‘सेल्फी विथ तिरंगा’मध्ये आंबोली मंडलाची दमदार कामगिरी…
महाराष्ट्रात तिसरा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक; १,०५० अटेंडन्सची नोंद.. ⚡आंबोली, ता. १७-: केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ तिरंगा’ या उपक्रमात भारतीय जनता पक्षाच्या आंबोली मंडलाने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १,०५० अटेंडन्सची नोंद केली आहे. या कामगिरीमुळे आंबोली मंडलाने महाराष्ट्र राज्यात तिसरा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे….
