानंतर स्पष्ट झाले आहे.त्यावर आज ग्रामसभेत चर्चा करून शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. * शासनाने स्थानिकांचे मत ग्रामसभा ठराव विचारातच घेतलेला नाही.इंडिया इज पोलीस स्टेट…

Read More

डास निर्मुलन फवारणी करा…

अन्यथा उपोषण:महेश पांचाळ यांच्या पालिका प्रशासनाला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०८-: पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही आपल्या नगरपरिषद प्रशासनाकडून डास निमुर्लन फवारणी झालेली नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून मोठया प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच डेंग्यू, मलेरीया यासारखे साथीचे आजार सावंतवाडी शहरात पसरले आहेत.त्यामुळे निर्मुलन फवारणी त्वरित करावी आशी मागणी भाजपचे माजी तालुका सरचिटणीस महेश पांचाळ…

Read More

समुद्रातील कृत्रिम रीफ (भित्तीका) विषयी १० व ११ रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

⚡मालवण ता.०८-: केंद्र शासनाने कृत्रिम रिफ व सागरी संचयनाद्वारे किनारी मत्स्यव्यवसाय पुन्हा निर्माण करण्याकरीता प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत (PMMSY) “कृत्रिम रिफ व सागरी संचयनामार्फत शाश्वत मत्स्यव्यवसाय व उपजीविकेस प्रोत्साहन या नवीन घटकाचा समावेश केला आहे. या योजनेअंतर्गत कृत्रिम रिफ म्हणजेच कृत्रिम भित्तीका विषयी माहिती, त्याचे महत्व तसेच संगोपन विषयी किनारपट्टीवरील गावातील मच्छिमार बांधवांसाठी जनजागृती कार्यक्रम…

Read More
You cannot copy content of this page