Headlines

Global Maharashtra Breaking News

असलदेत ‘चेअरमन आपल्या दारी’ उपक्रमाचा १३ फेब्रुवारीला शुभारंभ

कणकवली ता.१२-:* श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी असलदे नूतन कार्यकारी संचालक मंडळ थेट सभासद, नागरिकांच्या संपर्कात जाणार आहे.चेअरमन भगवान लोके यांच्या संकल्पनेतून ‘चेअरमन आपल्या दारी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ बँक अध्यक्ष मनीष दळवी,तहसीलदार आर. जे.पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी चेअरमन प्रकाश परब,सरपंच…

Read More

सुदेश आचरेकर यांचे सत्तेत येण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील – महेश कांदळगावकर

मालवण ता.१२-:* मालवण नगरपालिकेत दहा वर्षे सत्ता असताना आणि सुदेश आचरेकर सर्वेसर्वा असताना भुयारी गटार योजना सुरू होऊ शकली नाही. चुकीच्या पद्धतीने निधीचा वापर करण्यात आला. मात्र आता स्वतःच्या अपयशाच खापर सुदेश आचरेकर दुसऱ्यांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत असून पुढील निवडणुकीत मालवण नागरपालिकेवर भाजपची सत्ता येणार आहे अशी वल्गना करत आहेत. त्यामुळे ज्यांच्या कारकिर्दीत ही…

Read More

भुरट्या अज्ञात चोरट्याकडून तेंडोली आदोसे शाळेत चोरी

लोकवर्गणीतून मिळालेली दहा हजार रुपये किमतीची टिव्ही नेली चोरून : निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वेंगुर्ले ता.१२-:* भुरट्या अज्ञात चोरट्याने तेंडोली आदोसे जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरी केली. शाळेच्या वर्गांच्या दरवाजाची कडी विस्कटून शाळेला लोकवर्गणीतून मिळालेली सुमारे दहा हजार रुपये किमतीची टिव्ही चोरून नेली. या प्रकरणी आज १२ फेब्रुवारीला निवती पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा…

Read More

विजयदुर्ग किल्ला दुरावस्थाप्रश्नी अधिवेशनामध्ये आवाज उठवू

आमदार वैभव नाईक यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट कणकवली 12 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- विजयदुर्ग किल्ला दुरवस्था संदर्भात हिंदु जनजागृती समितीने मोहीम हाती घेतली आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन व्हावे यासाठी विविध माध्यमातून समिती आवाज उठवत आहे आपणही याप्रश्‍नी लक्ष घालून अधिवेशनामध्ये आवाज उठवावा असे निवेदन हिंदू जनजागृती समितीतर्फे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना देण्यात आले….

Read More

आशियेतील विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शाश्वत शैक्षणिक विकास व्हावा:सुरेश कदम

व्हीओ मोबाईल कंपनीतर्फे प्राथमिक शाळा आशिये येथे शैक्षणिक साहित्य वाटप कणकवली ता.१२-:* विद्यार्थ्यांना अद्ययावत शैक्षणिक सुविधा पुरवून विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शाश्वत सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने व्हीओ मोबाईल कंपनीच्या वतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक , क्रीडा साहित्य देण्यात येत आहे. व्यवसायातून आर्थिक नफा मिळवत असतानाच ज्या समाजामुळे फायदा झाला त्या समाजाप्रती आपले ऊत्तरदायित्व…

Read More

टियानमध्ये अडकलेल्या कासवाची सुखरूप सुटका

मालवण ता.१२-:* देवबाग येथे समुद्रकिनारी मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या टियान मध्ये अडकलेल्या आँलिव्ह रिडले जातीच्या कासवाची कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमने सुटका करत त्याला जीवदान दिले. सुटका केलेल्या या कासवाला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. देवबाग मधील विठ्ठल मंदिर येथील मच्छीमार रोमी ब्रिटो, हे आपल्या सहकाऱ्यानंसोबत शुक्रवारी रात्री समुद्रकिनारी फेरफटका मारत असताना त्यांना एक कासव त्यांच्या मच्छीमारी…

Read More

नितेश राणे ,तुम्ही तोंड उघडाच मग कुणाचा बीपी वाढतो हे समजेल

सत्तेतून पैसा आणि आणि पैशातून सत्ता हे नितेश राणे यांचे राजकारण:सतीश सावंत कणकवली ता.१२-:* संतोष परब हल्लाप्रकरणांमध्ये ज्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं . त्या हत्येचा कट रचणाऱ्या आमदार नितेश राणे यांची सशर्त जामिनावर सुटका झाली . अजून केसचा निकाल लागलेला नाही . अशा परिस्थितीमध्ये त्यांचा जो स्वागताचा कार्यक्रम सुरू आहे तो सुसंस्कार संपत चालल्याचा भाग आहे…

Read More

मराठा समाज वधू-वर मेळाव्याला सर्वोतोपरी सहकार्य करणार

श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले यांचे आश्वासन;मराठा समाज संघटनेने भेट घेत केली चर्चा सावंतवाडी ता.१२-: वधू-वर मेळाव्यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील समाजाच्या हितासाठी असलेले सर्व उपक्रम आपण राबवावेत असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले यांनी मराठा समाज बांधव संघटनेशी झालेल्या चर्चे दरम्यान केले यावेळी शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत देखील…

Read More

पतंजली समितीच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन….

पंतंजली योग समिती व विठ्ठल मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन… सावंतवाडी ता.१२-:* पतंजली योग समितीच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त पतंजली योग समिती सावंतवाडी व विठ्ठल मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने विनाशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 6 ते 7 : 30 या वेळेत होणार आहे. कोविड…

Read More

व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिक कॅरीबॅग ऐवजी कापडी पिशवीवर भर द्यावा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची कणकवली तील व्यापाऱ्यांनी घेतली भेट कणकवली ता.१२-:* शासनाने कॅरीबॅग बंदी हा निर्णय 1 ऑक्टोबर रोजी जाहीर केला असून, 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आणि 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग वर बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे नगरपंचायत कडून ही कारवाई सुरू असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे…

Read More
You cannot copy content of this page