Headlines

बारावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आम. नीतेश राणे यांनी केले अभिनंदन…

⚡कणकवली ता.२१-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा मंगळवारी दुपारी 1 वाजता अाॅनलाईन निकाल जाहीर केला. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आमदार नीतेश राणे यांनी अभिनंदन केले. राज्यात परत एकदा कोकण पॅटर्न म्हणून कोकण विभागातले सगळे विद्यार्थी व विद्यार्थिनी एक नंबरवर आल्याबद्दल मी मनापासून त्यांचे विशेष अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने कोकणचा मान…

Read More

आरोस विद्या विहार मधून तेजल शेळके प्रथम…

⚡सावंतवाडी ता.२१-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा बारावीचा निकाल ८५ टक्के लागला आहे. प्रशालेतून तेजल धोंडू शेळके ७८.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सोनाली संजय नाईक ७२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर संजना चंद्रकांत आरोसकर ६७.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व यशस्वी…

Read More

कणकवली तालुका काॅंग्रेसकडून राजीव गांधींना अभिवादन…

कणकवली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली तालुका राष्ट्रीय काॅग्रेसतर्फे अभिवादन केले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, उपाध्यक्ष प्रदीपकुमार जाधव, सरचिटणीस प्रवीण वरुणकर, संजय राणे, विनायक मेस्त्री, शहराध्यक्ष अजय मोरये, महेश तेली, आयशा सय्यद, कमलाकर तांबे, गजानन मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले. यावेळी…

Read More

हरकुळ बु. मधील नुकसानग्रस्त भागाची विनायक राऊतांकडून पाहणी…

⚡कणकवली ता.२१-: गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा तडाखा हरकुळ बुद्रुक गावातील शेख व खडकवाडीला बसला होता. या पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली होती. खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, हरकुळ बु.चे सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकूर, उपसरपंच आयुब पटेल, ग्रा. पं. सदस्य नित्यानंद…

Read More

नेरुर-कवठी रस्ता साईडपट्टी दुरुस्त करा…

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांची मागणी.. ⚡कुडाळ ता.२१-:कुडाळ ते नेरुर-चेंदवण-कवठी रस्ता साईडपट्टी खचून खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी मंगळवारी सार्वजनिक. बांधकाम विभागाच्या शेलटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी शिष्टमंडळासहीत केली. नेरुर-कवठी रस्ता आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर होऊन पूर्ण झाला होता. परंतु, हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर…

Read More

सावंतवाडी तालुक्याचा बारावीचा निकाल 99%…

⚡सावंतवाडी ता.२१-: कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल 99% लागला आहे. सावंतवाडी तालुक्यात ८७९ मुले व ८३४ मुली मिळून एकूण १७०५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ८५८ मुले तर ८३० मुली मिळून एकून १६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Read More

आरोस विद्या विहार मधून तेजल शेळके प्रथम…

⚡सावंतवाडी ता.२१-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा बारावीचा निकाल ८१ टक्के लागला आहे. प्रशालेतून तेजल धोंडू शेळके ७८.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सोनाली संजय नाईक ७२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर संजना चंद्रकांत आरोसकर ६७.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व यशस्वी…

Read More

मालवण तालुक्याचा बारावीचा निकाल निकाल ९९.२० टक्के…

⚡मालवण ता.२१-: कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा मालवण तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के एवढा लागला आहे. मालवण तालुक्यात ८७९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १५४ जणांनी विशेष श्रेणी पटकावली आहे. तर ३६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३२१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि ३५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले…

Read More

राज्यातील निवडणुका संपल्याने आचारसंहिता शिथिल करा…

राजन तेली: मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२१-: कोकणात पावसाचे प्रमाण खूप असल्यामुळे तसेच विकासकामे पावसाच्या दिवसात करता येणारी नसल्यामुळे नागरिकांचे खूप हाल होणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघाचे मतदान पूर्ण झालेले असून महाराष्ट्र राज्यातील आचारसहित शिथिल करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैठक सभागृहात देण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली.*यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page