Headlines

विद्यालय ॲप परीक्षेत मानसी दीपक पेडणेकर आणि यशश्री ताम्हणकर तालुक्यात प्रथम….

*⚡मालवण दि.०३-:* पंचायत समिती मालवण व शिक्षण विभाग मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने covid-19 च्या पार्श्वभूमीवर आयोजित विद्यालय परीक्षेमध्ये मसुरे केंद्र शाळेची विद्यार्थिनी कुमारी मानसी दीपक पेडणेकर आणि यशश्री गुरुनाथ ताम्हणकर इयत्ता चौथी यांनी मालवण तालुक्या मध्ये संयुक्त प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ५ नोव्हेंबर २०२० रोजी सदर स्पर्धा मालवण येथे संपन्न झाली होती. मानसी आणि…

Read More

बारावीचा निकाल जाहीर

राज्याचा निकाल 99.53 टक्के *⚡मुंबई दि०३-:* महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची टक्केवारी जाहीर केली. बारावीचा निकाल 99.53 टक्के लागला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

Read More

कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ऑनलाईन स्पर्धांना वेग

*⚡सावंतवाडी ता ०३ सहदेव राऊळ-:* कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विविध ऑनलाईन स्पर्धांना वेग आला आहे.गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना महामारीची पहिली लाट पसरताच कडक लॉकडाऊन व संचारबंदीमुळे नोकरी, उद्योगधंदे शाळा बंद पडल्या. त्याचबरोबर कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा आदी स्पर्धांसह भजन स्पर्धाही बंद पडल्या. त्यामुळे या सर्व स्पर्धा विविध मंडळांतर्फे ऑनलाईन…

Read More

आरोस दांडेली येथे बीएसएनएलचे नेटवर्क गायब

मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने मनसेने घेराव घालत विचारला जाब *⚡सावंतवाडी ता.०३-:* बीएसएनएल नेटवर्कचा फज्जा गेले काही दिवस तालुक्यात उडाला असून, आरोस दांडेली येथे नेटवर्क मिळत नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसे आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली मनसेने घेराव घालत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. तसेच त्या भागतील एक…

Read More

कणकवली तालुक्याला अतिवृष्टीचा फटका

४५ लाख ८२ हजारांचे नुकसान ;१२३ घरांची अंशत: हानी *⚡कणकवली ता.०३-:* अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने कणकवली तालुक्यातील १२३ घरांची अंशत: हानी झाली असून १४ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले. तर ८७ दुकानांमध्ये पुराचे पाणी गेल्याने १० लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३८ घरे, १२ गोठे,७ झोपड्या यांच्यासह ८१ हेक्टर भातशेतीची हानी…

Read More

स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय अध्यक्षपदी विनय पावसकर तर सचिवपदी मिनेश तळेकर

*⚡कणकवली दि.०३-:* स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाची सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वाचनालयाच्या अध्यक्षपदी विनय केशव पावसकर, उपाध्यक्षपदी नारायण वळंजू तर सचिव पदी मिनेश तळेकर यांची निवड करण्यात आली. पुढिल तीन वर्षांसाठी नविन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन उपस्थितांमधुन नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नविन निवडलेली…

Read More

गणेश चतुर्थीपूर्वी मल्हार पूलावर साकव बांधण्याची कार्यवाही करा

नरडवे , दिगवळे, नाटळ, दारीस्ते ,सरपंचांनी बांधकाम विभागाचे लक्ष वेधले *⚡कणकवली ता.०३-:* नाटळ येथील मल्हार पूलाच्या नजीकच तात्पुरत्या स्वरूपातील साकवाची व्यवस्था नसल्यास प्रवाशांचे मोठया प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे . तसेच सभोतालच्या गावांचा संपर्क तुटल्याने कनेडी बाजारपेठेच्या आर्थिक उलाढालीवरही सध्या याचा मोठा विपरीत परीणाम होत असून भविष्यातही तो होणार आहे . तरी वरील नमुद सर्व…

Read More

अप्रशिक्षित निवृत्त शिक्षकांना निवृत्तीविषयक लाभ मिळणार

सिंधुदुर्गातील ८ तर रत्नागिरीतील ७५ शिक्षक पात्र;महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे यश *⚡कणकवली दि.०३-:* महाराष्ट्रातील १/ ७/ १९७२ अथवा त्या दिनांकानंतर सेवेत रुजू होऊन अप्रशिक्षित राहिल्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना त्यांचे निवृत्तीनंतरचे सर्व लाभ देण्याबाबत आदेश झाले आहेत . महाराष्ट्रातील अशा सर्व शिक्षकांना संघटनेने न्याय मिळवून दिला आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे ८ तर रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७५…

Read More

कणकवली पिळणकरवाडी येथील सत्यम पिळणकर यांचे निधन

*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली शहरातील पिळणकरवाडी येथील रहिवासी सत्यम मोहन पिळणकर (40) यांचे आज गोवा बांबुळी येथील हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान निधन झाले.त्याच्या अकाली निधनामुळे शहरात शोककळा पसरली आहे. सत्यम हा उत्तम क्रिकेटपट्टू होता.जिल्ह्यात विविध ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये पटकीदेवी मित्रमंडळाच्या संघातून खेळत असे.तसेच मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. रंगकामे व रिक्षाचालवून आपला उदरनिर्वाह…

Read More

कणकवली महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

*⚡कणकवली दि.०३-:* लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य कृतीवर अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत. त्यांचे चित्रपट तमाशाप्रधान व सामाजिक जीवनातील अनेक समस्यांना थेट भिडणारे आहेत. चंद्रकांत, सूर्यकांत व जयश्री गडकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णाभाऊंच्या कथाकादंबरीतील पात्रे जिवंत केली असे सांगतानाच लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय चळवळ उभी करून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले. त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी जोपासले…

Read More
You cannot copy content of this page