यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणी आणि गुणवान बनावे…
श्यामसुंदर वाक्कर यांचे प्रतिपादन… ⚡मालवण ता.२२-: दहावीच्या वर्गात नापास झालेला सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव बनला, आज त्याचा धडा दहावीच्या पुस्तकात आहे, याला यश म्हणतात. विद्यार्थ्यांना गुण किती मिळाले याला महत्त्व नाही, यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणी आणि गुणवान बनावे, आपले मन चांगले ठेवून कष्ट करावेत, तेव्हाच यश प्राप्त होते, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत क्रिकेट समालोचक…
