Global Maharashtra Breaking News

कोल्हापूर येथील अथायु हॉस्पिटलच्यावतीने महाआरोग्य शिबिर

१९ व २० मार्च रोजी आयोजन; लाभ घेण्याचे राजू मसुरकर यांचे आवाहन सावंतवाडी ता.०८-:* जिल्ह्यामध्ये अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्याकडून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यात 19 मार्च रोजी स 10 ते दु 2साटेली – भेडशी, 20 मार्च स 10 ते दु 2 सावंतवाडी तर दु 3 ते 6 ह्या वेळेत कुडाळ येथे हा महाआरोग्य…

Read More

महाजीविका अभियानाचा शुभारंभ

महिला दिनाचे औचित्य साधून उमेदचा उपक्रम सिंधुदुर्गनगरी ता ८ उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांच्या सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरणासाठी ८ मार्च ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत महाजीविका अभियान राबविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे संचालक राजेंद्र पराडकर यांनी माहिती दिली. यावेळी…

Read More

कामाचे बिल देण्यास टाळाटाळ

ठेकेदार प्रसाद परब यांचे उपोषण सिंधुदुर्गनगरी ता ०८ स्ट्रीट लाईट (पथदीवे) बसविण्याच्या केलेल्या कामाची रक्कम वारंवार मागणी करूनही ती देण्यास कास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे. याबाबत सखोल चौकशी करून केलेल्या कामाची रक्कम तात्काळ मिळावी. या मागणीसाठी शासकीय ठेकेदार प्रसाद कृष्णा परब यांनी जिल्हा परिषदेसमोर आज लक्षवेधी उपोषण सुरू केले आहे. सावंतवाडी तालुक्यातील कास ग्रामपंचायतीच्या…

Read More

जिल्ह्यातील तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम एस एस आय इन्स्टिट्यूट करेल

कौशल्य विकास कार्यक्रमात अपर निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांचा विश्वास सावंतवाडी ता.०८-:* कोकणात आपण जास्त सेवा दिली आहे. त्यामुळे कोकणावर आपले जास्त प्रेम आहे. या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख प्राप्त असून, या जिल्ह्यात सागरी, कृषी या सोबतच धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील तरुण शिक्षण घेतो परंतु, योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने भरकटत चालला…

Read More

महिलांनीच पुढाकार घेऊन महिलांच्या अधिकाराबाबत सजग व्हावे

ॲड.स्वाती तेली : वरवडे ग्रामपंचायत येथे महिला मेळावा कणकवली ता.०८-:* समाजात महिलांना दुय्यम स्थान देण्याच्या विचार आता इतिहासजमा झाला आहे. तरीही महिलांनीच पुढाकार घेऊन महिलांच्या अधिकाराबाबत सजग झाले पाहिजे असे आवाहन ॲड.स्वाती तेली यांनी केले. तालुक्‍यातील वरवडे ग्रामपंचायतीच्या सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मेळावा झाला. यात ॲड. स्वाती तेली यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी…

Read More

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग ता.०८-:* रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभा शिवसेना खासदार श्री विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे…. *बुधवार दिनांक ९ मार्च २०२२* *सकाळी ११.०० वाजता -* १. सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणातील रहिवाशांच्या समस्याबाबत चर्चा. २.व्यापारी संकूलनाबाबत चर्चा. ३.आंगणेवाडी देऊळवाडा धरण प्रकल्पाच्या भुसंपादनाबाबत. आवश्यक उपस्थिती* – जलसंधारण अधिकारी – (राज्यस्तर), भूसंपादन अधिकारी,उपविभागीय अधिकारी…

Read More

वेताळ प्रतिष्ठानकडून तुळस घाटी परिसराची स्वच्छता

वेंगुर्ला ता.०८-:* काही दिवसांपासून तुळस घाटी परिसरात अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे. मॉर्निग वॉकसाठी येणारे, पाळीव जनावरे, प्रवासी यांना काचांपासून तसेच कच-याच्या दुर्गंधीपासून धोका निर्माण होत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन वेताळ प्रतिष्ठानतर्फे व तुळस ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सुमारे ४ किमीचा तुळस घाटीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी जमा करण्यात आलेल्या कचरा वर्गीकरण…

Read More

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना केंद्राचे निवासी अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्या हस्ते उद्घाटन….

सावंतवाडी,ता.०७: मोफत प्रशिक्षणा सोबत हमखास नोकरीचीही संधी उपलब्ध करून देणाऱ्या सावंतवाडीच्या “एस.एस.आय या कॉम्प्युटर संस्थेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन निवासी तथा अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले आहे. यावेळी माणगाव विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विजयप्रकाश आकेरकर, सांगुळवाडी वैभववाडी महाविद्यालयाचे सचिव संदीप पाटील, शिरोडा येथील वी.स. खांडेकर विद्या…

Read More

वेंगुर्ल्याची पद्मा केळकर बी.ए.एम.एस.मध्ये प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी- गोवा विद्यापिठाचा प्रथम वर्ष बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमाच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात वेंगुर्ला येथील होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी.केळकर यांची कन्या कु.पद्मा हिने ७९.२३ टक्के गुण मिळवित विशेष प्राविण्यासह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ही परिक्षा जानेवारी २०२२ मध्ये पार पडली. कु.पद्मा ही भारतीय संस्कृती प्रबोधिनीचे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र शिरोडा-गोवा या…

Read More

विषमतेची दरी दूर करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा:न्या.सलीम जमादार

कणकवली ता.०८-:* महिलांनी रूढी,परंपरा, चालीरिती या चौकटीतून बाहेर पडून शैक्षिणक व आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे.महिलांनी आपल्या हक्क व अधिकार काय आहेत.याबाबत माहिती असणे आवश्यक आहे . तसेच समाजात स्त्री पुरुष यांच्या निर्माण झालेली.विषमतेची दरी दूर करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन कणकवली दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीक्ष सलीम जमादार यांनी केले. कणकवली नगरपंचायत दीनदयाळ अंत्योदय…

Read More
You cannot copy content of this page